शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

वंशाच्या दिव्यात किती नकुशी होरपळणाऱ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:38 IST

कोल्हापूर : ‘घराण्याला वंशाचा दिवा हवाच,’ या पुरुषसत्ताक मानसिकतेतून आजही मातेच्या गर्भात स्त्रीभ्रूणाची हत्या होते. कधी-कधी जन्मदाती आईच नवजात मुलीसाठी मृत्यूची शय्या तयार करते, हे विदारक वास्तव आहे. स्त्रीच्या गर्भातून मुलगी जन्माला यावी की मुलगा याला मुख्यत्वे पुरुषच जबाबदार असताना स्त्रीला मात्र कौटुंबिक आणि सामाजिक दबावामुळे मुलीची हत्या करण्याचे पाऊल ...

ठळक मुद्दे मुलगाच पाहिजे मानसिकतेची बळी अजून किती नकोशींचे आयुष्य जाळत जाणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.पुरुषप्रधान संस्कृती आणि वारसा या समजुतीची मुळे समाजमनात इतक्या खोलवर रुजली आहेत हे पाऊल उचलायला भाग पाडणारी सासरची मंडळी आणि विशेषत: पती ‘मी नाही त्यातला’ म्हणून मुक्तपणे समाजात वावरतो.

कोल्हापूर : ‘घराण्याला वंशाचा दिवा हवाच,’ या पुरुषसत्ताक मानसिकतेतून आजही मातेच्या गर्भात स्त्रीभ्रूणाची हत्या होते. कधी-कधी जन्मदाती आईच नवजात मुलीसाठी मृत्यूची शय्या तयार करते, हे विदारक वास्तव आहे. स्त्रीच्या गर्भातून मुलगी जन्माला यावी की मुलगा याला मुख्यत्वे पुरुषच जबाबदार असताना स्त्रीला मात्र कौटुंबिक आणि सामाजिक दबावामुळे मुलीची हत्या करण्याचे पाऊल उचलावे लागते. दुसरीकडे, अशा गुन्'ाला कारणीभूत असलेले पुरुष मात्र कायद्याच्या कचाट्यातून नामानिराळे राहिले आहेत. या ‘वंशाच्या दिव्या’चा अट्टहास आणखी किती मुलींचे आयुष्य होरपळून टाकणार, हा मुख्य सामाजिक प्रश्न आहे.

स्त्री-समानतेच्या कितीही कथा सांगितल्या जात असल्या तरी मंगळवारी (दि. २९) गडमुडशिंगी येथे मातेने मुलीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची घटना म्हणजे अजूनही पुरुषी सत्तेचे आणि अहंकाराचेच द्योतक आहे. पहिल्या पत्नीला चार मुलीच झाल्याने नवºयाने तिला सोडून दुसरे लग्न केले. दुसºया पत्नीलाही ‘मुलगाच जन्मला पाहिजे,’ अशी तंबी देण्यात आली. मात्र पाचवीही मुलगीच झाली आणि तीही थोडीशी व्यंग असलेली; त्यामुळे मातेने आणि आजीनेच मिळून मंगळवारी नवजात मुलीला खड्ड्यात पुरून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या जीवनाची दोरी बळकट म्हणून ती वाचली. या प्रकरणी आई आणि आजीवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र तिला हे पाऊल उचलायला भाग पाडणारी सासरची मंडळी आणि विशेषत: पती ‘मी नाही त्यातला’ म्हणून मुक्तपणे समाजात वावरतो. स्त्री मात्र पुन्हा समाजाच्या दृष्टीने गुन्हेगार ठरते.तेकडूनच नवजात मुलीचा खून झाला. तिला रस्त्यावर, कचराकुंडीत, कधी मंदिराच्या दारात सोडले जाते. या घटना प्रकाशात आल्या की ‘माता तू न वैरिणी’ अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध होतात. महासत्तेच्या दिशेने पाऊल टाकणाºया भारतात मात्र पुरुषप्रधान संस्कृती आणि वारसा या समजुतीची मुळे समाजमनात इतक्या खोलवर रुजली आहेत की, त्या मानसिकतेत खुनासारखा गुन्हा करण्यासाठीही मागे-पुढे पाहिले जात नाही. त्यासाठी महिलेला हतबल केले जाते. मुळातच चार मुली असलेल्या पुरुषाशी लग्न करणे आणि मुलगी झाली म्हणून पती नांदवणार नाही या भीतीपोटी मातेने हे पाऊल उचलणे म्हणजे तिच्यावर किती वाईट पद्धतीने दबाव टाकला गेला असेल याचा विचार व्हायला हवा. आज तिच्यावर आणि आजीवर गुन्हा नोंद झाला; पण पतीने वंशाच्या दिव्याचा हट्ट सोडला नाही. हा दिवा अजून किती नकोशींचे आयुष्य जाळत जाणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.मुलगा-मुलगी पुरुषावरच अवलंबूनस्त्रीमध्ये एक्स गुणसूत्रे असतात. पुरुषांमध्ये एक्स आणि वाय अशी दोन गुणसूत्रे असतात. स्त्रीबीजाशी पुरुषाच्या एक्स गुणसूत्राचे फलन झाले की मुलगी आणि वाय गुणसूत्राचे फलन झाले की मुलगा जन्मतो. त्यामुळे स्त्रीच्या गर्भातून मुलगा जन्मावा की मुलगी याला पुरुषच सर्वस्वी जबाबदार ठरतो. मा़त्र जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना घडतच राहणार.- डॉ. सतीश पत्की

नवरा सोडून देईल या भीतीपोटी मातेलाच मुलीला जिवे मारण्यापर्यंतचे पाऊल उचलावे लागते, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्याकडे अजूनही विवेकाने लग्न केले जात नाही. पुरुषी मानसिकतेने स्त्रीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण केला आहे. अशा प्रकरणांमध्ये आधी पुरुषावर गुन्हा नोंद होऊन त्याला शिक्षा झाली पाहिजे.- तनुजा शिपूरकर (सामाजिक कार्यकर्त्या)

कायद्यानुसार या गुन्'ात स्त्री दोषी दिसत असली तरी तिच्यावर मुलगाच पाहिजे याचा किती दबाव असेल हे गुन्'ातूनच सिद्ध झाले आहे. पुरुषी अहंकाराखाली स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्वच नाकारले गेले आहे. गावातील शेजाºयांनी ही घटना उघडकीस आणून मुलीला वाचविले हेही नसे थोडके; पण हे परिवर्तन समाजातील तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे.- डॉ. शुभदा दिवाण (समुपदेश