शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीची तहान भागणार तरी कधी ?

By admin | Updated: November 7, 2014 00:09 IST

नियोजनाचा अभाव : सर्वसामान्यांना भुर्दंड

राजाराम पाटील - इचलकरंजी -पंचगंगा व कृष्णा या सतत बारमाही वाहणाऱ्या नद्या आणि दोन्ही नद्यांवरून शहराला पाणी उपसा होत असूनही केवळ नियोजन व समन्वयाच्या अभावाने दोन ते तीन दिवसांतून पाणीपुरवठा होत असतो. नळांना मीटर बसविण्याची कणखर भूमिका लोकप्रतिनिधी व प्रशासन घेत नसल्याने अतिरिक्त पाणी वापरण्याचा भुर्दंड सर्वसामान्यांवर पडतो आहे, तर कृष्णा नळयोजनेच्या पाण्याची चोरी (गळती) मोठ्या प्रमाणावर होत असून, त्याचे पैसे शहरवासीयांच्या बोकांडी बसत आहेत.शहराला आवश्यक असलेले पाणी पंचगंगा नदीतून दोन पंपांमार्फत आणि कृष्णा नदीतून दोन पंपांच्या साहाय्याने उचलले जाते. पंचगंगेतील पाणी २५० अश्वशक्ती व १०० अश्वशक्तीच्या दोन पंपांतून उपसा केले जाते. या पंपातून दररोज आठ दशलक्ष लिटर पाणी मिळते, तर कृष्णा नदीतील ४६ दशलक्ष लिटर पाणी दररोज ५४० अश्वशक्तीच्या पंपाने उचलले जाते. अशाप्रकारे दररोज ५४ दशलक्ष लिटर पाणी उचलले जात असताना प्रत्यक्षात मात्र ४० दशलक्ष लिटर इतकेच पाणी शहरवासीयांना पुरविले जाते.कृष्णा नळपाणी योजनेद्वारे मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील नदीतून पाण्याचा उपसा करते. या पाण्याला कुरुंदवाड, शिरढोण, टाकवडेमार्गे इचलकरंजीत पोहोचण्यासाठी १७.६ किलोमीटर अंतर पार करावे लागते. या अंतरामध्ये विशेषत: शिरढोण व टाकवडे हद्दीत अनधिकृतरीत्या पाण्याच्या अनेक जोडण्या आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी असलेले एअरव्हॉल्व्ह ढिले करून तेथूनही पाण्याची चोरी होते, असा पालिकेकडील पाणी पुरवठा विभागाचा अहवाल आहे. अशा प्रकारच्या गळती-चोरीमुळे नदीतून ४६ दशलक्ष लिटर पाणी उचलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र ३८ दशलक्ष लिटर इतकेच पाणी जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत पोहोचते. पंचगंगा नदीतील व कृष्णा नदीतून उचललेल्या पाण्यावर जलशुद्धिकरण केंद्रामध्ये प्रक्रिया झाल्यानंतर शहरवासीयांना ४० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो.पाणी दोन ते तीन दिवसांतून एक वेळ पुरविले जात असल्याने नागरिक या पाण्याची साठवणूक करतात. त्याचबरोबर शहरामध्ये पाणीपुरवठा विभागाकडील अहवालानुसार ३७ हजार १३४ पाण्याच्या जोडण्या असून, त्यापैकी ८८६ जोडण्या औद्योगिक आहेत; पण शहरात विविध ठिकाणी असलेल्या झोपडपट्ट्या आणि अन्य वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक नळ पुरविले आहेत. त्यांची संख्या सुमारे ७०० असावी, असा अंदाज आहे. याशिवाय विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयांना ५०, पालिकेकडील सार्वजनिक सभागृहांना १२, सार्वजनिक शौचालयांना ४०, जलतरण तलावासाठी २ अशा जोडण्या देण्यात आल्या आहेत, तर पालिकेने बीओटी तत्त्वावर दिलेल्या जनावरांच्या कत्तलखान्यासाठी अडीच इंची नळाची जोडणी दिलेली आहे. अशा कारणांमुळे शहरवासीयांना दररोज आवश्यक असलेले ४० दशलक्ष लिटर पाणी असूनसुद्धा एक दिवसाआड पुरविले जाते.साधारणत: डिसेंबर महिन्यानंतर पंचगंगा नदीचे पाणी दूषित होते. परिणामी, पंचगंगेतील पाण्याचा उपसा जून महिन्यापर्यंत बंद केला जातो. या सहा महिन्यांच्या काळात फक्त कृष्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून राहिल्यामुळे तीन दिवसांतून एक वेळ असे पाणी शहरवासीयांना मिळते. सर्वसामान्य कुटुंबांना लागणाऱ्या पाण्यापेक्षा जादा पाणी श्रीमंत कुटुंबांना लागते. त्याचबरोबर उपहारगृहे व अन्य उद्योगधंदे असलेल्या औद्योगिक जोडण्यांनासुद्धा अधिक पाणी पुरवावे लागते. या सर्वच नळांना जलमापन मीटर नसल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांना श्रीमंतांसाठी लागणाऱ्या जादा पाण्याच्या आकारणीचा भुर्दंड बसतो. (क्रमश:)मीटर बसल्यास दररोज पाणी शक्यआदर्श प्रमाणानुसार नळाद्वारे प्रत्येक माणसी १३५ लिटर पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. इचलकरंजी शहरात असलेल्या तीन लाख लोकसंख्येला या प्रमाणानुसार ४०.५ दशलक्ष लिटर पाणी पुरविले पाहिजे. सध्या दररोज सरासरी ४० दशलक्ष लिटर प्रत्यक्ष पाण्याचा पुरवठा केला जातो. परिणामी, इचलकरंजीतील नळांना मीटर बसल्यास सध्याचे पाणी दररोज पुरविणे शक्य आहे.दररोज वीस टक्के पाण्याची बचतशहरात झोपडपट्ट्या व अन्य ठिकाणी देण्यात आलेल्या सुमारे ७०० सार्वजनिक नळ जोडण्या, सार्वजनिक शौचालयांच्या ४० नळ जोडण्या, छोट्या-मोठ्या १२ उद्यानांना सिंचन करण्यासाठीही दिलेले नळ, दोन जलतरण तलाव, १२ मंगल कार्यालये आणि कत्तलखान्याला दिलेली अडीच इंची नळ जोडणी यांचे योग्य नियोजन झाल्यास आणि सार्वजनिक नळ जोडण्या टप्प्याटप्प्याने बंद केल्यास दररोज किमान वीस टक्के पाण्याची बचत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.