शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सहा लाख महिलांमध्ये हिमोग्लोबीनचा तुटवडा

By admin | Updated: May 28, 2015 01:01 IST

आहाराकडे दुर्लक्षाचा परिणाम : जिल्ह्यात कर्करोग, मधुमेह, मुदतपूर्व प्रसुतीच्या प्रमाणातही वाढ--स्त्री आरोग्य दिन विशेष

सांगली : रक्तातील हिमोग्लोबीनचे कमी प्रमाण, जंतूंचा प्रसार, सकस आहाराचा व उपचारांचा अभाव यामुळे जिल्ह्यातील महिलांत मुदतीपूर्वी प्रसुतीचे (प्रिमॅच्युअर डिलिव्हरी) प्रमाण वाढले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण १४ लाख ३५ हजार ७२८ महिलांपैकी सहा लाख महिलांचे हिमोग्लोबीन १० टक्क्यापेक्षा कमी आहे. शिवाय कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी विकारांचे प्रमाण महिलांमध्ये वाढल्याचे आढळून आले आहे. महिलांचे आरोग्यमान सुधारावे आणि त्यांच्या सबलीकरणासाठी केंद्र व राज्य शासन वर्षाला कोट्यवधीचा निधी खर्च करीत आहे. महिला मेळावे घेऊन त्यांचे आरोग्य विषयावर जनजागृती करण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दि. २६ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधित जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरोग्य शिबिर घेऊन महिलांची तपासणी केली. या तपासणीमध्ये तीस वर्षापेक्षा जास्त वयोगटाच्या महिलांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग (गर्भाशय, स्तनाचा, मौखिक) या गंभीर आजारांचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे. आहाराकडे दुर्लक्ष, नियमित आरोग्य तपासणी नाही, महिलांमध्ये तंबाखू व तंबाखूयुक्त मिश्रीचा वापर ही प्रमुख कारणे दिसत आहेत.जिल्ह्यात १४ लाख ३५ हजार ७२८ महिलांची संख्या आहे. यापैकी सहा लाख महिलांचे हिमोग्लोबीन १० टक्केपेक्षा कमी आहे. त्यातील २० टक्के महिलांमध्ये सात ते पाच टक्के हिमोग्लोबीचे प्रमाण असल्याचे आढळून आले आहे. या सर्व आजारांमुळेच एकट्या सांगली जिल्ह्यात आईच्या पोटात गुदमरून १६, तर कमी वजनामुळे ७८ बालकांचा मृत्यू झाला आहे. परिणामी, ‘सुदृढ बालक, सशक्त युवक, संपन्न महाराष्ट्र’ अभियानाचा फज्जा उडाला आहे. महापालिका क्षेत्रात याच कारणाने आजही ग्रामीण भागात मुदतीपूर्वी प्रसुतीचे प्रमाण अधिक आहे. या सर्व गोष्टींवर नियंत्रण करण्यासाठी सरकार राजीव गांधी जीवनदायी योजनेसह अनेक उपक्रम राबविते. मात्र ते केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)मातामृत्यूचे प्रमाण घटलेगरोदरपणाच्या काळात त्या महिलेकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे, नऊ महिने पूर्ण होण्यापूर्वीच प्रसुती होत आहे. त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. परिणामी, मृत्यू ओढवतो. त्यासाठी गरोदर मातांनी आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. जि. प. आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. आहाराविषयीही मार्गदर्शन केले जात आहे. यामुळेच सध्या एक लाख महिलांमध्ये ६० महिलांचा मृत्यू, असे मातामृत्यूचे प्रमाण होत आहे. बालमृत्यूचेही प्रमाण एक हजारात १७ असे असून ते कमी झाले आहे, असे मत जिल्हा परिषदेचे जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी बी. एस. गिरीगोसावी यांनी व्यक्त केले.नियमित तपासणी हाच उपायगरोदर मातांनी योग्य, सकस आहार घेऊन व वेळेवर तपासणी करून आरोग्याची काळजी घेतल्यास निश्चितच बालमृत्यू रोखले जातील. गरोदरपणाच्या कालावधित कोणतेही आजार महिलांनी अंगावर काढू नयेत. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास व्यवस्थित प्रसुती होईल. बाळ आणि माता सुरक्षित राहण्यासाठी दोघांचाही आहार आणि उपचार महत्त्वाचे आहेत, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विद्या जाधव यांनी सांगितले.