शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत लॉकडाऊनमुळे गरजूंवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : गरीब, गरजू व निराधार लोकांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळत होता. किमान एकवेळच्या जेवणाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : गरीब, गरजू व निराधार लोकांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळत होता. किमान एकवेळच्या जेवणाची सोय होत असल्याने फिरस्त्यांच्या पोटात दोन घास जात होते. मात्र, जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केल्याने शिवभोजन थाळीवर अवलंबून असणाऱ्या गरजूंवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे काही नियम व अटींवर केंद्र सुरू करण्याची आवश्यकता भासत आहे.

इचलकरंजी शहरात मोठे तळे, पाटील मळा, डेक्कन रोड व गणेशनगरजवळ अशा चार ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या चार केंद्रांत दररोज एकूण ५६१ लोकांना थाळी दिली जाते. लोकसंख्येच्या प्रमाणात थाळ्यांची संख्या अल्प असली तरी काहीजणांना याचा मोठा आधार मिळत होता. परंतु लॉकडाऊनमुळे शिवभोजन थाळीवर अवलंबून असणाऱ्यांचे खूप हाल होत आहेत.

शहर व परिसरात अनेक सामाजिक संस्था व संघटनांमार्फत घरपोच किंवा जागेवर जाऊन जेवण पोहोच केले जात आहेत. मात्र, त्यांच्यावर नियमांचे बंधन येत असल्यामुळे शहरातील अनेक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व शिवभोजन केंद्र बंद केल्यामुळे अनेकांना एकवेळच्या जेवणापासून देखील वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होताना दिसत आहे.

प्रतिक्रिया

शहरात कडक लॉकडाऊन असल्यामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार शिवभोजन थाळी केंद्र बंद केले आहे. जोपर्यंत प्रशासनाकडून केंद्र सुरू करण्यासंदर्भात कोणताही आदेश प्राप्त होत नाही, तोपर्यंत केंद्र बंदच ठेवावे लागणार आहे. याचा गरिबांना त्रास सहन करावा लागत आहे.

अरुण साळुंखे, शिवभोजन थाळी केंद्रचालक

शिवभोजन केंद्र बंद असल्यामुळे फिरस्त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. काही जण रोज केंद्रावर येऊन थोड तरी अन्न द्या, दोन घास तरी मिळू देत, अशी विनवणी करत असतात. अनेक फिरस्ते व गरजू केंद्रावर मिळणाऱ्या जेवणावरच अवलंबून असतात. त्यांचा विचार करता प्रशासनाने निर्णयात थोडाफार बदल करावा.

ज्ञानेश्वर पिसे, शिवभोजन थाळी केंद्रचालक

फोटो ओळी

२००५२०२१-आयसीएच-०२

इचलकरंजीत लॉकडाऊन जाहीर केल्याने शिवभोजन केंद्र बंद आहे. त्यामुळे गरजूंवर उपासमारीची वेळ आली आहे.