शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

इचलकरंजीची तहान भागणार तरी कधी ?

By admin | Updated: November 7, 2014 00:09 IST

नियोजनाचा अभाव : सर्वसामान्यांना भुर्दंड

राजाराम पाटील - इचलकरंजी -पंचगंगा व कृष्णा या सतत बारमाही वाहणाऱ्या नद्या आणि दोन्ही नद्यांवरून शहराला पाणी उपसा होत असूनही केवळ नियोजन व समन्वयाच्या अभावाने दोन ते तीन दिवसांतून पाणीपुरवठा होत असतो. नळांना मीटर बसविण्याची कणखर भूमिका लोकप्रतिनिधी व प्रशासन घेत नसल्याने अतिरिक्त पाणी वापरण्याचा भुर्दंड सर्वसामान्यांवर पडतो आहे, तर कृष्णा नळयोजनेच्या पाण्याची चोरी (गळती) मोठ्या प्रमाणावर होत असून, त्याचे पैसे शहरवासीयांच्या बोकांडी बसत आहेत.शहराला आवश्यक असलेले पाणी पंचगंगा नदीतून दोन पंपांमार्फत आणि कृष्णा नदीतून दोन पंपांच्या साहाय्याने उचलले जाते. पंचगंगेतील पाणी २५० अश्वशक्ती व १०० अश्वशक्तीच्या दोन पंपांतून उपसा केले जाते. या पंपातून दररोज आठ दशलक्ष लिटर पाणी मिळते, तर कृष्णा नदीतील ४६ दशलक्ष लिटर पाणी दररोज ५४० अश्वशक्तीच्या पंपाने उचलले जाते. अशाप्रकारे दररोज ५४ दशलक्ष लिटर पाणी उचलले जात असताना प्रत्यक्षात मात्र ४० दशलक्ष लिटर इतकेच पाणी शहरवासीयांना पुरविले जाते.कृष्णा नळपाणी योजनेद्वारे मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील नदीतून पाण्याचा उपसा करते. या पाण्याला कुरुंदवाड, शिरढोण, टाकवडेमार्गे इचलकरंजीत पोहोचण्यासाठी १७.६ किलोमीटर अंतर पार करावे लागते. या अंतरामध्ये विशेषत: शिरढोण व टाकवडे हद्दीत अनधिकृतरीत्या पाण्याच्या अनेक जोडण्या आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी असलेले एअरव्हॉल्व्ह ढिले करून तेथूनही पाण्याची चोरी होते, असा पालिकेकडील पाणी पुरवठा विभागाचा अहवाल आहे. अशा प्रकारच्या गळती-चोरीमुळे नदीतून ४६ दशलक्ष लिटर पाणी उचलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र ३८ दशलक्ष लिटर इतकेच पाणी जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत पोहोचते. पंचगंगा नदीतील व कृष्णा नदीतून उचललेल्या पाण्यावर जलशुद्धिकरण केंद्रामध्ये प्रक्रिया झाल्यानंतर शहरवासीयांना ४० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो.पाणी दोन ते तीन दिवसांतून एक वेळ पुरविले जात असल्याने नागरिक या पाण्याची साठवणूक करतात. त्याचबरोबर शहरामध्ये पाणीपुरवठा विभागाकडील अहवालानुसार ३७ हजार १३४ पाण्याच्या जोडण्या असून, त्यापैकी ८८६ जोडण्या औद्योगिक आहेत; पण शहरात विविध ठिकाणी असलेल्या झोपडपट्ट्या आणि अन्य वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक नळ पुरविले आहेत. त्यांची संख्या सुमारे ७०० असावी, असा अंदाज आहे. याशिवाय विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयांना ५०, पालिकेकडील सार्वजनिक सभागृहांना १२, सार्वजनिक शौचालयांना ४०, जलतरण तलावासाठी २ अशा जोडण्या देण्यात आल्या आहेत, तर पालिकेने बीओटी तत्त्वावर दिलेल्या जनावरांच्या कत्तलखान्यासाठी अडीच इंची नळाची जोडणी दिलेली आहे. अशा कारणांमुळे शहरवासीयांना दररोज आवश्यक असलेले ४० दशलक्ष लिटर पाणी असूनसुद्धा एक दिवसाआड पुरविले जाते.साधारणत: डिसेंबर महिन्यानंतर पंचगंगा नदीचे पाणी दूषित होते. परिणामी, पंचगंगेतील पाण्याचा उपसा जून महिन्यापर्यंत बंद केला जातो. या सहा महिन्यांच्या काळात फक्त कृष्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून राहिल्यामुळे तीन दिवसांतून एक वेळ असे पाणी शहरवासीयांना मिळते. सर्वसामान्य कुटुंबांना लागणाऱ्या पाण्यापेक्षा जादा पाणी श्रीमंत कुटुंबांना लागते. त्याचबरोबर उपहारगृहे व अन्य उद्योगधंदे असलेल्या औद्योगिक जोडण्यांनासुद्धा अधिक पाणी पुरवावे लागते. या सर्वच नळांना जलमापन मीटर नसल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांना श्रीमंतांसाठी लागणाऱ्या जादा पाण्याच्या आकारणीचा भुर्दंड बसतो. (क्रमश:)मीटर बसल्यास दररोज पाणी शक्यआदर्श प्रमाणानुसार नळाद्वारे प्रत्येक माणसी १३५ लिटर पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. इचलकरंजी शहरात असलेल्या तीन लाख लोकसंख्येला या प्रमाणानुसार ४०.५ दशलक्ष लिटर पाणी पुरविले पाहिजे. सध्या दररोज सरासरी ४० दशलक्ष लिटर प्रत्यक्ष पाण्याचा पुरवठा केला जातो. परिणामी, इचलकरंजीतील नळांना मीटर बसल्यास सध्याचे पाणी दररोज पुरविणे शक्य आहे.दररोज वीस टक्के पाण्याची बचतशहरात झोपडपट्ट्या व अन्य ठिकाणी देण्यात आलेल्या सुमारे ७०० सार्वजनिक नळ जोडण्या, सार्वजनिक शौचालयांच्या ४० नळ जोडण्या, छोट्या-मोठ्या १२ उद्यानांना सिंचन करण्यासाठीही दिलेले नळ, दोन जलतरण तलाव, १२ मंगल कार्यालये आणि कत्तलखान्याला दिलेली अडीच इंची नळ जोडणी यांचे योग्य नियोजन झाल्यास आणि सार्वजनिक नळ जोडण्या टप्प्याटप्प्याने बंद केल्यास दररोज किमान वीस टक्के पाण्याची बचत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.