शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव नुकसानभरपाई द्या - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रुकडी माणगाव - महापुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून सरकारने वाढीव नुकसानभरपाई द्यावी.याकडे लक्ष वेधण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रुकडी माणगाव - महापुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून सरकारने वाढीव नुकसानभरपाई द्यावी.याकडे लक्ष वेधण्यासाठी आक्रोश मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

पूरग्रस्तांच्या न्याय मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी रुई येथे चौदा गावातील शेतकऱ्यांची बैठक झाली.याप्रसंगी ते बोलत होते.

माजी खासदार शेट्टी म्हणाले, पंचगंगा नदीमुळे हातकणंगले तालुक्यातील आठ गावांना फटका बसला. हजारो एकरातील ऊस पीक खराब झाले आहे. झालेले आर्थिक नुकसान हे भरून निघणार नसून शासनाने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.मदत करताना हात आखडता घेऊ नये.नुकसानभरपाईसंदर्भातील निर्णय बदलावा यासाठी शेतकऱ्यांनी २३ तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

याठिकाणी अनेक पूरबाधित नागरिक यांनी व्यथा व अडचणी मांडल्या तसेच नदीपात्राची रुंदी व उंची वाढण्यासाठी नदीतील वाळू उपसा व माती उत्खनन्नास परवानगी द्यावी अशी मागणी बहुतांश शेतकऱ्यांनी केली.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, तालुकाध्यक्ष आप्पा येडके,माजी तालुकाध्यक्ष राजाराम देसाई, माजी उपसभापती अरुण मगदूम, कुमार जगोजे, रमेश भोजकर, ॲड. सुरेश चौगुले ,आण्णासोा मगदूम उपस्थित होते.

चौकट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पंचगंगा नदी ते अलमट्टी बोगद्यापर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज बांधण्याचे पर्याय एका सभेत सुचविल्याचा दाखला देण्यात आला.यावर पंचगंगा पुरावर हा पर्याय नसल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले.

Sent from Yahoo Mail on Android