शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

सहा लाख महिलांमध्ये हिमोग्लोबीनचा तुटवडा

By admin | Updated: May 28, 2015 01:01 IST

आहाराकडे दुर्लक्षाचा परिणाम : जिल्ह्यात कर्करोग, मधुमेह, मुदतपूर्व प्रसुतीच्या प्रमाणातही वाढ--स्त्री आरोग्य दिन विशेष

सांगली : रक्तातील हिमोग्लोबीनचे कमी प्रमाण, जंतूंचा प्रसार, सकस आहाराचा व उपचारांचा अभाव यामुळे जिल्ह्यातील महिलांत मुदतीपूर्वी प्रसुतीचे (प्रिमॅच्युअर डिलिव्हरी) प्रमाण वाढले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण १४ लाख ३५ हजार ७२८ महिलांपैकी सहा लाख महिलांचे हिमोग्लोबीन १० टक्क्यापेक्षा कमी आहे. शिवाय कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी विकारांचे प्रमाण महिलांमध्ये वाढल्याचे आढळून आले आहे. महिलांचे आरोग्यमान सुधारावे आणि त्यांच्या सबलीकरणासाठी केंद्र व राज्य शासन वर्षाला कोट्यवधीचा निधी खर्च करीत आहे. महिला मेळावे घेऊन त्यांचे आरोग्य विषयावर जनजागृती करण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दि. २६ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधित जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरोग्य शिबिर घेऊन महिलांची तपासणी केली. या तपासणीमध्ये तीस वर्षापेक्षा जास्त वयोगटाच्या महिलांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग (गर्भाशय, स्तनाचा, मौखिक) या गंभीर आजारांचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे. आहाराकडे दुर्लक्ष, नियमित आरोग्य तपासणी नाही, महिलांमध्ये तंबाखू व तंबाखूयुक्त मिश्रीचा वापर ही प्रमुख कारणे दिसत आहेत.जिल्ह्यात १४ लाख ३५ हजार ७२८ महिलांची संख्या आहे. यापैकी सहा लाख महिलांचे हिमोग्लोबीन १० टक्केपेक्षा कमी आहे. त्यातील २० टक्के महिलांमध्ये सात ते पाच टक्के हिमोग्लोबीचे प्रमाण असल्याचे आढळून आले आहे. या सर्व आजारांमुळेच एकट्या सांगली जिल्ह्यात आईच्या पोटात गुदमरून १६, तर कमी वजनामुळे ७८ बालकांचा मृत्यू झाला आहे. परिणामी, ‘सुदृढ बालक, सशक्त युवक, संपन्न महाराष्ट्र’ अभियानाचा फज्जा उडाला आहे. महापालिका क्षेत्रात याच कारणाने आजही ग्रामीण भागात मुदतीपूर्वी प्रसुतीचे प्रमाण अधिक आहे. या सर्व गोष्टींवर नियंत्रण करण्यासाठी सरकार राजीव गांधी जीवनदायी योजनेसह अनेक उपक्रम राबविते. मात्र ते केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)मातामृत्यूचे प्रमाण घटलेगरोदरपणाच्या काळात त्या महिलेकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे, नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच प्रसुती होत आहे. त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. परिणामी, मृत्यू ओढवतो. त्यासाठी गरोदर मातांनी आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. जि. प. आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. आहाराविषयीही मार्गदर्शन केले जात आहे. यामुळेच सध्या एक लाख महिलांमध्ये ६० महिलांचा मृत्यू, असे मातामृत्यूचे प्रमाण होत आहे. बालमृत्यूचेही प्रमाण एक हजारात १७ असे असून ते कमी झाले आहे, असे मत जिल्हा परिषदेचे जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी बी. एस. गिरीगोसावी यांनी व्यक्त केले.नियमित तपासणी हाच उपायगरोदर मातांनी योग्य, सकस आहार घेऊन व वेळेवर तपासणी करून आरोग्याची काळजी घेतल्यास निश्चितच बालमृत्यू रोखले जातील. गरोदरपणाच्या कालावधित कोणतेही आजार महिलांनी अंगावर काढू नयेत. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास व्यवस्थित प्रसुती होईल. बाळ आणि माता सुरक्षित राहण्यासाठी दोघांचाही आहार आणि उपचार महत्त्वाचे आहेत, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विद्या जाधव यांनी सांगितले.