शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

साखरेला २३५० आणि उसाला २५०० कसे देणार..?

By admin | Updated: September 26, 2015 00:15 IST

कारखानदारांची विचारणा : गत हंगामातही ‘एफआरपी’ दोन टप्प्यांत

कोल्हापूर : सध्या बाजारात साखरेचा दर क्ंिवटलला २३५० रुपये असताना उसाला प्रती टन २५०० रुपये रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) द्यायची कशी, अशी विचारणा कारखानदारांकडून होत आहे; म्हणूनच साखर संघाने एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. त्याचा फैसला आता कारखान्यांच्या वार्षिक सभेत होणार असून ऊस बिलाचे काय करायचे हे आता शेतकऱ्यांनीच ठरवायचे आहे.मुंबईत गुरुवारी मंत्री समितीची बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एफआरपी देण्यावर ठाम राहिले. ती न दिल्यास कारखान्यांवर कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी तीन टप्प्यांत एफआरपीबाबत स्पष्टपणे कोणतीच भूमिका न घेता शेतकरी संघटना व संबंधित घटक यांच्याशी बोलून निर्णय व्हावा, असे सूतोवाच केले आहे. कारखाने हे शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत व त्यांनीच वार्षिक सभेत ठराव करून तीन टप्प्यांतील एफआरपीला मान्यता दिल्यास सरकारला काय अडचण आहे, असे साखर संघाचे म्हणणे आहे.बाजारातील साखरेचा दर अजूनही प्रती क्विंटल २३०० ते २३५० रुपयांमध्येच घुटमळत आहे. राज्याचा सरासरी उतारा ११.३० टक्के आहे. त्यानुसार प्रती क्विंटलला २१६४ रुपये द्यावे लागतात. कोल्हापूर-सांगली-सातारा जिल्ह्यांतील उतारा १२.५० टक्क्यांपर्यंत जातो. त्यामुळे त्यानुसार हिशेब केल्यास २४५० ते २६०० रुपयांपर्यंत एकरकमी एफआरपी द्यावी लागेल. बाजारात साखरेला प्रती क्विंटल २३५० रुपये मिळणार असतील तर, शेतकऱ्यांना एकरकमी २४५० रुपये आम्ही कसे देणार, अशी विचारणा त्यामुळेच कारखानदार करू लागले आहेत. राज्यातील १७९ पैकी फक्त १७ कारखान्यांनी एकरकमी पूर्ण हंगामाची एफआरपी दिली आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले सॉफ्ट लोन मिळाले तरी सरासरी टनामागे १५० ते २५० रुपये शेतकऱ्यांना देता येत नाहीत. (प्रतिनिधी) दबाव सर्वांवरच...आता अशा अडचणीच्या स्थितीत सरकार, शेतकरी संघटना व स्वत: शेतकरी यांचीच कसोटी लागणार आहे. शेतकरी संघटनांचा दबाव राज्य सरकार व कारखानदारांच्यावरही असेल. एफआरपीची मोडतोड होऊ देणार नाही, असे खासदार राजू शेट्टी व रघुनाथदादा पाटील यांनीही गुरुवारीच जाहीर केले आहे. पाऊस कमी झाल्यामुळे यंदा उसाच्या उत्पादनात घट होणार असली तरी पिकविलेला ऊस गाळप करण्याचे आव्हान आहे. त्यामुळेच या हंगामातही सगळेच घटक कोंडीत सापडले आहेत.