शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

स्वत:मधील ताकद ओळखावी

By admin | Updated: January 12, 2016 00:36 IST

ज्ञानेश्वर मुळे : कागलच्या डी. आर. माने महाविद्यालयात व्याख्यान

कागल : जगभरात जवळपास ७०० कोटी लोक आहेत, मात्र ते स्वतंत्र चेहऱ्याचे आहेत. परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला अद्वितीय असा गुण दिला आहे, पण ही अद्वितीय ताकद काय आहे ही शोधायची जबाबदारी ज्याच्या त्याच्यावर सोपवून ‘मेख’ मारली आहे. म्हणून आपल्यातील अद्वितीय गुणांच्या शोधासाठी ज्ञान-जिज्ञासा आवश्यक असते, असे प्रतिपादन डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.येथील डी. आर. माने महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दि कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव भैया माने होते. बाळ कालेकर, मीनाताई घाग, अजित पाटील प्रमुख उपस्थित होते.मुळे म्हणाले, कच्चा माल फार चांगला असतो, पण रसवंतीगृहात गेल्यावर चोथा होऊन बाहेर पडतो, तशी अवस्था कधी कधी शिक्षणामुळेही होते; म्हणून नुसता अभ्यास करून उत्तीर्ण होण्यापेक्षा अंतर्मनातील ज्ञानज्योत पेटण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. असे झाले तर आपला चोथा कदापीही होणार नाही. प्रगतीपथावर जायचे असेल तर सुरवंट जसा कोशाबाहेर पडतो आणि त्याचे फुुलपाखरात रूपांतर होते, तसे आपण कोशाबाहेर पडायला हवे. आदर्श डोळ््यांसमोर असलाच पाहिजे, पण दुसरे करतात म्हणून तेच करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मनाला जे पटेल, भावेल, तेच करा. त्यासाठी तुमचे अद्वितीय याचा शोध घ्या. प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले यांनी स्वागत करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी भैया माने यांचेही भाषण झाले. डॉ. नीला जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हसीना मालदार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)