शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

‘तावडे हॉटेल’वर उद्यापासून हातोडा

By admin | Updated: May 25, 2014 01:17 IST

प्रशासनाची तयारी : पोलीस बंदोबस्तासाठी दिले पत्र

कोल्हापूर : शहराच्या पूर्वभागात राष्टÑीय महामार्गाला लागून असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील अनाधिकृत इमारतींवर सोमवारपासून कारवाई करण्याची महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. महापालिकेला आज व उद्या सुटी असतानाही काही अधिकारी या कारवाईच्या अनुषंगाने कार्यरत आहेत. सोमवारच्या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून मनपा प्रशासनाने पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे. शुक्रवारच्या स्थायी समिती सभेत तावडे परिसरातील अनाधिकृत बांधकामावर खडाजंगी चर्चा झाल्यानंतर प्रशासनातील अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, ताराराणी चौक विभागीय कार्यालयाचे उपअभियंता एम. एम. निर्मळे आणि त्यांचे सहकारी आज दिवसभर सोमवारपासून करायच्या कारवाईचे नियोजन करत होते. महानगरपालिकेची हद्द असतानाही उचगांव ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन १०९ इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. त्यातील काही जागा या ट्रक टर्मिनस व कचरा डेपोसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आधी आरक्षित जागेवरील इमारती पाडण्यात येणार असून अशा इमारती किती आहेत याची यादी तयार केली जात आहे. त्यानंतर आरक्षण नसलेल्या जागांवरील इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. परंतु ही कारवाई कोणत्या स्वरुपाची राहील हे न्यायालयाचे निर्देश, बीपीएमसी अ‍ॅक्टमधील तरतुदी याचा अभ्यास करूनच ठरविले जाणार आहे. आधी सर्व इमारत मालकांच्यावतीने उचगांव ग्रामपंचायतीने जागेच्या हद्दीबाबत न्यायालयात धाव घेतली होती, परंतु न्यायालयाने ग्रामपंचायतीची याचिका फेटाळली होती. त्यानंतर महापालिकेच्या कारवाईला हरकत घेत २३ इमारत मालकांनी वैयक्तिक याचिका दाखल केल्या आहेत. त्यातही ८ इमारतींवर कारवाई करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे, १५ इमारत मालकांच्या याचिका फेटाळल्या आहेत. या १५ जणांना महापालिकेने कारवाईची नोटीस बजावली होती. नोटिसीची मुदत संपताच त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. काही इमारत मालकांचे सर्व्हे क्रमांक चुकले असल्याने त्यांना पुन्हा एकदा नोटीस काढण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. एकूण १०९ जागांपैकी ३३ जागांची गुंठेवारी प्रकरणे नियमीत करून देण्यात आली असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार नाही. आरक्षण टाकण्यापूर्वी म्हणजे १९४६ पूर्वीपासून या जागेवर आठ घरे आहेत. त्यांनाही सवलत द्यावी लागण्याची शक्यता आहे. सोमवारपासून जर आरक्षित जागेवरील इमारती पाडून त्यांची जागा महापालिकेने ताब्यात घ्यायचे ठरविले तर जागेच्या मूळ मालकांना मोबदला कोणी व किती द्यायचा याबाबत मात्र संभ्रमावस्था आहे. (प्रतिनिधी)