शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

निर्यात अनुदान देणार नसाल, तर अबकारी कर परत करा

By admin | Updated: May 22, 2016 00:57 IST

साखर कारखानदारांची केंद्राकडे मागणी : कारखान्यांकडून वसुली सुरू

कोल्हापूर : साखर निर्यात अनुदान देणार नसाल, तर केंद्राने कारखानदारांकडून वसूल केलेला अबकारी कर परत करावा, अशी मागणी साखर कारखानदारांकडून होऊ लागली आहे. जानेवारी २०१६ पासून केंद्राने साखरेवर प्रतिक्विंटल शंभर रुपये अबकारी करात वाढ करीत कारखान्यांकडून वसुली सुरू केली आहे. देशातील अतिरिक्तसाखरेमुळे २०१५-१६ या गळीत हंगामात संपूर्ण साखर व्यवसाय अडचणीत आला होता. साखरेचे दर १९०० रुपयांपर्यंत खाली घसरल्याने एफआरपी द्यायची कशी? असा पेच कारखानदारांसमोर होता, अशा परिस्थितीत देशातील साखर बाहेर काढल्याशिवाय दर वाढणार नाहीत, हे निश्चित होते; पण जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर कमी असल्याने कारखानदार तोट्यातील धंदा करण्यास फारसे उत्सुक नव्हते; पण केंद्राने प्रत्येक कारखान्यांना एकूण उत्पादनाच्या १२ टक्केकोटा देऊन सक्तीने निर्यात करण्याचे आदेश दिले. त्यासाठी शेतकऱ्यांना टनाला ४५ रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. केंद्र सरकार ४५ रुपये देणार म्हटल्यावर कारखानदारांनी एफआरपीमधील ४५ रुपये कपात केली. दरम्यान, केंद्राने निर्यात अनुदान देणार म्हटल्यावर साखरेवरील अबकारी करात तब्बल शंभर रुपयांनी वाढ केली. यापूर्वी ९५ रुपये प्रतिक्विंटल साखरेवर कर वसूल केला जात होता. त्यामध्ये शंभर रुपयांची वाढ करून वसुली केली. कर वाढविल्याने व्यापाऱ्यांना तेवढी जादा रक्कम मोजावी लागल्याने आपोआपच साखरेचे दर कोसळले. तिथे कारखानदारांचा तोटा झाला. केंद्र सरकार ४५ रुपये अनुदानाचा शब्द फिरविणार असेल, तर वाढीव कर परत करावा, अशी मागणी साखर कारखान्यांकडून होऊ लागली आहे.