शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

‘मी कर्जमुक्त होणारच’ शिवसेनेचे सह्यांची मोहीम

By admin | Updated: May 28, 2017 17:53 IST

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पदाधिकारी ५ लाख अर्ज गोळा करणार

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २८ : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे,यासाठी शिवसेनेने आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला असून ‘मी कर्जमुक्त होणारच’ हे अभियान कोल्हापूरात उद्यापासून सुरू होत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवसेनेचे पदाधिकारी पाच लाख अर्ज गोळा करून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे देणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेनेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाशिक येथे कृषी मेळावा घेऊन कर्जमुक्तीसाठी रणशिंग फुंकले आहे. ज्याच्या जीवावर आज देशाचा डोलारा उभा आहे, तोच शेतकरी संकटात सापडला असताना सरकार गप्प बसणार असेल तर शिवसेना कदापि सहन करणार नसल्याचे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या भावना व वेदना मुख्यमंत्र्यांना कळाव्यात यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी थेट बांधावर जाऊन त्यांना धीर देऊन प्रश्नोत्तराच्या स्वरूपात भावना गोळा करणार आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून ५० हजार असे जिल्ह्यातून पाच लाख अर्ज एकत्रीत करून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठविणार आहे. उद्या, दुपारी बारा वाजता कंदलगाव (ता. करवीर) येथून या मोहिमीची सुरूवात होणार असून जून अखेर सह्यांचे सर्व अर्ज पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर व संपर्क प्रमुख अरूणभाई दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली सेवाभवनावर देणार असल्याचे संजय पवार यांनी सांगितले. त्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लॉँगमार्च काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांच्या लिखित भावना पोहचवणार असल्याचे विजय देवणे व मुरलीधर जाधव यांनी सांगितले.

यावेळी देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, शिवसेनेचे शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस आदी उपस्थित होते. बारा प्रश्नांतून सरकारचा पंचनामा! शिवसेनेच्या प्रश्नावलीत बारा प्रश्न आहेत. त्याच्या माध्यमातून सरकारच्या सर्व योजना व त्याच्या वस्तूस्थितीचा पंचनामा करण्याचा प्रयत्न आहे.