शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

‘गोकुळ’मध्ये हसन मुश्रीफ यांची भूमिका निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:28 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ व जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा घुसळण सुरू ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ व जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा घुसळण सुरू होणार आहे. जिल्हा बॅंकेपेक्षा ‘गोकुळ’ची निवडणूक अटीतटीची व प्रतिष्ठेची होणार आहे. सत्तारूढ व विरोधकांनी गेल्या वर्षभरापासून तयारी केली असली, तरी यामध्ये राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ते आपल्यासोबतच राहतील, असे दावे, प्रतिदावे सत्तारूढ व विरोधकांकडून केले जात असले, तरी त्यांनी पत्ते अद्याप खोललेले नाहीत.

जिल्हा बॅंक व ‘गोकुळ’ या दोन शिखर संस्थांवर ज्यांचे वर्चस्व, त्याचेच जिल्ह्याच्या राजकारणावर पकड राहते. त्यामुळे दोन्ही सत्तास्थाने हस्तगत करण्यासाठी चढाओढ पाहावयास मिळते. जिल्हा बॅंकेचे राजकारण हे तालुक्यातील विकास संस्थांवर अवलंबून असल्याने येथे प्रस्तापितांना सहसा धक्का लागत नाही. त्यामुळेच अपवाद वगळता २५-३० वर्षे संचालक म्हणून तीच तीच मंडळी दिसतात. ‘गोकुळ’मध्ये मात्र तशी परिस्थिती नाही. मागील निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे एकत्र आले होते. त्यांना पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी तगडे आव्हान दिले होते. सत्ता राखताना त्यांची दमछाक झाली होती. गेल्या पाच वर्षांत मल्टिस्टेट, नोकरभरतीसह ज्येष्ठ संचालकांचे बंड यामुळे ही निवडणूक सत्तारूढ गटाला तितकी सोपी नाही. त्यामुळेच मंत्री मुश्रीफ यांच्या रूपाने राष्ट्रवादी आपल्यासोबत रहावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत; तर जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ हे आपल्यासोबत असल्याने ‘गोकुळ’मध्येही ते राहतील, असा विरोधी गटाचा विश्वास आहे.

मंत्री मुश्रीफ यांच्यासह आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील यांच्याकडे ५०० ठराव आहेत. त्याशिवाय अरुण डोंगळे यांनीही ‘गोकुळ’च्या राजकारणात मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

असा राहू शकतो ‘केडीसीसी’चा फाॅर्म्युला

‘गोकुळ’च्या राजकारणाचे बॅंकेत पडसाद उमटणार असले, तरी येथे फारसा फरक पडणार नाही. विकास संस्था गटात बारा तालुक्यांतून प्रत्येकजण आपआपल्या ताकदीवर निवडून येतो. उर्वरित नऊ जागांसाठी दोन्ही काँग्रेस व शिवसेनेत समझोता होऊ शकतो.

-------------------------------------

‘महाविकास’ आघाडीला ‘गोकुळ’मध्ये ‘खो’

राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला राज्यातील स्थानिक स्वराज्य व सहकारी संस्थांत लागू करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेतृत्वाचा असला, तरी कोल्हापुरात हा फाॅर्म्युला यशस्वी होणार नाही. महापालिकेपाठोपाठ ‘गोकुळ’मध्येही त्याला ‘खो’ बसणार, हे निश्चित आहे.

-------------------------------------

माजी अध्यक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न

‘गोकुळ’चे राजकारण हे विश्वास पाटील, अरुण डोंगळे, रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील व अरुण नरके यांच्याभोवतीच फिरते. ठराव दाखल करताना विश्वास पाटील, अरुण डोंगळे व शशिकांत पाटील-चुयेकर यांनी सवतासुभा केला होता. त्यानंतर डोंगळे यांनी सत्तारूढ गटाशी फारकत घेतली आहे. संभाव्य घडामोडी ओळखून सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी विश्वास पाटील यांच्याशी जुळवून घेतले आहे; मात्र शेवटच्या टप्प्यात अनपेक्षित घडामोडी नाकारता येत नाहीत.

----------------------------

चंद्रदीप नरके यांचे ‘वेट अन्ड वॉच’

गेल्या पाच वर्षांत ‘गोकुळ’च्या राजकारणात चंद्रदीप नरके हे सतेज पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून लढले. मात्र विधानसभा निवडणुकीपासून नरके यांनी सावध भूमिका घेतली असून, सध्या तरी त्यांची भूमिका ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ अशीच आहे.

संभाव्य कोण-कोणाबरोबर राहतील

सत्तारूढ गट : पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, सत्यजित पाटील, विनय कोरे, भरमूअण्णा पाटील, बजरंग देसाई, संजय घाटगे, अरुण नरके.

विरोधी : सतेज पाटील, हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, प्रकाश आबिटकर, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राजेश पाटील, राजू शेट्टी, संपतराव पवार.