शिरोळ : क्षारपड जमिनी याही वृद्धाश्रमात कैद असल्यासारख्याच होत्या. क्षारपड जमिनीवर काम करूनही जमीन सुद्धा पिकावू व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गणपतराव पाटील यांनी तालुका, जिल्हा, महाराष्ट्राला क्षारपडमुक्त जमिनीचा पॅटर्न दिला. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी आली आहे, असे प्रतिपादन वसंतराव हंकारे यांनी केले.
श्री दत्त साखर कारखाना उद्योग समूह, डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर-उदगाव बँकेच्या सहकार्याने राजापूर परिसरातील सुमारे ४०० एकर क्षारपड जमीन सुधारणा सर्वेक्षण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, क्षारपडीमुळे जमीन नापीक बनली होती. तिला पुनरुज्जीवन देऊन जमीन पिकाऊ करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. दत्त कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी श्रीशैल हेगान्ना, दानू पाटील, मोहन ढवळे, जावीर जमादार, अरुण मगदूम, सलीम जमादार, रावसाहेब कोरे, बसाप्पा धरणगुत्ते, लालू गवळी, मौला पटेल, संजय सुतार, कीर्तीवर्धन मरजे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. अविनाश मिस्त्री यांनी आभार मानले.
फोटो - २५०२२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ -
राजापूर (ता. शिरोळ) येथे क्षारपड जमीन सुधारणा सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी गणपतराव पाटील, वसंतराव हंकारे, श्रीशैल हेगान्ना, रावसाहेब कोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.