शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

बँका सुरू ठेवून कोरोनाची साखळी कशी तुटेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:23 IST

रमेश पाटील कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारपासून सुरू होणाऱ्या कडक लॉकडाऊनमध्ये सर्वच क्षेत्रांतील बँकांचा समावेश करावा, अशी ...

रमेश पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारपासून सुरू होणाऱ्या कडक लॉकडाऊनमध्ये सर्वच क्षेत्रांतील बँकांचा समावेश करावा, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनेमधून होऊ लागली आहे. बँका सुरू ठेवून कोरोनाची साखळी कशी तुटेल? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. बँक सेवा ही अत्यावश्यक सेवेत मोडते; पण ही सेवा देताना अनेक कर्मचारी बाधित झाले, तर काहींचा मृत्यू झाला. त्यामुळे कडक लॉकडाऊनमध्ये बँकांचा समावेश करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

सध्या लॉकडाऊन असला तरी बँकांमधील गर्दी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पेन्शन, पगार, ठेवीवरचे मासिक व्याज आणि शासकीय अनुदानाची जमा झालेली रक्कम काढण्यासाठी बँकांत मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी ठरते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात काही दिवस बँका बंद कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.

आपत्ती व्यवस्थापन नियमानुसार प्रत्येक जिल्ह्यात बँकांचे कामकाज चालू ठेवण्याचा अथवा बंद ठेवण्याचा अधिकार जिल्ह्यातील बँकर्स कमिटीला असतो. या कमिटीचे जिल्हाधिकारी व लीड बँकेचे अधिकारी सदस्य असतात. एखाद्या आपत्ती काळात ते बँका चालू - बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात. असाच निर्णय सध्या शनिवारपासून होणाऱ्या कडक लॉकडाऊनमध्ये बँकांबाबत घ्यावा, अशी मागणी होत आहे.

सध्या बँकांचे दैनंदिन कामकाज सकाळी १० ते २ या वेळेत ५० टक्के कर्मचारीवर्गावर सुरू आहे. मात्र, या वेळात बँकांत तुडुंब गर्दी होते. जर बँका लॉकडाऊन काळात बंद झाल्या, तर होणारी गर्दी टळेल. शिवाय या काळात बँका बंद राहिल्या तरीही बँकांचे ग्राहक ऑनलाइन व्यवहार करू शकतात. या सर्व गोष्टींचा विचार करून या लॉकडाऊनमध्ये बँकांचा समावेश करावा, अशी मागणी बँक कर्मचारी युनियनमधून होत आहे.

चौकट:

बँका बंद ठेवता येतात

गेल्या एक वर्षाहून अधिक काळात लॉकडाऊनमध्येही बँकांनी ग्राहकांना सेवा दिली आहे. ही सेवा देत असताना अनेक कर्मचारी कोरोनाने बाधित झाले. काहींचा मृत्यू झाला. केंद्र सरकारने बँक कर्मचाऱ्यांना कोरोनायोद्धा म्हणून संबोधले आहे. सध्या बँका सुरू असल्याने बँकेत ग्राहकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात होते. जर ही गर्दी कमी करायची असेल व कोरोनाची साखळी तोडायची असेल, तर लॉकडाऊनच्या काळात काही दिवस बँका बंद ठेवणे गरजेचे आहे.

-सूर्यकांत कर्णिक

ऑ. सेक्रेटरी, सरकारी बँक कर्मचारी युनियन