शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

‘एचएमटी’च्या आठवणीचे ठोके कोल्हापूरच्या हृदयात कायम !

By admin | Updated: September 13, 2014 00:38 IST

कंपनी काळाआड : २२ वर्षे शहराशी जोडली होती नाळ

सतीश पाटील / शिरोलीरोज सकाळी सातच्या सुमारास ‘एचएमटी’ डबलडेकर पकडण्यासाठी सुरू असलेली महिलांची धडपड, केवळ महिला कामगारांनीच फुल्ल भरून जाणाऱ्या बसकडे असणाऱ्या प्रवाशांच्या नजरा व शिरोली औद्योगिक वसाहतीच्या ‘एचएमटी’ स्टॉपवर सायंकाळी चारला पुन्हा डबलडेकर पकडण्यासाठी उडणारी झुंबड, हे जादा नव्हे तर १५ वर्षांपूर्वीचे शहरातील चित्र. कोल्हापुरातील सुमारे १२० कुटुंबांची आर्थिक नाडी सांभाळणारी हिंदुस्थान मशीन टुल्स तथा अभिजात समयदर्शिका (एचएमटी) ही घड्याळ बनविणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी सुमारे २२ वर्षे येथे चांगल्या प्रकारे कार्यरत होती. त्यामुळे अनेक कुटुंबांबरोबर कोल्हापूरच्या जीवनाचा एक भागच ही कंपनी बनली होती. महिलांना रोजगार मिळावा म्हणून ज्येष्ठ उद्योजक शिवाजीराव देसाई व तत्कालीन खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे १९७८ साली पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या पुढाकाराने शिरोली औद्योगिक वसाहतीत ‘अभिजात समयदर्शिका’ ही ‘एचएमटी’चे घड्याळ तयार करणारी कंपनी सुरू झाली. या कंपनीत बंगलोरहून घड्याळाचे सुटे भाग येत होते. हे सर्व सुटे भाग जोडून येथे घड्याळ तयार होत असे. जवळपास महिन्याला ६० हजार घड्याळे तयार होत होती. विशेष म्हणजे कंपनीत सर्वच१२० कर्मचारी महिला होत्या. या महिलांना कंपनीत जाणे-येणे सोपे व्हावे, यासाठी महापालिकेतर्फे १९८०च्या दरम्यान ‘एचएमटी’ या नावाने खास डबलडेकर बसची सोयही करण्यात आली होती. त्यावेळी महिलांना प्रति महिना एक हजार ते बाराशे रुपये पगार होता. साधारण २००० सालापर्यंत ही कंपनी अतिशय जोरातचालली होती; पण सार्वजनिक क्षेत्रातील ‘एचएमटी’ कंपनीला कालपरत्वे बदल व योग्यप्रकारे मार्केटिंग करता आले नाही. बाजारात अनेक नवीन कंपन्या आल्यामुळे बाजारात मोठी स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे शिरोली येथील युनिटमध्ये तयार होणारी घड्याळे उचलली गेली नाहीत. मागणी कमी झाल्यामुळे २००० साली ही कंपनी बंद पडून अवसायनात गेली. यानंतर तीन ते चार वर्षे कर्मचाऱ्यांनी ही कंपनी चालू करावी, पगार मिळावा, यासाठी आंदोलने केली. महाराष्ट्र शासनाकडे दाद मागितली; पण शासनाने याकडे लक्ष न दिल्याने अखेर कंपनी बंद पडली. कर्मचाऱ्यांची पश्चिम महाराष्ट्र विकास मंडळाने पगार, देणी भागविली असली तरी कोल्हापूरच्या उद्योगजगताचे मोठे नुकसान झाले आणि २००३-०४ साली ही कंपनी लिलावात काढली. ज्येष्ठ उद्योगपती बापूसाहेब जाधव यांच्या ‘सरोज ग्रुप’ने ही कंपनी विकत घेतली आहे.