शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष अन् संचालकांचीच मुले नोकरीला कशी?

By admin | Updated: June 17, 2015 00:40 IST

संघाने फाडला समितीचा बुरखा : उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा

सातारा : शिक्षक बँकेच्या नोकरभरतीत सर्वसामान्य सभासदांची मुले नोकरीला लागल का? चेअरमनव संचालकांचीच मुले नोकरीत कशी लागली? सभासदांनी विठ्ठल माने व समितीचा हा पेपर तपासून त्यांना भोपळा द्यावा, असे आवाहन शिक्षक संघाचे नेते शिवाजीराव पाटील, संभाजीराव थोरात व सिद्धेश्वर पुस्तके यांनी करत समितीचा बुरखा फाडला आहे.शिक्षक संघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित समारंभामध्ये ते बोलत होते. प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन विठ्ठल माने पारदर्शकतेचा आव आणत आहेत. त्यांचा कारभार म्हणजे ‘मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली’ असाच आहे. दिवसा लोकांना दिसावे म्हणून एसटीने जातो असे दाखवायचे आणि रात्री अंधारात शिक्षक बँकेची मोटार बोलवून घ्यायची हा त्यांचा कारभार जिल्ह्यातील शिक्षकांना चांगलाच ठाऊक आहे.सभासदांच्या सगळ्या मुलांना न्याय देता येणार नाही व बँकेवर बोजा वाढेल असा हेतू समोर ठेवून आम्ही नोकर भरती केली नव्हती. समितीने नोकर भरती करताना वाटप रजिस्टरच ठेवले होते. नोकरीला लागलेल्यांची यादी सभासदांपुढे आम्ही मांडत आहोत. समितीचे लोक दारात येतील तेव्हा त्यांना विचारा तुमचीच पोरं तेवढी हुशार आहेत का? चेअरमन व संचालकांचीच पोरं नोकरीला कशी लागतात? स्वत:च्या पोराबरोबर नातेवाईकांचीच पोरं कशी नोकरीला लागतात? बाकीच्या सभासदांच्या मुलांनी सभासदांनी कुणाचं काय घोडं मारलंय ? स्वत:ची पोरं नोकरीला लावणे हाच का पारदर्शक कारभार ? चेअरमन माने अंधारात दूध पित आहेत मात्र सभासदांनी त्यांची कथनी व करणी अनुभवली आहे. कुणाच्या चौकशा झाल्या याची मापे पत्रकार परिषदेत काढणाऱ्यांनी समितीतले कितीजण निलंबित झाले होते याची यादी आम्हाला जाहीर करायला लावू नये, अशा शब्दांत पाटील, थोरात व पुस्तके यांनी समितीवर टीकेची झोड उठवली.शिक्षक संघाच्या ऐतिहासिक एकीमुळे विरोधकांना धडकी भरली आहे. शिक्षक समितीच्या कारभाराला सभासद कंटाळले असून या निवडणुकीत सभासदांवर विश्वास दाखवतील.शिक्षक बँकेत संघाची सत्ता असताना सभासदांच्या हिताला आम्ही नेहमीच प्राधान्य दिले. मात्र, शिक्षक समितीने मनमानी कारभार करत सभासदांचे नुकसानच केले आहे. शिक्षक संघाच्या पाठपुराव्यामुळे शासनाने शिक्षकांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे शिक्षक सभासद संघाच्याच पाठीशी उभे राहतील, असा विश्वास पुस्तके यांनी व्यक्त केला.यावेळी रामचंद्र लावंड, बाळासाहेब साळुंखे, मच्छिंद्र मुळीक, बाळासाहेब सोनवलकर, सुनील सावंत, शिवाजी साळुंखे, महेंद्र जानुगडे, विष्णू खताळ, शिवदास खाडे, बलवंत पाटील, मोहनराव जाधव, महेंद्र अवघडे, आर. डी. खाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)