शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
4
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
5
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
6
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
7
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
8
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
9
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
11
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
12
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
13
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
14
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
15
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
16
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
17
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
18
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
19
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
20
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...

इचलकरंजीची तहान भागणार तरी कधी ?

By admin | Updated: November 7, 2014 00:09 IST

नियोजनाचा अभाव : सर्वसामान्यांना भुर्दंड

राजाराम पाटील - इचलकरंजी -पंचगंगा व कृष्णा या सतत बारमाही वाहणाऱ्या नद्या आणि दोन्ही नद्यांवरून शहराला पाणी उपसा होत असूनही केवळ नियोजन व समन्वयाच्या अभावाने दोन ते तीन दिवसांतून पाणीपुरवठा होत असतो. नळांना मीटर बसविण्याची कणखर भूमिका लोकप्रतिनिधी व प्रशासन घेत नसल्याने अतिरिक्त पाणी वापरण्याचा भुर्दंड सर्वसामान्यांवर पडतो आहे, तर कृष्णा नळयोजनेच्या पाण्याची चोरी (गळती) मोठ्या प्रमाणावर होत असून, त्याचे पैसे शहरवासीयांच्या बोकांडी बसत आहेत.शहराला आवश्यक असलेले पाणी पंचगंगा नदीतून दोन पंपांमार्फत आणि कृष्णा नदीतून दोन पंपांच्या साहाय्याने उचलले जाते. पंचगंगेतील पाणी २५० अश्वशक्ती व १०० अश्वशक्तीच्या दोन पंपांतून उपसा केले जाते. या पंपातून दररोज आठ दशलक्ष लिटर पाणी मिळते, तर कृष्णा नदीतील ४६ दशलक्ष लिटर पाणी दररोज ५४० अश्वशक्तीच्या पंपाने उचलले जाते. अशाप्रकारे दररोज ५४ दशलक्ष लिटर पाणी उचलले जात असताना प्रत्यक्षात मात्र ४० दशलक्ष लिटर इतकेच पाणी शहरवासीयांना पुरविले जाते.कृष्णा नळपाणी योजनेद्वारे मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील नदीतून पाण्याचा उपसा करते. या पाण्याला कुरुंदवाड, शिरढोण, टाकवडेमार्गे इचलकरंजीत पोहोचण्यासाठी १७.६ किलोमीटर अंतर पार करावे लागते. या अंतरामध्ये विशेषत: शिरढोण व टाकवडे हद्दीत अनधिकृतरीत्या पाण्याच्या अनेक जोडण्या आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी असलेले एअरव्हॉल्व्ह ढिले करून तेथूनही पाण्याची चोरी होते, असा पालिकेकडील पाणी पुरवठा विभागाचा अहवाल आहे. अशा प्रकारच्या गळती-चोरीमुळे नदीतून ४६ दशलक्ष लिटर पाणी उचलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र ३८ दशलक्ष लिटर इतकेच पाणी जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत पोहोचते. पंचगंगा नदीतील व कृष्णा नदीतून उचललेल्या पाण्यावर जलशुद्धिकरण केंद्रामध्ये प्रक्रिया झाल्यानंतर शहरवासीयांना ४० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो.पाणी दोन ते तीन दिवसांतून एक वेळ पुरविले जात असल्याने नागरिक या पाण्याची साठवणूक करतात. त्याचबरोबर शहरामध्ये पाणीपुरवठा विभागाकडील अहवालानुसार ३७ हजार १३४ पाण्याच्या जोडण्या असून, त्यापैकी ८८६ जोडण्या औद्योगिक आहेत; पण शहरात विविध ठिकाणी असलेल्या झोपडपट्ट्या आणि अन्य वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक नळ पुरविले आहेत. त्यांची संख्या सुमारे ७०० असावी, असा अंदाज आहे. याशिवाय विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयांना ५०, पालिकेकडील सार्वजनिक सभागृहांना १२, सार्वजनिक शौचालयांना ४०, जलतरण तलावासाठी २ अशा जोडण्या देण्यात आल्या आहेत, तर पालिकेने बीओटी तत्त्वावर दिलेल्या जनावरांच्या कत्तलखान्यासाठी अडीच इंची नळाची जोडणी दिलेली आहे. अशा कारणांमुळे शहरवासीयांना दररोज आवश्यक असलेले ४० दशलक्ष लिटर पाणी असूनसुद्धा एक दिवसाआड पुरविले जाते.साधारणत: डिसेंबर महिन्यानंतर पंचगंगा नदीचे पाणी दूषित होते. परिणामी, पंचगंगेतील पाण्याचा उपसा जून महिन्यापर्यंत बंद केला जातो. या सहा महिन्यांच्या काळात फक्त कृष्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून राहिल्यामुळे तीन दिवसांतून एक वेळ असे पाणी शहरवासीयांना मिळते. सर्वसामान्य कुटुंबांना लागणाऱ्या पाण्यापेक्षा जादा पाणी श्रीमंत कुटुंबांना लागते. त्याचबरोबर उपहारगृहे व अन्य उद्योगधंदे असलेल्या औद्योगिक जोडण्यांनासुद्धा अधिक पाणी पुरवावे लागते. या सर्वच नळांना जलमापन मीटर नसल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांना श्रीमंतांसाठी लागणाऱ्या जादा पाण्याच्या आकारणीचा भुर्दंड बसतो. (क्रमश:)मीटर बसल्यास दररोज पाणी शक्यआदर्श प्रमाणानुसार नळाद्वारे प्रत्येक माणसी १३५ लिटर पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. इचलकरंजी शहरात असलेल्या तीन लाख लोकसंख्येला या प्रमाणानुसार ४०.५ दशलक्ष लिटर पाणी पुरविले पाहिजे. सध्या दररोज सरासरी ४० दशलक्ष लिटर प्रत्यक्ष पाण्याचा पुरवठा केला जातो. परिणामी, इचलकरंजीतील नळांना मीटर बसल्यास सध्याचे पाणी दररोज पुरविणे शक्य आहे.दररोज वीस टक्के पाण्याची बचतशहरात झोपडपट्ट्या व अन्य ठिकाणी देण्यात आलेल्या सुमारे ७०० सार्वजनिक नळ जोडण्या, सार्वजनिक शौचालयांच्या ४० नळ जोडण्या, छोट्या-मोठ्या १२ उद्यानांना सिंचन करण्यासाठीही दिलेले नळ, दोन जलतरण तलाव, १२ मंगल कार्यालये आणि कत्तलखान्याला दिलेली अडीच इंची नळ जोडणी यांचे योग्य नियोजन झाल्यास आणि सार्वजनिक नळ जोडण्या टप्प्याटप्प्याने बंद केल्यास दररोज किमान वीस टक्के पाण्याची बचत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.