शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

इचलकरंजीत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया!

By admin | Updated: February 21, 2017 01:20 IST

पालिका सभेत प्रस्ताव : जैविक खतनिर्मिती करण्याची पुणे येथील संस्थेची तयारी

इचलकरंजी : शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने कचरा डेपोवर हजारो टन कचरा साचला असताना दररोज जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून जैविक खतनिर्मिती करण्याची तयारी पुणे येथील एका संस्थेने दाखविली आहे. दररोज दहा टन कचऱ्यावर संस्थेने प्रक्रिया करण्याचा प्रयोग यशस्वी केला तर नगरपालिकेच्यावतीने त्या संस्थेला ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वाने प्रकल्प उभारण्यास मंजुरी मिळेल. त्यामुळे शहरात दररोज मिळणाऱ्या ७० टन वजनाच्या कचऱ्याची विल्हेवाट लागण्याची आशा निर्माण झाली आहे.आसरानगरजवळ शहरातील कचरा एकत्रित गोळा करून टाकण्यात येणारा कचरा डेपो आहे. त्या ठिकाणच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत, विटा, इंधन व भंगार तयार करण्याचा प्रकल्प नवी मुंबई येथील हायड्रो टेक या संस्थेने सन २००६ मध्ये उभारला आहे. त्यावेळी सदर प्रकल्पामध्ये दररोज ८० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता होती. त्याप्रमाणे या संस्थेने तीन वर्षे हा प्रकल्प चालविला. त्यानंतर मात्र प्रकल्प चालविण्यामध्ये नुकसान येऊ लागल्याने हा प्रकल्प बंद पडला. नगरपालिकेकडून या संस्थेला नोटिसा देण्यात आल्या. तसेच हा प्रकल्प चालू ठेवावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सध्या या संस्थेने दररोज आठ तास प्रकल्प चालू ठेवून ३० टन इतक्याच कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे.सद्य:स्थितीला इचलकरंजी शहरात दररोज १३० ते १४० टनपर्यंत कचरा जमा होत असतो. मात्र, या सर्व कचऱ्यांवर प्रक्रिया होत नसल्याने हजारो टन कचरा या डेपोवर साचून राहू लागला आहे. साचलेल्या कचऱ्यास वारंवार आग लागण्याचे प्रकार होत असून, त्यामुळे आसपासच्या नागरी वसाहतींना त्रास होत आहे. म्हणून या नागरिकांकडून आंदोलने केली जात आहेत.या पार्श्वभूमीवर पुणे येथील श्री इंजिनिअर्स या संस्थेने इचलकरंजीतील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून जैविक खतनिर्मिती करण्याची तयारी दर्शवली. या संस्थेला नगरपालिकेने योग्य ते निकष लावून घनकचरा प्रक्रिया करण्यास मंजुरी द्यावी, अशा आशयाचे शिफारस पत्र खासदार राजू शेट्टी यांनी दिले आहे. त्यामुळे या संस्थेस दररोज दहा टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास प्रायोगिक तत्त्वावर मंजुरी द्यावी, अशा आशयाचा प्रस्ताव नगरपालिकेच्या २२ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेसमोर चर्चेस ठेवण्यात आला आहे. दहा टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास या संस्थेला यश आले तर त्या प्रकल्पाची क्षमता वाढविण्यास मंजुरी दिली जाणार आहे. परिणामी शहरातील आठवडी बाजार, खानावळी, उपाहारगृहे, फेरीवाले, आदी ठिकाणी तयार होणाऱ्या दररोजच्या ७० टन वजनाच्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा नगरपालिका प्रशासनास वाटत आहे. (प्रतिनिधी)