शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

‘स्वाभिमानी’चा कस लागणार

By admin | Updated: October 13, 2015 00:03 IST

‘एफआरपी’ एकरकमी हवी : सह्यांच्या मोहिमेला प्रतिसाद, ऊसदरप्रश्नी कारखान्यांबाबत शेतकऱ्यांत संताप

गणपती कोळी - कुरूंदवाड--ऊस उत्पादन खर्च व दर याचा ताळमेळ बसत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम तीन टप्प्यांत देण्याच्या चर्चेमुळे शेतकरी भडकला आहे. या प्रश्नाला न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्रीय झाली असून, थंडावलेल्या संघटनेला या निमित्ताने संधी मिळाली आहे. ‘एफआरपीची रक्कम एकरकमी हवी’ या मागणीचे स्वाभिमानीकडून मिळालेल्या अर्जाला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. १६) साखर संचालक कार्यालयावर होणाऱ्या मोर्चावर शेतकऱ्यांबरोबर स्वाभिमानीचाही कस लागणार आहे.बारमाही वाहणाऱ्या नद्या, सुपीक जमीन, योग्य हवामान यामुळे पश्चिम महाराष्ट्र विशेषत: कोल्हापूर, सांगली, कर्नाटक सीमा भाग ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच अभ्यासू व कष्टाळू शेतकऱ्यांमुळे चांगल्या उताऱ्याचे विक्रमी उत्पादन शेतकरी घेत आहेत. त्यामुळे या भागात साखर कारखानदारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.उसाला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा देण्यासाठी खा. राजू शेट्टी यांचे नेतृत्व शेतकऱ्यांना मिळाले. आंदोलनातून उसाच्या दराबाबत योग्य मागणी, योग्यवेळी थांबण्याची भूमिका व विश्वासात्मक तडजोड हे खा. शेट्टी यांनी अंगिकारल्याने ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिला. यातून उसाला समाधानकारक दर मिळाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. शिवाय नेतृत्वाची उतराई म्हणून खा. शेट्टी यांना राजकारणात व्होट बरोबर नोटही देत जिल्हा परिषद, आमदार, दोनवेळा खासदार करून शेतकऱ्यांनी इमानीपणा दाखविला.यंदा गळीत हंगाम चालू होण्यापूर्वीच साखर कारखानदारांनी एफआरपी (किमान लाभकारी मूल्य)ची रक्कम तीन टप्प्यांत देण्याची भूमिका घेतल्याने मुळातच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी अधिकच भडकला आहे. याच संधीचा फायदा घेत थंडावलेल्या स्वाभिमानी संघटनेने पुन्हा आंदोलनाची डरकाळी फोडली आहे. ऊसदर नियंत्रण अध्यादेश १९६६ नुसार एफआरपी कायद्याप्रमाणे एकरकमी मिळावी, याबाबत शेतकऱ्यांना स्वाभिमानीने लेखी अर्ज दिले असून, सदर अर्ज भरून साखर सहसंचालकांना मोर्चाद्वारे देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचा संचालक असला तरी तीन हप्त्यांमधील रक्कम न परवडणारी असल्याने स्वाभिमानीच्या या अर्जाला गावागावांतून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा या मागणीसाठी खा. शेट्टी यांचा हात धरला असून, शुक्रवारी (दि. १६) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावरील मोर्चानंतर होणाऱ्या निर्णयावर शेतकऱ्यांबरोबर स्वाभिमानीचाही कस लागणार आहे.शेतकरी अरिष्टात : गत हंगामात शेतकऱ्यांच्या पदरी निराशागेल्या गळीत हंगामापासून उत्पादन खर्च वाढल्याने व उताऱ्यात घट आल्याने तसेच पहिली उचलही वेळेवर न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अरिष्ठात सापडला आहे. त्यातच खा. शेट्टी यांनी राजकारणातच अधिक लक्ष केंद्रित केल्याने व सत्ताधाऱ्यांशी राजकीय सोयरिक केल्याने त्यांची कोंडी झाली आहे. परिणामी, गत गळीत हंगामातील आंदोलनाबाबत शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. शिवाय वर्षभरात स्वाभिमानीमध्ये झालेली पडझड, आमदार उल्हास पाटील यांनी स्वाभिमानीला ठोकलेला रामराम अन् विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश यामुळे स्वाभिमानी थंडावली होती.