शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळच बसेना

By admin | Updated: December 11, 2014 23:50 IST

आजरा ग्रामपंचायतीसमोर पेच ? : इतर मार्गांतून मिळणाऱ्या उत्पन्नातील खर्चही पाणीपुरवठा योजनेवर

ज्योतिप्रसाद सावंत -आजरा ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेवर १ एप्रिल २०१४ ते ३० नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत प्रति महिना २ लाख ७५ हजार रुपयांच्या सरासरीने तब्बल २२ लाख ५२२० रुपये खर्च झाले असून, येत्या उर्वरित चार महिन्यांकरिता आणखी ९ ते १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. २४ लाख रुपये उत्पन्न आणि ३२ ते ३३ लाख रुपये खर्च अशी या पाणीपुरवठा योजनेची अवस्था झाली आहे.नळपाणी पुरवठा योजनेपासून वार्षिक २२ लाख ५२२० इतके उत्पन्न मिळते. ग्रामपंचायत दप्तरी २३९२ नळपाणी कनेक्शन ग्राहकांची नोंद आहे. एकूण खर्चापैकी कायम व हंगामी नोकरांचे पगार, त्यांना इतर वेतनविषयक लाभ, बोनस यासाठी निव्वळ खर्च साडेनऊ ते दहा लाख रुपये प्रतिवर्षी खर्ची पडत आहेत. नळपाणी पुरवठा योजनेचे वीज बिल १३ ते १४ लाख रुपयांच्या आसपास आहे. याव्यतिरिक्त टी.सी.एल. पावडर, लिकेज काढणे, मोटर खरेदी, वाढीव पाईपलाईन यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होताना दिसतो. नोकर पगार, विद्युत बिल आणि गळत्या काढणे यामुळे ग्रामपंचायतीला नळपाणी पुरवठा योजनेपासून मिळणारे उत्पन्न व खर्च याचा काहीच ताळमेळ बसेनासा झाला आहे.आगीतून फुफाट्यात प्रमाणे पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य टाकीला मोठी गळती असल्याने ही गळती काढणे व विद्यानगर येथील हिरण्यकेशी नदीशेजारील पंपहाऊसची दुरुस्ती करणे यासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च येत्या चार महिन्यांत करण्याशिवाय पर्याय नाही. जिल्हा परिषदेकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे; पण पुढे काय आहे? त्याचे उत्तर ग्रामपंचायत प्रशासनाकडे सध्यातरी नाही. २००७-०८ साली नव्याने मंजूर झालेल्या योजनेचे ग्रामपंचायतीकडे अद्याप हस्तांतरण झालेले नाही. सद्य:स्थितीला जसे आहे तसे हस्तांतरण करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामपंचायत नळपाणी पुरवठा योजनेचे पुढे काय? याचे उत्तर मिळणार नाही. या सर्व प्रकारात ग्रामपंचायतीला इतर मार्गातून मिळणाऱ्या उत्पन्नातील सुमारे दहा लाख रुपये पाणीपुरवठा योजनेवर प्रतिवर्षी खर्च करावे लागत आहेत. हा भुर्दंड ग्रामपंचायतीला अडचणीचा ठरत आहे.