शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हॅट्ट्रिकवर विश्वास...अविश्वास! : हातकणंगलेच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:47 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, प्रत्येक कार्यकर्ता

ठळक मुद्देशेट्टी, माने समर्थकांत पैजा

गणपती कोळी ।कुरुंदवाड : लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, प्रत्येक कार्यकर्ता आपलाच उमेदवार कसा निवडून येतो, याची आकडेमोड पटवून देत आहेत.

खासदार शेट्टीसमर्थक खासदार हॅट्ट्रिक करणार यावर ठाम आहेत तर विरोधक या मतदारसंघात स्व. बाळासाहेब माने यांच्यानंतर कोणत्याही खासदाराची हॅट्ट्रिक झालेली नाही. त्यामुळे शेट्टी पराभूत होऊ शकतात, यावर विश्वास आहे. त्यातूनच कार्यकर्त्यांतून पैजा लागल्या असून, शेट्टी हॅट्ट्रिक करतात की, विरोधकांचा विश्वास खरा ठरतो, याचा फैसला निकालानंतरच लागणार आहे. मात्र, इर्ष्येच्या राजकारणाच्या चर्चेने रंगत आली आहे.

शेट्टी हे चळवळीतील व शेतकऱ्यांच्या मनातील विश्वासू नेतृत्व असल्याने प्रारंभी ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माने यांच्या विजयाची घेतलेली जबाबदारी व केलेली खेळी, मतदारसंघात शिवसेना-भाजप आमदारांचे असलेले संख्याबळ, ‘एक मराठा-लाख मराठा’ची हाक, वंचित आघाडीच्या मत विभागणीचा फटका यामुळे शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे कार्यकर्तेच नव्हे, तर उमेदवारही स्वत:च्या विजयाबाबत साशंक आहेत.

कट्टर कार्यकर्ते मात्र आपलाच उमेदवार निवडून देण्यावर ठाम असून, जेवणापासून ते रोख रकमेपर्यंत पैजा खेळल्या जात आहेत. माने समर्थक या मतदारसंघात बाळासाहेब माने यांचा अपवादवगळता अन्य कोणत्याही खासदारांनी हॅट्ट्रिक केलेली नाही. त्यामुळे शेट्टींचा पराभव निश्चित आहे, असा दावा करत आहेत शिवाय मतदारसंघात शिवसेना-भाजप आमदारांची संख्या मोठी असल्याने त्यांचे वर्चस्व आहे. तरुण मतदारांवर मोदी लाटेचा प्रभाव, एकवटलेला मराठा समाज, वंचित आघाडीची विभागलेली मते यामुळे धैर्यशील मानेच निवडून येणार यावर कार्यकर्ते ठाम आहेत.

तर खासदारसमर्थक वंचित आघाडीकडे जाणारी मते खा. शेट्टी यांना फारशी कधीच मिळालेली नाहीत, उलट काँग्रेस समर्थनामुळे मुस्लिम गठ्ठा मतांचा फायदा, शेतकरी चळवळ म्हणून शेतकºयांची मते, सूज्ञ मतदारांतून मोदीविषयी असलेली संतापाची लाट, मतदारसंघात शिवसेना-भाजपचे आमदार असले, तरी लोकसभेत मतदार न ऐकण्याची भूमिका यामुळे निवडून येण्यास अडचण नाही. गतवेळचे फार तर लीड कमी होईल, मात्र, खा. शेट्टीच निवडून येणार, यावरच त्यांचा विश्वास आहे. एकूणच दावे-प्रतिदावे अन् आकडेमोडीवरून कार्यकर्त्यांतून रंगलेली चर्चा मतदार व कार्यकर्त्यांत निकालाच्या उत्सुकतेत भर पडत आहे.शेट्टींनी बनविले नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्यहातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. शेतकºयांचा ऊस व दूध दरावरून रणांगण गाजविलेले

खा. राजू शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर ‘स्वाभिमानी’कडून निवडणुकीत उतरले आहेत. शेट्टी यांनी भाजपला विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टीकेचे लक्ष्य केल्याने भाजप-शिवसेना युतीने शिवसेनेकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी देऊन राजकीय खेळी खेळली आहे.

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९