शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

निर्यात अनुदान देणार नसाल, तर अबकारी कर परत करा

By admin | Updated: May 22, 2016 00:57 IST

साखर कारखानदारांची केंद्राकडे मागणी : कारखान्यांकडून वसुली सुरू

कोल्हापूर : साखर निर्यात अनुदान देणार नसाल, तर केंद्राने कारखानदारांकडून वसूल केलेला अबकारी कर परत करावा, अशी मागणी साखर कारखानदारांकडून होऊ लागली आहे. जानेवारी २०१६ पासून केंद्राने साखरेवर प्रतिक्विंटल शंभर रुपये अबकारी करात वाढ करीत कारखान्यांकडून वसुली सुरू केली आहे. देशातील अतिरिक्तसाखरेमुळे २०१५-१६ या गळीत हंगामात संपूर्ण साखर व्यवसाय अडचणीत आला होता. साखरेचे दर १९०० रुपयांपर्यंत खाली घसरल्याने एफआरपी द्यायची कशी? असा पेच कारखानदारांसमोर होता, अशा परिस्थितीत देशातील साखर बाहेर काढल्याशिवाय दर वाढणार नाहीत, हे निश्चित होते; पण जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर कमी असल्याने कारखानदार तोट्यातील धंदा करण्यास फारसे उत्सुक नव्हते; पण केंद्राने प्रत्येक कारखान्यांना एकूण उत्पादनाच्या १२ टक्केकोटा देऊन सक्तीने निर्यात करण्याचे आदेश दिले. त्यासाठी शेतकऱ्यांना टनाला ४५ रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. केंद्र सरकार ४५ रुपये देणार म्हटल्यावर कारखानदारांनी एफआरपीमधील ४५ रुपये कपात केली. दरम्यान, केंद्राने निर्यात अनुदान देणार म्हटल्यावर साखरेवरील अबकारी करात तब्बल शंभर रुपयांनी वाढ केली. यापूर्वी ९५ रुपये प्रतिक्विंटल साखरेवर कर वसूल केला जात होता. त्यामध्ये शंभर रुपयांची वाढ करून वसुली केली. कर वाढविल्याने व्यापाऱ्यांना तेवढी जादा रक्कम मोजावी लागल्याने आपोआपच साखरेचे दर कोसळले. तिथे कारखानदारांचा तोटा झाला. केंद्र सरकार ४५ रुपये अनुदानाचा शब्द फिरविणार असेल, तर वाढीव कर परत करावा, अशी मागणी साखर कारखान्यांकडून होऊ लागली आहे.