शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

घरफाळा, पाणीपट्टी गळती रोखल्यास उत्पन्न वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:27 IST

कोल्हापूर : नव्याने करवाढ करण्यापेक्षा घरफाळा तसेच पाणी पुरवठा विभागातील गळती थांबवा, अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करायला सांगा. जर ही ...

कोल्हापूर : नव्याने करवाढ करण्यापेक्षा घरफाळा तसेच पाणी पुरवठा विभागातील गळती थांबवा, अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करायला सांगा. जर ही गळती रोखली, तर महापालिकेचे उत्पन्न आपोआपच वाढेल. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी सूचना कृती समितीतर्फे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना करण्यात आली. करवाढीचे प्रस्ताव रद्द करावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, आयुक्तांच्या अनुपस्थितीत झालेल्या चर्चेवेळी उपायुक्त निखिल मोरे यांनी घरफाळा, पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव माझ्याकडे अथवा आयुक्तांकडे अद्याप आले नसल्याचा खुलासा केला.

महानगरपालिकेच्या प्रस्तावित घरफाळा व पाणीपट्टी वाढीविरोधात निवेदन देण्यासाठी कृती समितीचे शिष्टमंडळ बुधवारी प्रशासक बलकवडे यांना भेटले. तेव्हा निवास साळोखे, ॲड. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, अनिल घाडगे यांनी प्रस्तावित करवाढ कशी चुकीची आहे, हे पटवून सांगितले. त्यांनी काही पर्याय सुचविले असून, या पर्यायानुसार प्रशासनाने जर प्रामाणिक प्रयत्न केले, तर कसलीही करवाढ करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.

बाबा इंदूलकर यांनी मुद्देसूद मांडणी केली. शहरातील ३५० घरफाळा प्रकरणे १९९६ पासून न्यायालयात प्रलंबित आहेत. या प्रकरणावर निकाल लावून घेतला, तर २८ कोटींचा महसूल मिळणार आहे. दहा हजार मिळकतींचे असेसमेंट झालेले नाही. २५४ कोटींची थकबाकी आहे ती वसुलीसाठी प्रयत्न झालेले नाहीत. पाणी पुरवठा विभागातील गळती मोठ्या प्रमाणात आहे. ७० एम.एल.डी. पाण्याचे बिलिंग होत नाही. म्हणजे वर्षाला २७ कोटींचे पाणी वाहून जाते. ते रोखण्याचा प्रयत्न केला, तर तेवढे उत्पन्न वाढू शकते. प्रशासनाने जर होणारे नुकसान रोखले आणि प्रामाणिकपणे घरफाळा वसूल केला, तर करवाढ करण्याची आवश्यकताच नाही, असे इंदूलकरांनी पटवून दिले.

यावेळी जयकुमार शिंदे, अशोक भंडारे, महादेव पाटील सुभाष जाधव, बाबासाहेब पोवार, संदीप घाटगे, सुनील धरपणकर, अमरसिंह निंबाळकर, प्रकाश घाटगे, फिरोजखान उस्ताद उपस्थित होते.

(फोटो देतोय )