शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

दारू पिल्यास पाच दिवस हाती झाडू !

By admin | Updated: December 18, 2014 00:10 IST

झाडलोटीची शिक्षा : काटेकोर अंमलबजावणीने वसाहत झाली दारूमुक्त

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर --कोणालाही व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढणे सोपे नसते. मात्र, ते शिवधनुष्य उचगाव येथील फासेपारधी समाजातील पंचांसह ज्येष्ठ मंडळींनी उचलले आणि यशस्वीरीत्या पेलून समाजाला परिवर्तनाच्या वाटेवर आणून सोडले. २००९-१० मध्ये स्वच्छता मोहीम तर सुरू झाली होती. तिचे यश पाहून वसाहतीत दारू, गुटखा आणि जुगारबंदीचा निर्णय घेण्यात आला. दारू पिऊन येणाऱ्यास पाच दिवस वसाहतीत स्वच्छता करण्याची अनोखी शिक्षा ठरविण्यात आली. तिचा अंमल सुरू झाला. आज ही वसाहत दारूमुक्त बनली आहेहा निर्णय घेण्यामागे तशी पार्श्वभूमीही होती. फासेपारधी कुटुंबाची मिळकत जेमतेम. मोलमजुरी करून मिळविलेले पैसे व्यसनात घालायचे. पैशांसाठी पत्नीला मारझोड करायचे. प्रसंगी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र विकायचे आणि दारू ढोसायची, असा दिनक्रम अनेक कुटुंबांचा होता. महिलांसह लहान मुलेही मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जाऊ लागली होती. व्यसनासाठी पैसे मिळविण्याकरिता वाट्टेल ते करण्याची प्रवृत्ती बळावली होती. भांडण-तंटे रोजचे बनले होते. सामाजिक स्वास्थ्य बिघडू लागले होते. ‘दारुड्यांची वसाहत’ अशी ओळख या वसाहतीची बनली होती. त्यामुळेच दारू, जुगार, गुटखाबंदीचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. परिणामी वसाहत दारूमुक्त आणि तंटामुक्त बनली आहे. नियोजनबद्ध विकासाच्या दिशेने वसाहतीची वाटचाल सुरू झाली आहे. (क्रमश:) अशी झाली दारूबंदी...-परिवर्तनाच्या वाटेवरपारधी समाजदारूबंदीसाठी प्रभावी प्रबोधनातून मनपरिवर्तन केले. दारू पिऊन आलेल्यास पाच दिवसांची स्वच्छता करण्याच्या शिक्षेची काटेकोर अंमलबजावणी केली. पहिल्यांदा महिन्याला चार ते पाचजण दारू पिऊन ोणारे मिळत होते. स्वच्छतेची शिक्षा भोगल्यानंतर ते पुन्हा दारू न पिण्याचा निर्धार करीत. अलीकडे अपवादात्मक असा एखादा दारू पिऊन आलेला असतो. वसाहतच दारू, जुगार, गुटखामुक्त झाल्यामुळे कुटुंबांचा आर्थिक स्तरही उंचावत आहे. भांडण, तंटेही बंद झाले आहेत.नवसाहत दारू, गुटखामुक्त झाली आहे. भांडण-तंटे नसल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य चांगले राहत आहे. व्यसनावर होणारे पैसे वाचल्यामुळे कुटुंबांची आर्थिक उन्नती होत आहे. रोज सायंकाळी आम्ही ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीची चर्चा करतो. - मल्लू बाबू चव्हाण, रहिवासीदारूच्या पैशांतून दिवाळी.. वर्षापूर्वी रोज दारू पिण्यावरच्या खर्चात बचत करून वीस रुपयांप्रमाणे संकलित केले. एका वर्षात तब्बल चार लाख रुपये गोळा झाले. हे पैसे दिवाळीच्या तोंडावर संबंधित कुटुंबांना एकाचवेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते जाहीर कार्यक्रमात वाटप करण्यात आले. एकेका कुटुंबाला कमीत कमी हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे मिळाल्यामुळे दिवाळी आनंदात साजरी केली. दारूवर पैसे किती खर्च होत होते, याचीही जाणीव झाली.