शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

शिक्षणासाठी त्याचा अनंत अडचणींचा प्रवास

By admin | Updated: September 20, 2014 00:28 IST

उधमपुरातून जिल्ह्यात : अशोकराव माने ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशनमध्ये दाखल

आयुब मुल्ला-खोची --मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विक्राळ पुरामुळे जम्मू काश्मिरमध्ये हाहाकार माजला होता, अशा परिस्थितीत अ‍ॅडमिशन घेण्यासाठी घराबाहेर पडलेला विद्यार्थी शेकडो किलोमीटर दूर श्रीनगरमध्ये अडकला. घरच्यांचा संपर्क तुटला. अ‍ॅडमिशन तर झाले. पण, घरी परतणार कसे? हा प्रश्न त्याच्यासमोर होता. अखेर गावाची ओढ असतानासुद्धा ‘पढाई के आगे दिल क्या करेगा’ असे म्हणत त्याने आपलं मन घट्ट केलं. अनेक प्रसंगांना सामोरे जात तो कोल्हापूर जिल्ह्यातील अशोकराव माने ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशनमध्ये शिकण्यासाठी दाखल झाला. वीरेंद्रप्रतापसिंग चैनसिंग (चप्पाहारी, ता. चेनहानी, जि. उधमपूर) याला सिव्हिल अभियांत्रिकीसाठी प्रवेश हवा होता. त्यासाठी तो एआयसीटीईच्या कौन्सलिंग राऊंडला श्रीनगरमध्ये आला. माने इन्स्टिट्युटची सर्व माहिती उच्चशिक्षित स्टाफ यांची सविस्तर माहिती त्याने वेबसाईटवर बघितली अन् निवड केली. त्यानुसार त्याचा या राऊंडला प्रवेश निश्चित झाला. विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रवेश न झाल्याने सात दिवसांच्या आत सदर कॉलेजमध्ये हजर होऊन प्रवेश अंतिम करणे गरजेचे होते. त्यानुसार तो पोहोचला आणि प्रवेश घेतला. परंतु, त्याचा यासाठी झालेला प्रवास हा अनंत अडचणींना पार करणारा ठरला. ज्यावेळी तो कौन्सिलिंग राऊंडला बाहेर पडला त्यावेळी त्याच्याजवळ थोडे पैसे व कागदपत्रे होती. परंतु, पावसाचे थैमान, पूरस्थिती, अशी भयानक परिस्थिती निर्मााण होईल, असा विचार देखील त्याच्यासमोर नव्हता; पण प्रवेश निश्चित झाल्यानंतर मात्र त्याच्यासमोर घरी जायला सुद्धा पर्याय नव्हता. सर्व रस्ते बंद होते, अशा परिस्थितीत शिक्षणासाठी महाराष्ट्रात येणारा हा विद्यार्थी चिंतेत होता. गव्हर्नर कार्यालयाजवळील हेलिपॅडवर बिस्कीट, बटाटा खाऊन तीन दिवस काढले. चौथ्या दिवशी श्रीनगर एअरपोर्टवर पोहोचला. तेथून लष्करी विमानाने जम्मू विमानतळावर आला. त्यानंतर विमानाने तो दिल्ली व तेथून पुणे येथे आला. वाठार तर्फे वडगाव येथील माने इन्स्टिटयुटमध्ये पोहोचला. रीतसर प्रवेश घेतला. संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, कार्यकारी संचालक डॉ. दीपक मुदगल यांनी त्याचा थक्क करणारा प्रवास ऐकून आपुलकीने मदत केली. दरम्यानच्या काळात त्याचा घरच्यांबरोबर फोनवरून संपर्क झाला. ‘पढाई के लिए मै महाराष्ट्र में पहुँचा हूँ, मै ठिक हूॅँ. अपना खयाल रखना’ असा एवढा भावनिक व आधार देणारे शब्द तो बोलला. आता तो येथील विद्यार्थ्यांमध्ये रमला आहे; परंतु त्याच्या चेहऱ्यावर मात्र, गावच्या परिस्थितीची ओढ दिसून येते.