शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
3
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
4
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
5
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
6
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
7
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
8
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
9
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
10
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
11
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
12
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
13
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
14
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
16
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
17
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
18
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
19
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
20
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव

असहकार्याने वस्त्रोद्योग अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 23:20 IST

मंत्र्यांची केवळ घोषणाबाजीच : उद्योजक सवलतींपासून वंचित

दिलीप मोहिते --- विटा --शेतीपाठोपाठ मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणाऱ्या यंत्रमागासह वस्त्रोद्योगाला राज्य आणि केंद्र सरकारकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नाही. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी गेल्या सहा ते सात महिन्यांपूर्वी उद्योजकांना वीज दरात १ रुपयाची सवलत, बॅँक कर्जावरील व्याजात ५ टक्के परतावा अनुदान यासह अन्य आश्वासनांची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे सरकारचे सहकार्य नसल्याने वस्त्रोद्योग अडचणीत सापडला असून, मंत्र्यांची केवळ घोषणाबाजी आणि पोकळ आश्वासनांची खैरात यामुळे उद्योजक सवलतींपासून वंचित राहिल्याने वस्त्रोद्योगधारकांत प्रचंड नाराजी पसरली आहे.केंद्र व राज्य शासनास मोठ्या प्रमाणात महसुली उत्पन्न मिळवून देणारा विकेंद्रित यंत्रमाग लघुउद्योग गेल्या दोन वर्षापासून प्रचंड मंदी व नुकसानीतून जात आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे दि. २७ आॅगस्ट २०१६ राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत वस्त्रोद्योग परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आजी-माजी आमदार, खासदार, राज्यातील विविध यंत्रमाग संघटनांचे पदाधिकारी यासह हजारो यंत्रमागधारकांसमोर मंत्री देशमुख यांनी तातडीचा दिलासा म्हणून राज्य शासन बॅँक कर्जावरील व्याजात ५ टक्के परतावा अनुदान व वीज दरात एक रुपयांची सवलत देईल व त्याची अंमलबजावणी येत्या एक-दोन महिन्यात करेल, असे आश्वासन दिले होते.त्यावेळी मंत्री देशमुख यांनी कापसाच्या दरात होणारे चढ-उतार, तेजी-मंदी, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून होणारी साठेबाजी, कृत्रिम टंचाई यासारख्या प्रश्नातही राज्य व केंद्र शासन लक्ष घालून आवश्यक त्या दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेईल, असेही आश्वासन दिले होते. मात्र, आज सात महिने झाले तरी या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर दि. १४ सप्टेंबर २०१६ ला पुन्हा मंत्रालयात आ. सुरेश हळवणकर यांच्या पुढाकाराने मंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळीही यंत्रमागधारकांना दिलासा देण्यासाठी शासन तातडीने निर्णय घेईल,असे आश्वासन दिले होते. या सर्व प्रकाराला आज सहा ते सात महिने झाले. परंतु, राज्य सरकार कोणतेही सहकार्य करीत नसल्याने वस्त्रोद्योग अडचणीत सापडला नाही. शासन वेळकाढू धोरण घेत असल्याने उद्योजकांत संताप व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारकडून वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने उद्योजकांचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे यंत्रमागधारकांत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर वस्त्रोद्योगाला दिलासा देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत,अशी मागणी यंत्रमागधारकांतून होऊ लागली आहे. केंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष केंद्र व राज्य सरकार वस्त्रोद्योगाला कोणतेच सहकार्य करीत नसल्याने राज्यातील यंत्रमागधारक हवालदिल झाला आहे. वस्त्रोद्योग बंद करून इतर कोणता उद्योग सुरू करता येईल का, याच्या शोधात उद्योजक आहेत. तर राज्याची अर्थव्यवस्था व रोजगार निर्मितीत महत्त्वाचे स्थान असलेला हा वस्त्रोद्योग बंद पडल्यामुळे राज्य व केंद्र शासनाचेही मोठे नुकसान होणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने किमान या व्यवसायाच्या प्रलंबित प्रश्नामध्ये मार्ग काढण्यासाठी व्याज अनुदान व वीज दरात सवलत आणि कापसाच्या साठेबाजीवर नियंत्रण आणणे आदी प्रश्न प्रामुख्याने मार्गी लावावेत. तरच वस्त्रोद्योगाला चालना मिळेल, असे मत विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी व्यक्त केले.