शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

पिकअप शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

रमेश सुतार बुबनाळ : कृष्णा नदीपलीकडील औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, शेडशाळ आदी गावांमध्ये एसटी, पिकअप शेड नसल्याने ऐन पावसाळ्यात ...

रमेश सुतार

बुबनाळ :

कृष्णा नदीपलीकडील औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, शेडशाळ आदी गावांमध्ये एसटी, पिकअप शेड नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थ, प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

कृष्णा नदीपलीकडील सात गावे हे कर्नाटक राज्यालगत असल्याने या मार्गावरून प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, शेडशाळ आदी गावात एसटीचे पिकअप शेड नसल्याने ग्रामस्थांसह प्रवाशांचे पावसाळ्यात हाल होत आहेत. राज्य परिवहन महामंडळाने दुर्लक्ष केल्यामुळे ऊन-पावसात प्रवाशांना फटका बसत आहे. प्रवाशांना मंदिरे, हॉटेल, झाडांचा आश्रय घेत एसटी पकडावी लागत आहे.

कवठेगुलंद माळावर आलास हद्दीतील बसथांबाही मोडकळीस आल्याने त्याचाही वापर करता येत नाही. तरी लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांनी याकडे लक्ष देऊन राज्य परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

----------------

चौकट - नवीन बसथांब्याची गरज

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ नदीपलीकडील सात गावे असल्याने या मार्गावरून यात्रेकरूंची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. याचा विचार करता एसटी परिवहन विभागाने नवीन बसथांबा उभा करणे आवश्यक आहे.