शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे मावळे चारित्र्याचे आदर्श उदाहरण

By admin | Updated: October 9, 2016 00:57 IST

अमर आडके : शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व्याख्यानमालेत प्रतिपादन

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांनी मानसिक गुलामगिरीतून मोकळे करीत स्वराज्य निर्मितीसाठी सामान्यांतील सामान्य माणसे एकत्रित केली. त्यांचे कान्होजी जेधे, शिवा जंगम, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी पालसकर हे नि:स्वार्थी, प्रामाणिक मावळे म्हणजे राष्ट्रीय चारित्र्याचे आदर्श उदाहरण आहेत, असे प्रतिपादन इतिहासतज्ज्ञ डॉ. अमर आडके यांनी केले.कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (के. एम. ए.)तर्फे केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित व्याख्यानमालेत शनिवारी ते ‘नरवीर तानाजी मालुसरे’ या विषयावर बोलत होते. सुरुवातीला ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले व राजर्र्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते अवयवदान कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी ‘केएमए’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण हेंद्रे, डॉ. संगीता निंबाळकर, डॉ. राजकुमार पाटील उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील तानाजी मालुसरे यांचे स्थान अधोरेखित करताना डॉ. आडके म्हणाले, तानाजी मालुसरे तीस वर्षे महाराजांच्या पाठीमागे सावलीसारखा उभा राहिला. त्यांचे कर्तृत्व फक्त ‘कोंढाण्या’पुरतेच मर्यादित नव्हते; तर स्वराज्याच्या अनेक लढायांत त्यांचा वाटा सिंहाचा होता. ‘लोकमत’चे संपादक भोसले म्हणाले, वेगाने बदलत्या समाजजीवनात आरोग्याच्या सर्व संकल्पनांचा फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. आरोग्य हे शरीराचे महत्त्वाचे अंग आहे. तंदुरुस्त आरोग्य असेल तर मनही तंदुरुस्त राहील. सजग समाजासाठी केएमएचे उपक्रम स्तुत्य आहेत. डॉ. आर. एम. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. क ोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित व्याख्यानमालेत शनिवारी अवयवदान उपक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले व डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून केएमएचे अध्यक्ष डॉ. प्रवीण हेंद्रे, डॉ. रवींद्र शिंदे, सचिव डॉ. आर. एम. कुलकर्णी, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. अमर आडके, डॉ. संगीता निंबाळकर उपस्थित होते.