शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

वाढीव नुकसानभरपाई द्या - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रुकडी माणगाव - महापुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून सरकारने वाढीव नुकसानभरपाई द्यावी.याकडे लक्ष वेधण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रुकडी माणगाव - महापुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून सरकारने वाढीव नुकसानभरपाई द्यावी.याकडे लक्ष वेधण्यासाठी आक्रोश मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

पूरग्रस्तांच्या न्याय मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी रुई येथे चौदा गावातील शेतकऱ्यांची बैठक झाली.याप्रसंगी ते बोलत होते.

माजी खासदार शेट्टी म्हणाले, पंचगंगा नदीमुळे हातकणंगले तालुक्यातील आठ गावांना फटका बसला. हजारो एकरातील ऊस पीक खराब झाले आहे. झालेले आर्थिक नुकसान हे भरून निघणार नसून शासनाने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.मदत करताना हात आखडता घेऊ नये.नुकसानभरपाईसंदर्भातील निर्णय बदलावा यासाठी शेतकऱ्यांनी २३ तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

याठिकाणी अनेक पूरबाधित नागरिक यांनी व्यथा व अडचणी मांडल्या तसेच नदीपात्राची रुंदी व उंची वाढण्यासाठी नदीतील वाळू उपसा व माती उत्खनन्नास परवानगी द्यावी अशी मागणी बहुतांश शेतकऱ्यांनी केली.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, तालुकाध्यक्ष आप्पा येडके,माजी तालुकाध्यक्ष राजाराम देसाई, माजी उपसभापती अरुण मगदूम, कुमार जगोजे, रमेश भोजकर, ॲड. सुरेश चौगुले ,आण्णासोा मगदूम उपस्थित होते.

चौकट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पंचगंगा नदी ते अलमट्टी बोगद्यापर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज बांधण्याचे पर्याय एका सभेत सुचविल्याचा दाखला देण्यात आला.यावर पंचगंगा पुरावर हा पर्याय नसल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले.

Sent from Yahoo Mail on Android