शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरचा ऊस आणल्यास पेटविणार

By admin | Updated: June 16, 2015 01:15 IST

विश्वास नेजदार यांचा इशारा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजाराम कारखान्यावर मोर्चा; वादावादीचा प्रकार

कसबा बावडा : राजाराम सहकारी साखर कारखान्याची एकही वस्तू पंढरपूर अथवा बेडकिहाळ कारखान्याकडे गेल्यास संचालक मंडळाला चांगलेच कुडपणार, तसेच कारखान्याने कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणल्यास ट्रक उलथवून तो पेटवून दिला जाईल, असा इशारा कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांनी संचालक मंडळाला दिला. यावेळी आंदोलक व कारखाना व्यवस्थापन यांच्यात शाब्दिक वादावादी झाल्याने एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. शेतकऱ्यांना त्यांच्या ५ कोटी ३२ लाख रुपयांच्या ठेवी व त्याचे व्याज त्वरित मिळावे, सन २०१४/१५ हंगामासाठी पाठविलेल्या उसाचे बिल त्वरित मिळावे, उसाचा करार करून घ्यावा, कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गाळपास आणू नये या व अन्य इतर मागण्यांसाठी सोमवारी विश्वास नेजदार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने, संचालक दिलीप पाटील, दिलीप उलपे, हरीश चौगले, कार्यकारी संचालक आर. सी. पाटील हे ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मोर्चाला सामोरे गेले. त्यांनाच थेट आव्हान देत माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांनी कारखाना काय तुमच्या बाचा हाय? असा प्रश्न करत धारेवर धरले. कारखाना कर्जमुक्त आहे. कारखान्याचा कारभार स्वच्छ व पारदर्शी आहे, तर ठेवी आणि बिले का देत नाही, असा सवाल केला.कारखान्यामध्ये पी. जी. मेढे हे कित्येक वर्षांपूर्वी निवृत्त झाले असताना त्यांच्यावर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये कशाला खर्च करता, असा सवाल करत कारखान्याला दोन-दोन एम. डी. ठेवण्याची गरज नाही. सेवानिवृत्त झालेल्या परंतु पुन्हा कामावर घेतलेल्या अधिकाऱ्यांना का कमी करत नाही, असा सवालही नेजदार यांनी केला. यावेळी आंदोलक शेतकरी व कारखाना व्यवस्थापनात शाब्दिक वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कारभाराचे वाभाडे काढले. काही शेतकऱ्यांच्या उसाचा करार जाणून-बुजून केला जात नाही, बावड्यातील ऊस उशिरा तोडला जातो, असा आरोपही यावेळी करण्यात आला. या गोंधळातच अध्यक्ष माने यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी मोहन सालपे, नगरसेवक प्रदीप उलपे, अजित पोवार, नितीन पारखे, श्रीहरी पाटील, प्रल्हाद उलपे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)बोर्ड मीटिंगपुढे विषय ठेवणारयेत्या १७ तारखेला कारखान्याची बोर्ड मीटिंग आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेतला जाईल, असे कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने यांनी स्पष्ट केले. सूडबुद्धीने कोणाचाही करार डावलला जात नाही. साखरेचे दर पडल्याने काहीशी अडचण आहे. तुमच्या काळातील सभासदकाही सभासदांच्या नावावर एक गुंठा जमीन नसताना त्यांना सभासद कसे केले? असा सवाल नेजदार यांनी उपस्थित केला. यावर माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी तुमच्या काळातच असे सभासद झाले आहेत, असे म्हणताच वादाला तोंड फुटले.कवळी गाजरं...कारखाना परिसरात चांगला व परिपक्व ऊस उपलब्ध असताना ८ ते १० महिन्यांची कवळी गाजरं (ऊस) रात्रीच्या वेळी आणून त्याने गाळप केले जाते. त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसतो, असा आरोप यावेळी नेजदार यांनी केला.