शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

‘खासबाग’मध्ये साहित्यिकाचा सन्मान

By admin | Updated: February 7, 2015 00:06 IST

भालचंद्र नेमाडेंच्या पुरस्काराने ‘ययाती’च्या आठवणी झाल्या ताज्या

कोल्हापूर : ‘जीवनासाठी कला’ या प्रेरणातत्त्वाचा पुरस्कार करणारे व मराठी साहित्याला पहिल्यांदाच ‘ज्ञानपीठ’ हा सर्वश्रेष्ठ पुरस्काराचा बहुमान ‘ययाती’च्या निमित्ताने कोल्हापूरच्या वाट्याला आला. त्यावेळी कोल्हापुरातील खासबाग या कुस्तीच्या आखाड्यात लेखक वि. स. खांडेकर यांचा जंगी सत्कार करण्यात आला होता. या समारंभात तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी, ‘भविष्याचा वेध घेणारी प्रतिभा लाभलेले थोर मानवतावादी कलावंत’ अशा शब्दांत त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्ताने वि. स. खांडेकरांच्या ‘ययाती’ला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या आठवणी ताज्या झाल्या. वि. स. खांडेकरांची तपोभूमी म्हणजे कलानगरी कोल्हापूर. ‘कांचनमृग’, ‘हृदयाची हाक’, ‘दोन ध्रुव’, ‘उल्का’, ‘क्रौंचवध’, ‘जळालेला मोहर’, ‘अश्रू’, ‘हिरवा चाफा’, ‘पांढरे ढग’, ‘ययाती’, ‘अमृतवेल’, या त्यांच्या कादंबऱ्या. ‘समाधीवरील फुले’, ‘फुले आणि काटे’, ‘घरट्याबाहेर’, ‘मंजिऱ्या’, ‘मृगजळातील कळ्या’, ‘ ही पुस्तके, समीक्षा पुस्तके, ‘तारका’ हा काव्यसंग्रह, ‘एका पानाची कहाणी’ हे आत्मचरित्र, असे साहित्य लेखन त्यांनी केले. सोलापूरमध्ये १९४१ मध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पूर्वी ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हा एका ठराविक आकृतिबंध साहित्याला दिला जात असे. आता तो साहित्यक्षेत्रातील एकूण कारकिर्दीला दिला जातो. वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ या कादंबरीला १९७४ सालचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ १९७६ मध्ये प्रदान करण्यात आला. खांडेकरांना मिळालेल्या या पुरस्काराचे प्रचंड अप्रूप येथील नागरिकांना होते. म्हणूनच खासबाग मैदानात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह अख्खे मंत्रिमंडळ उपस्थित होते. कुस्तीच्या मैदानात साहित्यिकाच्या गौरवाला जमलेली अलोट गर्दी म्हणजे साहित्याला दिलेला मानाचा मुजराच होता. यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी केलेले भाषण त्यांच्या सर्वोत्तम भाषणांपैकी एक होते. त्यांना उत्तरादाखल वि. स. खांडेकर म्हणाले होते की, तुमच्यासारखा समीक्षक मला भेटला असता, तर आज माझे साहित्य आणखी वेगळे झाले असते.