शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

कारखानदारीला ‘हवाई’चा धसका

By admin | Updated: November 23, 2014 23:55 IST

सर्वाधिक फटका हा सहकारी कारखान्यांना बसणार

राजाराम लोंढे -- कोल्हापूर--दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतर कमी करण्याचे सूतोवाच सहकारमंत्र्यांनी केल्याने साखर कारखानदार चांगलेच हबकले आहेत. अगोदरच साखर धोरणामुळे कारखाने अडचणीत आले असताना कारखान्याशेजारी कारखाना उभारला तर संपूर्ण कारखानदारी अडचणीत येणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा सहकारी कारखान्यांना बसणार आहे. साखर कारखान्यांमधील अंतर किती असावे, हे केंद्र सरकारचे धोरण आहे. पण अंतरामधील कमी-जास्त करण्याची मुभा राज्य सरकारला आहे. सध्या महाराष्ट्रात दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतर २५ किलोमीटर आहे. २५ किलोमीटरच्या आत दुसरा कारखाना सुरू करता येत नाही. पण अंतराची अट काढून टाकण्याची मागणी गेले अनेक वर्षे शेतकरी संघटना करत आहे. केंद्रासह राज्यातील भाजपच्या सरकारने झटपट निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मळीविक्रीवरील निर्बंध उठवून सरकारने कारखानदारांना पहिला झटका दिला आहे. आता दोन कारखान्यांमधील हवाई अंतर रद्द करण्याची घोषणा खुद्द सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने कारखानदार चांगलेच हबकले आहेत. राज्यात २०१ साखर कारखाने आहेत, पण विविध कारणांनी ३२ कारखान्यांना घरघर लागली आहे. या हंगामात १६८ कारखाने सुरू झाले आहेत. आताच आहे त्या कारखान्यांना त्यांच्या गाळप क्षमतेनुसार ऊस उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक कारखाने पूर्ण क्षमतेने हंगाम पूर्ण करू शकत नसल्याने तोट्यात चालले आहेत. अशा परिस्थितीत हवाई अंतर काढून टाकले आणि कारखान्याशेजारी कारखाना उभा राहिला तर दोन्ही कारखाने अडचणीत येणार आहेत. विशेषत: त्याचा सर्वाधिक फटका हा सहकारी कारखान्यांना बसणार आहे. आर्थिक दुर्बल व असंघटितांसाठी सहकारी कारखानदारीचा उदय झाला. सहकारात काही दोष असतील म्हणून संपूर्ण यंत्रणेलाच जबाबदार धरून निर्णय घेणे योग्य नाही. अशा प्रवृत्तींना त्याचवेळी कारवाईचा झटका दिला तर ही वेळच आली नसती. सहकारी कारखान्यांच्या शेजारी खासगी आले तरी ते आपला फायदा पाहूनच दर देणार मग दराची स्पर्धा होणार कशी? त्यामुळे जिथे रोग आहे, तिथे उपचार करण्यापेक्षा संपूर्ण कारखानदारी अडचणीत आणण्याचा निर्णय घेणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. झोन बंदी उठली, सुविधांवर मर्यादापूर्वी झोन बंदी असल्याने साखर कारखाने आपल्या कार्यक्षेत्रातील रस्ते, पाणंदच्या दुरुस्तीसह पाणीपुरवठा योजना राबविल्या जात होत्या. पण आता झोनबंदी उठविल्याने कोणताही कारखाना कोणाच्याही कार्यक्षेत्रात घुसत असल्याने सुविधांवर मर्यादा येत आहेत. झोन बंदी उठली, सुविधांवर मर्यादापूर्वी झोन बंदी असल्याने साखर कारखाने आपल्या कार्यक्षेत्रातील रस्ते, पाणंदच्या दुरुस्तीसह पाणीपुरवठा योजना राबविल्या जात होत्या. पण आता झोनबंदी उठविल्याने कोणताही कारखाना कोणाच्याही कार्यक्षेत्रात घुसत असल्याने सुविधांवर मर्यादा येत आहेत. हंगाम सहा महिन्यांचा; खर्च वर्षाचामुळात साखर कारखान्यांचा हंगाम सहा महिन्यांचा, पण खर्च वर्षभर असतो. कारखानदारी अडचणीत येण्यास हेही एक कारण आहे. अशा परिस्थितीत केवळ स्पर्धेसाठी हवाई अंतर कमी करण्याचा निर्णय धोकादायक होऊ शकतो. गावात पिठाच्या चक्या किती असाव्यात, हे ग्रामपंचायत ठरवत नसेल, तर ऊस गाळणाऱ्या कारखान्यांवर मर्यादा का? सरकारच्या मदतीशिवाय जो भांडवल गुंतवून कारखाने काढणार असेल, तर त्याला रोखणे योग्य होणार नाही. त्यामुळे सरकारने घेतलेला निर्णय योग्यच आहे. ऊस नियामक मंडळाच्या बैठकीत यासाठी आम्ही आग्रह धरला होता. - खासदार राजू शेट्टी हवाई अंतर कमी करण्याचा निर्णय चुकीचा आहे. यामुळे गोंधळ निर्माण होऊन साखर कारखानदारी संपणार आहे. त्यापेक्षा उसाच्या रिकव्हरीवर दर दिला तर दराचाही प्रश्न संपेल आणि उसाची पळवापळवीही होणार नाही. ब्राझीलमध्ये अशाप्रकारे दर दिला जातो. - पी. जी. मेढे तज्ज्ञ संचालक,राजाराम साखर कारखाना