शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘हातकणंगले’चे विभाजन होणार तरी कधी

By admin | Updated: May 12, 2015 23:42 IST

प्रशासनावरही प्रचंड ताण : जनहिताचा विचार होऊन दोन स्वतंत्र तालुके करण्याची जनतेची मागणी

हातकणंगले तालुक्याच्या विभाजनाचा प्रश्न गेली पंधरा वर्षे रेंगाळला आहे. हातकणंगले तालुका क्षेत्रफळ, लोकसंख्या व महसुलाच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल आहे. तालुक्याच्या वाढलेल्या व्यापामुळे प्रशासनावरही ताण वाढला असून, यामुळे जनतेच्या कामाची दिरंगाई होत आहे. शासकीय कामासाठी निलेवाडीपासून जंगमवाडीपर्यंतची जनता तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारून वैतागली आहे. तालुक्यातील सामान्य जनतेला हवा आहे स्वतंत्र पेठवडगाव तालुका. हातकणंगले तालुक्याच्या विभाजनाच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून...दिलीप चरणे - नवे पारगाव -महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीसह निलेवाडी ते जंगमवाडी असे ६७ किलोमीटर अंतराचे टोक असणारा हातकणंगले तालुका हा सर्वार्थाने अव्वल तालुका म्हणून ओळखला जातो. सहकार, व्यापार, उद्योग, शिक्षण, शेती, पर्यटन, आदी क्षेत्रातील प्रगतीमुळे हातकणंगले तालुक्याने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. वाढलेली लोकसंख्या, तालुक्याचा विस्तार यामुळे हातकणंगले तालुक्याच्या प्रशासनावर प्रचंड ताण असल्यामुळे नागरीकांची गैरसोय होत असून, गेली पंधरा वर्षे हातकणंगले तालुक्याच्या विभाजनाची मागणी जोर धरत आहे. जनहिताचा विचार होऊन पेठवडगाव व इचलकरंजी असे दोन स्वतंत्र तालुके होण्याची गरज आहे.हातकणंगले तालुक्यात ६२ गावे असून, ५९.८.८ चौ. कि. मी. क्षेत्रफळ आहे. ७ लाख ९ हजार ६२८ लोकसंख्या असून, पेठवडगाव व इचलकरंजी या दोन नगरपरिषदा आहेत. अडीच ब्लॉकचा तालुका असून, दोन विधानसभेचे मतदारसंघ आहेत. न्यायदंडाधिकारी वर्ग-१ व कनिष्ट न्यायाधीश यांची सात न्यायालये आहेत. महसूल मंडले आठ असून, पोलीस ठाणी सहा आहेत. सरकारी दवाखाने, शाळा, महाविद्यालये, बँका, पतसंस्थांसह सहकारी पतसंस्था व पाणीपुरवठा संस्थांचे जाळे पसरले आहे.पेठवडगावचा व्यापार, इचलकरंजीचे सूत व हुपरीची चांदी ही या तालुक्याच्या अर्थकारणाची मोठी जमेची बाजू मानली जाते. शिरोलीच्या औद्योगिक वसाहतीने ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. इचकरंजीचा ‘पंचगंगा’, हुपरीचा ‘जवाहर’ व नरंदेचा ‘शरद’ या सहकारी साखर कारखान्यांचा तालुक्याच्या विकासात वाटा आहे.इचलकरंजी व त्या परिसरातील नागरिकांनी इचलकरंजी येथे स्वतंत्र तालुक्याचे ठिकाण असावे, अशी मागणी यापूर्वीच शासनाकडे केली आहे. ही मागणी न्याय असल्याने पेठवडगाव परिसरातील जनतेसही मान्य आहे. इचलकरंजी तालुका वेगळा होणार असल्याने उर्वरित गावांनी (पेठवडगाव परिसर) हातकणंगले हे तालुक्याचे ठिकाण अत्यंत गैरसोयीचे होणार असून, जनतेला आर्थिक फटका बसणारे आहे. पेठवडगाव हे ठिकाण तालुक्याचे ठिकाण झाल्यास विशेष करून पश्चिम-उत्तरेकडील गावांना पर्यायाने जनतेस अत्यंत सोयीचे होणार असून, खर्चात बचत करणारे आहे.पेठवडगाव या ठिकाणी मोठी बाजारपेठ, न्यायालय, बाजार समिती, तालुका खरेदी-विक्री संघ, पाटबंधारे खाते, नगरपरिषद, पोलीस ठाणे, बसस्थानक, विद्युत कार्यालय, भू-मापन कार्यालय, दूरध्वनी कार्यालय, आदी शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. मेडिकल कॉलज, डी. फार्मसी, बी. फार्मसी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, डी. एड., बी. एड., अभियांत्रिकी महाविद्यालयांबरोबरच सराफी पेठही आहे. वरीलप्रमाणे इचलकरंजी येथेही अशा सुविधा उपलब्ध असल्याने इचलकरंजी तालुका झाल्यास परिसरातील जनतेला चांगल्याच सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. हातकणंगले तालुक्यातील जनतेच्या भावनांची कदर होऊन तालुका विभाजनाची गरज आहे. (क्रमश:)