शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

साखर उद्योग संपला, तर त्यास पीयूष गोयल जबाबदार: हसन मुश्रिफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:24 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस साखर कारखानदारी मोडीत निघाली आहे. याबाबत केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना लक्ष ...

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस साखर कारखानदारी मोडीत निघाली आहे. याबाबत केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना लक्ष घालण्याची विनंती केली. मात्र, ते व्यापारी असल्याने दुर्लक्ष करत आहेत. महाराष्ट्रातील साखर उद्योग संपला, तर त्यास मंत्री गोयल जबाबदार असतील, असा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी रविवारी दिला. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ‘ई-लॉबी’ भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

मंत्री मुश्रिफ म्हणाले, साखरेचे दर प्रतिक्विंटल ३१०० रुपये आणि उसाची एफआरपी याचा ताळमेळ बसत नाही. टनामागे ४०० ते ५०० रुपये कमी पडत असल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे. पुढील हंगामात उसाचे आणखी पीक वाढणार आहे. मात्र, साखर कारखाने बंद पडण्याचा धोका आहे. कारखान्यांचे कंबरडे मोडल्यानंतर निर्यातीचा निर्णय घेतला.

------------------------------

उपपंतप्रधान पदासाठी मुश्रिफांना शुभेच्छा

जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीचे भूमिपूजन यशवंतराव चव्हाण यांच्याहस्ते झाले होते. भूमिपूजनानंतर ते थेट देशाचे उपपंतप्रधान झाले. आता या इमारतीचे भूमिपूजन हसन मुश्रिफ यांच्याहस्ते झाले, तेही उपपंतप्रधान व्हावेत, अशा शुभेच्छा आमदार पी. एन. पाटील यांनी दिल्या. यावर मुश्रिफ यांनी त्यांचे आभार मानले.

------------------------------

कोल्हापूर जिल्हा बँकेचे तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एप्रिल २०२१ पासून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी रविवारी केली. केंद्र सरकारने अपात्र कर्जमाफी रद्द केल्याने अनिष्ट दुराव्यात सापडलेल्या विकास संस्थांची व्याज आकारणी बंद करूच, त्याचबरोबर नाबार्डने व्याजासह पैसे दिले, तर तेही संस्थांना परत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.