शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

साखरेला २३५० आणि उसाला २५०० कसे देणार..?

By admin | Updated: September 26, 2015 00:15 IST

कारखानदारांची विचारणा : गत हंगामातही ‘एफआरपी’ दोन टप्प्यांत

कोल्हापूर : सध्या बाजारात साखरेचा दर क्ंिवटलला २३५० रुपये असताना उसाला प्रती टन २५०० रुपये रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) द्यायची कशी, अशी विचारणा कारखानदारांकडून होत आहे; म्हणूनच साखर संघाने एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. त्याचा फैसला आता कारखान्यांच्या वार्षिक सभेत होणार असून ऊस बिलाचे काय करायचे हे आता शेतकऱ्यांनीच ठरवायचे आहे.मुंबईत गुरुवारी मंत्री समितीची बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एफआरपी देण्यावर ठाम राहिले. ती न दिल्यास कारखान्यांवर कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी तीन टप्प्यांत एफआरपीबाबत स्पष्टपणे कोणतीच भूमिका न घेता शेतकरी संघटना व संबंधित घटक यांच्याशी बोलून निर्णय व्हावा, असे सूतोवाच केले आहे. कारखाने हे शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत व त्यांनीच वार्षिक सभेत ठराव करून तीन टप्प्यांतील एफआरपीला मान्यता दिल्यास सरकारला काय अडचण आहे, असे साखर संघाचे म्हणणे आहे.बाजारातील साखरेचा दर अजूनही प्रती क्विंटल २३०० ते २३५० रुपयांमध्येच घुटमळत आहे. राज्याचा सरासरी उतारा ११.३० टक्के आहे. त्यानुसार प्रती क्विंटलला २१६४ रुपये द्यावे लागतात. कोल्हापूर-सांगली-सातारा जिल्ह्यांतील उतारा १२.५० टक्क्यांपर्यंत जातो. त्यामुळे त्यानुसार हिशेब केल्यास २४५० ते २६०० रुपयांपर्यंत एकरकमी एफआरपी द्यावी लागेल. बाजारात साखरेला प्रती क्विंटल २३५० रुपये मिळणार असतील तर, शेतकऱ्यांना एकरकमी २४५० रुपये आम्ही कसे देणार, अशी विचारणा त्यामुळेच कारखानदार करू लागले आहेत. राज्यातील १७९ पैकी फक्त १७ कारखान्यांनी एकरकमी पूर्ण हंगामाची एफआरपी दिली आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले सॉफ्ट लोन मिळाले तरी सरासरी टनामागे १५० ते २५० रुपये शेतकऱ्यांना देता येत नाहीत. (प्रतिनिधी) दबाव सर्वांवरच...आता अशा अडचणीच्या स्थितीत सरकार, शेतकरी संघटना व स्वत: शेतकरी यांचीच कसोटी लागणार आहे. शेतकरी संघटनांचा दबाव राज्य सरकार व कारखानदारांच्यावरही असेल. एफआरपीची मोडतोड होऊ देणार नाही, असे खासदार राजू शेट्टी व रघुनाथदादा पाटील यांनीही गुरुवारीच जाहीर केले आहे. पाऊस कमी झाल्यामुळे यंदा उसाच्या उत्पादनात घट होणार असली तरी पिकविलेला ऊस गाळप करण्याचे आव्हान आहे. त्यामुळेच या हंगामातही सगळेच घटक कोंडीत सापडले आहेत.