शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

साखर उद्योग संपला, तर त्यास पीयूष गोयल जबाबदार: हसन मुश्रिफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:24 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस साखर कारखानदारी मोडीत निघाली आहे. याबाबत केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना लक्ष ...

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस साखर कारखानदारी मोडीत निघाली आहे. याबाबत केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना लक्ष घालण्याची विनंती केली. मात्र, ते व्यापारी असल्याने दुर्लक्ष करत आहेत. महाराष्ट्रातील साखर उद्योग संपला, तर त्यास मंत्री गोयल जबाबदार असतील, असा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी रविवारी दिला. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ‘ई-लॉबी’ भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

मंत्री मुश्रिफ म्हणाले, साखरेचे दर प्रतिक्विंटल ३१०० रुपये आणि उसाची एफआरपी याचा ताळमेळ बसत नाही. टनामागे ४०० ते ५०० रुपये कमी पडत असल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे. पुढील हंगामात उसाचे आणखी पीक वाढणार आहे. मात्र, साखर कारखाने बंद पडण्याचा धोका आहे. कारखान्यांचे कंबरडे मोडल्यानंतर निर्यातीचा निर्णय घेतला.

------------------------------

उपपंतप्रधान पदासाठी मुश्रिफांना शुभेच्छा

जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीचे भूमिपूजन यशवंतराव चव्हाण यांच्याहस्ते झाले होते. भूमिपूजनानंतर ते थेट देशाचे उपपंतप्रधान झाले. आता या इमारतीचे भूमिपूजन हसन मुश्रिफ यांच्याहस्ते झाले, तेही उपपंतप्रधान व्हावेत, अशा शुभेच्छा आमदार पी. एन. पाटील यांनी दिल्या. यावर मुश्रिफ यांनी त्यांचे आभार मानले.

------------------------------

कोल्हापूर जिल्हा बँकेचे तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एप्रिल २०२१ पासून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी रविवारी केली. केंद्र सरकारने अपात्र कर्जमाफी रद्द केल्याने अनिष्ट दुराव्यात सापडलेल्या विकास संस्थांची व्याज आकारणी बंद करूच, त्याचबरोबर नाबार्डने व्याजासह पैसे दिले, तर तेही संस्थांना परत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.