शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
2
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
3
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
4
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
5
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
6
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
7
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
8
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
9
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
10
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
11
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
12
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
13
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
14
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
15
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
16
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
17
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
18
आम्ही गप्पा मारतो, तर पोलिसांना बोलावून बैठक का मोडतात? बीडमध्ये कत्तीने केले वार
19
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
20
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत कोरोना सक्रिय, प्रभाग समिती निष्क्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहर व परिसरात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहर व परिसरात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रभाग समिती पुन्हा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कोरोनाचा प्रसार वाढत असूनही इचलकरंजीत प्रभाग समिती अकार्यक्षम असल्याचे दिसत आहेत.

बाजाराचे नियोजन, कोरोनाबाधित नागरिकांचे अलगीकरण, प्रबोधन, सॅनिटायझेशन व प्रभागातील गोरगरिबांना अन्नधान्याची मदत अशा कामांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील ३१ प्रभागांमध्ये नागरिक व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी ३१ प्रभाग समित्यांची स्थापना केली होती. समितीमध्ये काही नगरसेवकांचे कार्यकर्ते, तर काही सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी होते.

गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रभाग समित्या स्वत:ला झोकून देऊन कार्य करत होते. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी मोठे सहकार्य लाभले होते. मात्र, सहा महिन्यांच्या कालावधीनंतर शहरातील कोरोनाचा प्रभाव ओसरत गेल्याने या समित्या शांत झाल्या. या समित्यांच्या सदस्यांना त्या काळात अनेक अडचणी येत होत्या. जीव धोक्यात घालून काम करत असतानाही नगरपालिका प्रशासनाने समित्यांच्या सदस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यातील कार्यक्षमता कमी होत गेली.

शहर व परिसरात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुस-या लाटेत रुग्णांची संख्या अधिक आहे. तर प्रशासनाने कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा दिला असून लहान मुलांना याचा धोका असल्याचे सांगितले आहे. या परिस्थितीचा विचार करता नगरपालिकेने कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रभाग समित्या पुन्हा कार्यान्वित करण्याची गरज असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

चौकट

प्रभाग समितीत

प्रत्येक प्रभाग समितीमध्ये भागातील दोन नगरसेवक, दोन नगरपालिकेचे कर्मचारी व चार ते पाच सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. सर्व ३१ प्रभागांमध्ये मिळून जवळपास १५० सामाजिक कार्यकर्ते प्रभाग समितीमध्ये होते. त्यांना प्राधान्याने लसही देण्यात आली नाही. तसेच लाट ओसरल्यावर प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, अशी भावना व्यक्त होत आहे.