शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

वडनेरे समितीने सुचविलेल्या किती उपाययोजना केल्या..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंचगंगा नदीला आलेल्या महापुरावर उपाययोजना म्हणून नदीतील गाळ, वाळू काढण्यासाठी समिती नेमण्याची, उपमुख्यमंत्री अजित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पंचगंगा नदीला आलेल्या महापुरावर उपाययोजना म्हणून नदीतील गाळ, वाळू काढण्यासाठी समिती नेमण्याची, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा ही जनतेच्या डोळ्यात फेकलेली धूळच ठरणार असल्याची टीका अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने उदय नारकर व अमोल नाईक यांनी केली आहे. वडनेरे समितीच्या अहवालातील आपल्याशी संबंधित किती उपाययोजना केल्या आहेत, याचा हिशेब कोल्हापूर महापालिकेने आणि शासनाने दिला पाहिजे. याबाबतीत पाठपुरावा करायचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेने घेतला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, वडनेरे समितीने प्रामुख्याने नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकामे, शासनाचे रस्त्यांवरील अशास्त्रीय पद्धतीने बांधलेले पुलाचे भराव जबाबदार असल्याचे म्हटले आहे. वडनेरे समितीच्या शिफारशींकडे शासनाने गुन्हेगारी स्वरूपाचे दुर्लक्ष केले आहे. नदीत गावे वसवायची आणि पूर्वापार वसलेली गावे उठवायची, हा कसला कारभार आहे? बेसुमार बांधकामे करून पाणी तुंबवायचे आणि चिखलीसारखी गावे उठवा, म्हणून ओरड करायची, हा प्रकार थांबला पाहिजे. कोल्हापूर महानगरपालिकेने प्रथम आपल्या चुका पदरात घेऊन सुधारणा केल्या पाहिजेत. रस्त्याच्या नावाने बांधलेली जागोजागीची ’धरणे’ शासनाने काढून जनतेला बुडण्यापासून वाचविण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला पाहिजे.

त्यासाठी सर्वप्रथम राज्य शासनाने स्वीकारलेल्या जनतेने कोल्हापूर महापालिका आणि राज्य सरकारला याबाबतीत जागे करण्याच्या कामात साथ द्यावी, असे आवाहन सभेने केले आहे.

यावेळी सभेचे कार्यकर्ते नारायण गायकवाड (जांभळी), विकास पाटील (इंगळी), आप्पा परीट (चंदूर), अरुण मांजरे (बुबनाळ), प्रवीण जाधव (लिंगनूर कापशी), चंद्रकांत कुरणे (गिरगाव), प्रा. डी. एन. पाटील (तारळे), संभाजीराव मोहिते (नूल), राजा शिंदे (हुपरी), अनिल जंगले (रांगोळी), विनायक डंके (यळगुड) उपस्थित होते.