शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

इचलकरंजीत रिमझिम पावसातच अनेक ठिकाणी साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

इचलकरंजी : पावसाळा सुरू झाल्याने सध्या शहर व परिसरात काही दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. खऱ्या पावसाला अद्याप सुरुवात ...

इचलकरंजी : पावसाळा सुरू झाल्याने सध्या शहर व परिसरात काही दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. खऱ्या पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. तरी थोड्याशा पावसाने शहरात अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या आहेत. तर मुख्य रस्त्यावर पाणी साचलेले आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरातील पाटील मळा परिसरात गटर तुंबल्यामुळे तेथील दुकानाच्या दारात तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

गटारी तुंबून पाणी साठत असल्याने सर्व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर व दुकानात शिरत आहे. त्यामुळे भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी याबाबत नगरपालिकेत तक्रार देऊनसुद्धा कोणतेही काम होताना दिसत नाही.

तसेच मुख्य मार्गावरील के. एल. मलाबादे चौक परिसरात असलेल्या दुकानासमोर पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यातूनच वाहतूक सुरू आहे. गटारी तुंबल्याने व पाणी निचरा होण्यास मार्ग नसल्याने रस्त्यावरच पाणी साचून राहिले आहे. या मार्गावर नेहमी वर्दळ असल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. तसेच या भागातील व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. नगरपालिकेच्या या भोंगळ कारभाराला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नगरपालिकेने त्वरित या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी भागातील नागरिकांतून होत आहे.

नागरिक आरोग्य काळजीने चिंताग्रस्त

सध्या शहर व परिसराला कोरोना संसर्गाने ग्रासले आहे. प्रत्येक नागरिक या महामारीपासून वाचण्यासाठी स्वतःची काळजी करत आहे. मात्र नगरपालिका आरोग्यविषयक बाबींवर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळात इतर अनेक साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत असल्याने नागरिक आपल्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजीने चिंताग्रस्त झाले आहेत.

फोटो ओळी

1) इचलकरंजीतील मुख्य मार्गावरील के. एल. मलाबादे चौक परिसरातील दुकानासमोर साचलेले पाणी.

2) पाटील मळा परिसरात गटर तुंबल्यामुळे तेथील दुकानाच्या दारात तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.