शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

बरे झाले, कोरोना रुग्ण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST

कोल्हापूर: पावसाच्या पुनरागमनाच्या जोडीने मंगळवारी कोरोनाच्या ओहोटीची सुखद वार्ता कानी पडली. नव्या कोरोनाबाधितांची संख्या सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ...

कोल्हापूर: पावसाच्या पुनरागमनाच्या जोडीने मंगळवारी कोरोनाच्या ओहोटीची सुखद वार्ता कानी पडली. नव्या कोरोनाबाधितांची संख्या सोमवारच्या तुलनेत मंगळवारी एकाच दिवसात तब्बल ९६४ ने कमी झाली. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातही बाधितांचे आकडे बरेच कमी झाले आहेत. रुग्णसंख्या घटत असताना बरे होणाऱ्यांचे प्रमाणही तब्बल १७५१वर गेले आहे.

कोरोनाचे आकडे दररोज वर-खाली होत आहेत. गेल्या चार दिवसात सातत्याने दीड हजारावर रोजचा आकडा होता. सोमवारी तर एकदम १९९९ वर आकडा गेल्याने सर्वांच्याच काळजात धस्स झाले होते. प्रशासनाने देखील लगेच निर्बंध कडक करत सरसकट व्यापारास परवानगी नाकारली होती. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची भीती वाढू लागली होती; मात्र मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या अहवालानंतर मात्र सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू अजूनही कोल्हापुरातच जास्त असलेतरी मंगळवारी त्याची संख्या गेल्या दोन महिन्यातील नीचांकावर आली. शहरात ३०२ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू झाला. यात कसबा बावड्यातील एका २२ वर्षीय तरुणीच्या मृत्यूचा समावेश आहे. उर्वरित जिल्ह्याचा विचार करता अजूनही करवीर, हातकणंगलेत रुग्णसंख्या जास्त असून मृत्यू हे करवीरमध्ये ३ तर हातकणंगलेत ४ आहेत. पन्हाळा, भुदरगडमध्ये प्रत्येकी दोन मृत्यू आहेत. आजरा, राधानगरी, शिरोळ, गगनबावड्यात एकही मृत्यू नाही. उर्वरित तालुक्यात प्रत्येकी एक मृत्यू आहे.

आज झालेले मृत्यू

कोल्हापूर शहर: ०७ कसबा बावडा, सुभाषनगर, राजाराम रोड, शिवाजी पेठ, सदर बाजार, टाकाळा, पाटील कॉलनी सुभाषनगर

करवीर: ०३ निगवे, नागाव, उचगाव,

पन्हाळा: ०२ वारणा कोडोली, कोडोली,

हातकणंगले:०४ पुलाची शिरोली, इचलकरंजी, कबनूर, चोकाक,

भुदरगड: ०२ गारगोटी, मिणचे खुर्द,

कागल: ०१ बोळावीवाडी ,

गडहिंग्लज: ०१ भडगाव,

चंदगड: ०१ कागणी,

शाहूवाडी: ०१ चरण,

इतर जिल्हा: ०२ मत्तीवडे (ता. चिक्कोडी), शिरगाव (ता. वाळवा)