शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
4
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
5
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
6
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
7
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
8
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
9
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
10
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
11
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
12
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
13
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
14
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
15
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
16
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
17
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
18
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
19
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
20
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 

नागमुद्रा न घडविल्यास जनआंदोलन

By admin | Updated: August 11, 2015 23:44 IST

अंबाबाई भक्त समितीचा इशारा : वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे दाखल केली याचिका

कोल्हापूर : अंबाबाई मूर्ती संवर्धन प्रक्रियेत देवीच्या मूळ रूपाचे संवर्धन करण्याचे वचन पुरातत्त्व विभाग व श्रीपूजकांनी दिले होते. मात्र, मूर्तीच्या डोक्यावर हेतुपुरस्सररीत्या नागमुद्रा कोरलेली नसल्याने मूळ स्वरूपात बदल झाला असून, ही अत्यंत अक्षम्य बाब आहे. न्यायालयाने जबाबदार व्यक्तींना मूर्तीवर पुन्हा नागमुद्रा बनवून देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे करण्यात आल्याची माहिती अंबाबाई भक्त समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली. अंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेच्या त्रिशताब्दी वर्षाला सुरुवात होण्याआधी नागमुद्रा घडविली नाही, तर मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अंबाबाई मूर्ती संवर्धन प्रक्रियेत नागमुद्रा घडवायचे राहून गेल्याने तिच्या आदिशक्ती या मूळ रूपात बदल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर अंबाबाई भक्त समितीचे महेश उरसाल, प्रमोद सावंत, बंडा साळोखे, किशोर घाटगे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका विशद केली. ते म्हणाले, अंबाबाई मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला सप्टेंबरमध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. हा सोहळा भव्य-दिव्य करण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र, देवीचे मूळ स्वरूपच राहणार नसेल, तर त्या उत्सवाला काहीच अर्थ असणार नाही. वैकल्पिक वाद निवारण केंद्रातील तडजोडनाम्यानुसार पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांना मूर्तीचे मूळ स्वरूप अबाधित राखणे बंधनकारक असताना ते आम्हाला नाग दिसलाच नाही, असे सांगत आहेत. पायाची बोटे, ढालीच्या हाताची पकड, सिंह या सगळ््या मुद्रांना मूळ स्वरूप देणाऱ्या अधिकाऱ्यांनी ‘नाग दिसला नाही’, असे म्हणणे म्हणजे शरमेची बाब आहे. याशिवाय महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्तीतील प्राणतत्त्व काढून घेण्यात आले; पण मूर्तीचे संवर्धन न करताच अधिकारी निघून गेले. धार्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील लोकही गप्प आहेत. ही देवी फक्त त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठीच आहे का? तिचे मूळ स्वरूप अबाधित राखणे ही भक्तांची जबाबदारी नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जिल्हाधिकारी, श्रीपूजकांना गांभीर्यच नाहीकरवीरपीठाच्या शंकराचार्यांनी अंबाबाईच्या डोक्यावर नाग असलाच पाहिजे, असे स्पष्ट केल्याने या विषयाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आले आहे. मात्र, देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आणि श्रीपूजकांना त्याचे अजिबात गांभीर्य नाही, अन्यथा त्यांनी तातडीने ही चूक सुधारण्यासाठी प्रयत्न केले असते. श्रीपूजक तर ‘मूर्तीवर नाग नाहीच’, असे खोटे बोलत आहेत.