शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळच बसेना

By admin | Updated: December 11, 2014 23:50 IST

आजरा ग्रामपंचायतीसमोर पेच ? : इतर मार्गांतून मिळणाऱ्या उत्पन्नातील खर्चही पाणीपुरवठा योजनेवर

ज्योतिप्रसाद सावंत -आजरा ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेवर १ एप्रिल २०१४ ते ३० नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत प्रति महिना २ लाख ७५ हजार रुपयांच्या सरासरीने तब्बल २२ लाख ५२२० रुपये खर्च झाले असून, येत्या उर्वरित चार महिन्यांकरिता आणखी ९ ते १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. २४ लाख रुपये उत्पन्न आणि ३२ ते ३३ लाख रुपये खर्च अशी या पाणीपुरवठा योजनेची अवस्था झाली आहे.नळपाणी पुरवठा योजनेपासून वार्षिक २२ लाख ५२२० इतके उत्पन्न मिळते. ग्रामपंचायत दप्तरी २३९२ नळपाणी कनेक्शन ग्राहकांची नोंद आहे. एकूण खर्चापैकी कायम व हंगामी नोकरांचे पगार, त्यांना इतर वेतनविषयक लाभ, बोनस यासाठी निव्वळ खर्च साडेनऊ ते दहा लाख रुपये प्रतिवर्षी खर्ची पडत आहेत. नळपाणी पुरवठा योजनेचे वीज बिल १३ ते १४ लाख रुपयांच्या आसपास आहे. याव्यतिरिक्त टी.सी.एल. पावडर, लिकेज काढणे, मोटर खरेदी, वाढीव पाईपलाईन यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होताना दिसतो. नोकर पगार, विद्युत बिल आणि गळत्या काढणे यामुळे ग्रामपंचायतीला नळपाणी पुरवठा योजनेपासून मिळणारे उत्पन्न व खर्च याचा काहीच ताळमेळ बसेनासा झाला आहे.आगीतून फुफाट्यात प्रमाणे पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य टाकीला मोठी गळती असल्याने ही गळती काढणे व विद्यानगर येथील हिरण्यकेशी नदीशेजारील पंपहाऊसची दुरुस्ती करणे यासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च येत्या चार महिन्यांत करण्याशिवाय पर्याय नाही. जिल्हा परिषदेकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे; पण पुढे काय आहे? त्याचे उत्तर ग्रामपंचायत प्रशासनाकडे सध्यातरी नाही. २००७-०८ साली नव्याने मंजूर झालेल्या योजनेचे ग्रामपंचायतीकडे अद्याप हस्तांतरण झालेले नाही. सद्य:स्थितीला जसे आहे तसे हस्तांतरण करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामपंचायत नळपाणी पुरवठा योजनेचे पुढे काय? याचे उत्तर मिळणार नाही. या सर्व प्रकारात ग्रामपंचायतीला इतर मार्गातून मिळणाऱ्या उत्पन्नातील सुमारे दहा लाख रुपये पाणीपुरवठा योजनेवर प्रतिवर्षी खर्च करावे लागत आहेत. हा भुर्दंड ग्रामपंचायतीला अडचणीचा ठरत आहे.