शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

रस्त्यालगतची वृक्षतोड न केल्यास काम बंद पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:18 IST

गारगोटी : गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीची हानी करणारे परदेशी वृक्ष महामार्गाच्या लगत आहेत. या वृक्षांमुळे जमिनीची अपरिमित हानी ...

गारगोटी : गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीची हानी करणारे परदेशी वृक्ष महामार्गाच्या लगत आहेत. या वृक्षांमुळे जमिनीची अपरिमित हानी होत तर आहेच शिवाय अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. हे वृक्ष नूतनीकरणात न तोडल्यास या महामार्गाचे काम चार दिवसांत बंद पाडण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ५० वर्षांपासून आम्ही या वृक्षांमुळे नुकसान सहन करीत आहोत. या पसरट झाडांच्या खाली काहीही पीक येत नसल्याने झाडाखालची जमीन नापीक बनली आहे. हे परदेशी वृक्ष असल्याने याचा पर्यावरणालाही काही उपयोग होत नाही. सर्वच बाजूंनी हे वृक्ष तोट्याचे आहेत. संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याचा गांभिर्याने विचार करावा. येत्या चार दिवसांत हा निर्णय न घेतल्यास या महामार्गाचे काम कोणत्याही स्थितीत होऊ देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

निवेदनावर विश्वास भंडारी, युवराज भंडारी, संदीप पाटील, बळवंत कुपटे, पांडुरंग लोहार, नामदेव लोहार, बंडेराव लोहार, लक्ष्मण लोहार, संजय भंडारी बाजीराव भंडारी,मारुती कुंभार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.