शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष अन् संचालकांचीच मुले नोकरीला कशी?

By admin | Updated: June 17, 2015 00:40 IST

संघाने फाडला समितीचा बुरखा : उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा

सातारा : शिक्षक बँकेच्या नोकरभरतीत सर्वसामान्य सभासदांची मुले नोकरीला लागल का? चेअरमनव संचालकांचीच मुले नोकरीत कशी लागली? सभासदांनी विठ्ठल माने व समितीचा हा पेपर तपासून त्यांना भोपळा द्यावा, असे आवाहन शिक्षक संघाचे नेते शिवाजीराव पाटील, संभाजीराव थोरात व सिद्धेश्वर पुस्तके यांनी करत समितीचा बुरखा फाडला आहे.शिक्षक संघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित समारंभामध्ये ते बोलत होते. प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन विठ्ठल माने पारदर्शकतेचा आव आणत आहेत. त्यांचा कारभार म्हणजे ‘मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली’ असाच आहे. दिवसा लोकांना दिसावे म्हणून एसटीने जातो असे दाखवायचे आणि रात्री अंधारात शिक्षक बँकेची मोटार बोलवून घ्यायची हा त्यांचा कारभार जिल्ह्यातील शिक्षकांना चांगलाच ठाऊक आहे.सभासदांच्या सगळ्या मुलांना न्याय देता येणार नाही व बँकेवर बोजा वाढेल असा हेतू समोर ठेवून आम्ही नोकर भरती केली नव्हती. समितीने नोकर भरती करताना वाटप रजिस्टरच ठेवले होते. नोकरीला लागलेल्यांची यादी सभासदांपुढे आम्ही मांडत आहोत. समितीचे लोक दारात येतील तेव्हा त्यांना विचारा तुमचीच पोरं तेवढी हुशार आहेत का? चेअरमन व संचालकांचीच पोरं नोकरीला कशी लागतात? स्वत:च्या पोराबरोबर नातेवाईकांचीच पोरं कशी नोकरीला लागतात? बाकीच्या सभासदांच्या मुलांनी सभासदांनी कुणाचं काय घोडं मारलंय ? स्वत:ची पोरं नोकरीला लावणे हाच का पारदर्शक कारभार ? चेअरमन माने अंधारात दूध पित आहेत मात्र सभासदांनी त्यांची कथनी व करणी अनुभवली आहे. कुणाच्या चौकशा झाल्या याची मापे पत्रकार परिषदेत काढणाऱ्यांनी समितीतले कितीजण निलंबित झाले होते याची यादी आम्हाला जाहीर करायला लावू नये, अशा शब्दांत पाटील, थोरात व पुस्तके यांनी समितीवर टीकेची झोड उठवली.शिक्षक संघाच्या ऐतिहासिक एकीमुळे विरोधकांना धडकी भरली आहे. शिक्षक समितीच्या कारभाराला सभासद कंटाळले असून या निवडणुकीत सभासदांवर विश्वास दाखवतील.शिक्षक बँकेत संघाची सत्ता असताना सभासदांच्या हिताला आम्ही नेहमीच प्राधान्य दिले. मात्र, शिक्षक समितीने मनमानी कारभार करत सभासदांचे नुकसानच केले आहे. शिक्षक संघाच्या पाठपुराव्यामुळे शासनाने शिक्षकांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे शिक्षक सभासद संघाच्याच पाठीशी उभे राहतील, असा विश्वास पुस्तके यांनी व्यक्त केला.यावेळी रामचंद्र लावंड, बाळासाहेब साळुंखे, मच्छिंद्र मुळीक, बाळासाहेब सोनवलकर, सुनील सावंत, शिवाजी साळुंखे, महेंद्र जानुगडे, विष्णू खताळ, शिवदास खाडे, बलवंत पाटील, मोहनराव जाधव, महेंद्र अवघडे, आर. डी. खाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)