शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

‘खासबाग’मध्ये साहित्यिकाचा सन्मान

By admin | Updated: February 7, 2015 00:06 IST

भालचंद्र नेमाडेंच्या पुरस्काराने ‘ययाती’च्या आठवणी झाल्या ताज्या

कोल्हापूर : ‘जीवनासाठी कला’ या प्रेरणातत्त्वाचा पुरस्कार करणारे व मराठी साहित्याला पहिल्यांदाच ‘ज्ञानपीठ’ हा सर्वश्रेष्ठ पुरस्काराचा बहुमान ‘ययाती’च्या निमित्ताने कोल्हापूरच्या वाट्याला आला. त्यावेळी कोल्हापुरातील खासबाग या कुस्तीच्या आखाड्यात लेखक वि. स. खांडेकर यांचा जंगी सत्कार करण्यात आला होता. या समारंभात तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी, ‘भविष्याचा वेध घेणारी प्रतिभा लाभलेले थोर मानवतावादी कलावंत’ अशा शब्दांत त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्ताने वि. स. खांडेकरांच्या ‘ययाती’ला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या आठवणी ताज्या झाल्या. वि. स. खांडेकरांची तपोभूमी म्हणजे कलानगरी कोल्हापूर. ‘कांचनमृग’, ‘हृदयाची हाक’, ‘दोन ध्रुव’, ‘उल्का’, ‘क्रौंचवध’, ‘जळालेला मोहर’, ‘अश्रू’, ‘हिरवा चाफा’, ‘पांढरे ढग’, ‘ययाती’, ‘अमृतवेल’, या त्यांच्या कादंबऱ्या. ‘समाधीवरील फुले’, ‘फुले आणि काटे’, ‘घरट्याबाहेर’, ‘मंजिऱ्या’, ‘मृगजळातील कळ्या’, ‘ ही पुस्तके, समीक्षा पुस्तके, ‘तारका’ हा काव्यसंग्रह, ‘एका पानाची कहाणी’ हे आत्मचरित्र, असे साहित्य लेखन त्यांनी केले. सोलापूरमध्ये १९४१ मध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पूर्वी ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हा एका ठराविक आकृतिबंध साहित्याला दिला जात असे. आता तो साहित्यक्षेत्रातील एकूण कारकिर्दीला दिला जातो. वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ या कादंबरीला १९७४ सालचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ १९७६ मध्ये प्रदान करण्यात आला. खांडेकरांना मिळालेल्या या पुरस्काराचे प्रचंड अप्रूप येथील नागरिकांना होते. म्हणूनच खासबाग मैदानात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह अख्खे मंत्रिमंडळ उपस्थित होते. कुस्तीच्या मैदानात साहित्यिकाच्या गौरवाला जमलेली अलोट गर्दी म्हणजे साहित्याला दिलेला मानाचा मुजराच होता. यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी केलेले भाषण त्यांच्या सर्वोत्तम भाषणांपैकी एक होते. त्यांना उत्तरादाखल वि. स. खांडेकर म्हणाले होते की, तुमच्यासारखा समीक्षक मला भेटला असता, तर आज माझे साहित्य आणखी वेगळे झाले असते.