शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
3
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
4
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
5
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
6
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
7
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
8
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
9
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
10
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
11
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
12
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
13
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
14
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
15
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
16
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
17
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
18
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
19
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
20
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    

‘हनीमूनला जायचं हाय, दोघांना ई-पास हवाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST

कोल्हापूर : ‘नुकतच लग्न झालंय महाबळेश्वरला हनीमूनला जायचं आहे, दोघांना ई-पास हवाय’ अशा मागणीचे कारणं देऊन जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी कोल्हापूर ...

कोल्हापूर : ‘नुकतच लग्न झालंय महाबळेश्वरला हनीमूनला जायचं आहे, दोघांना ई-पास हवाय’ अशा मागणीचे कारणं देऊन जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी कोल्हापूर पोलिसांच्या सायबर सेलकडे ऑनलाइन ई-पाससाठी परवानगी मागणी करण्यात आली, अशा पद्धतीने हास्यास्पद कारणे टाकून ई-पासची मागणी सायबर सेलकडे होत आहे. पण प्रत्यक्षात फक्त लग्नसमारंभ, रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार याच कारणासाठी सेलकडून ई-पासला हिरवा कंदील दाखवला जात आहे. लॉकडाऊनच्या चाळीस दिवसांत तब्बल ६७ हजार ५०२ जणांनी जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पाससाठी सायबर सेलकडे अर्ज केले.

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी ई-पास अनिवार्य केला आहे. कोल्हापूर जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी रोज किमान अडीच हजार ई-पासची मागणी सायबर सेलकडे होत आहे. रक्तातील नातेवाईकाचे निधन, जवळच्या नातलगाचे लग्न, रुग्णाला उपचाराला नेणे हीच सबळ कारणे व त्यासोबतची कागदपत्रे सायबर सेलच्या वेबसाईटवर डाऊनलोड करावीत, त्यांनाच जिल्हाबाहेर जाण्यासाठी परवाना दिला जाईल, असे पोलीस प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केले. पण या कारणाशिवाय, नवीन लग्न झालं आहे. महाबळेश्वरला हनीमूनला जायचं आहे, पाहुण्यांच्या साखरपुड्याला जायचं आहे, पत्नीला पुण्याला भेटायला जायचं आहे, अशी हास्यास्पद कारणे देऊनही ई-पासची मागणी केली. अशा कारणांसाठी ई-पास नाकारले आहेत. खोटी कारणे देऊन ई-पास मागणा-यांची संख्या मोठी असल्याचे दिसले.

जिल्ह्यात लॉकडाऊन लागलेल्या २३ एप्रिल ते २ जून या कालावधीत जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ६७ हजार ५०२ जणांनी अर्ज केले आहे. त्यापैकी सबळ कारण असल्याने फक्त ९६४० अर्जदारांना जिल्ह्याबाहेर जाण्यास परवाना मंजूर केला. तर ५७ हजार ८६२ अर्ज नाकारले. कोल्हापूर जिल्ह्यातून मुंबई व पुण्याकडे जाण्यासाठी सर्वात जास्त ई-पासची मागणी होत आहे.

डॉक्टरांकडे विचारपूस

रुग्णाला उपचारासाठी परजिल्ह्यात न्यायचे कारण सांगून परवानगी मागतात. पण कारणांबाबत शंका आल्यास संबंधित हॉस्पिटलकडे फोन करून अपॉइंटमेंट घेतल्याची खात्री करूनच ई-पास निर्गत केला जातो. अनेक अर्जदारांनी एकाच व्यक्तीचे डेथ सर्टिफिकेट जोडून नातेवाईकांच्या अंत्यसंस्कराला जाण्याचे कारण दाखवल्याचेही उघड झाल्याचे सायबर सेलचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले.

फक्त महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच ईं-पास परवाना

महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासला मंजुरी देण्याचे पोलिसांना अधिकार आहेत. त्यामुळे कर्नाटक अथवा गोवा राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत ई-पासला मंजूर दिली जाते. त्यामुळे जिल्ह्यातून बेळगाव, निपाणी भागात जाण्यासाठीही ई-पासला मोठी मागणी होती. पण त्यांना फक्त कोगनोळीपर्यंतच प्रवेशाला मंजुरी दिली.

२३ एप्रिल ते २ जूनपर्यंत ई-पास

- मागणी अर्ज : ६७.५०२

- मंजूर अर्ज : ९५४०

- नामंजूर अर्ज : ५७.८६२