शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

दत्त कारखान्यातील राजकारणाला मूठमाती

By admin | Updated: October 14, 2014 23:23 IST

अडवणूक नाही : खासगीकरणामुळे कर्मचाऱ्यांना मिळाले राजकीय स्वातंत्र्य

सरदार चौगुले -- पोर्ले तर्फ ठाणे --गल्लीपासून दिल्लीपर्यंतची कोणतीही निवडणूक असू दे, त्या कामगारांवर राजकीय दबाव असायचा. राजकीय संघर्षामुळे नोकरीपासून दूर व्हावे लागू नये यासाठी त्यांचे सत्तेपुढे शहाणपण चालत नसे. आता मात्र साखर कारखान्याचे खासगीकरण झाल्याने त्यांच्यावर राजकीय दबाव नाही की, मतदानासाठी अडवणूक नाही. आसुर्ले-पोर्ले येथील पूर्वाश्रमीच्या दत्त साखर कारखान्यातील कामगारांबाबत हे घडले आहे. पूर्वी या कारखान्यात राजकीय विषयावर बोलायला बंदी होती. आता अशी चर्चा सुरू आहे. आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त साखर कारखाना दालमिया शुगर कंपनीने खरेदी केला. कंपनीला राजकारणाऐवजी व्यवसाय करायचा आहे. त्यामुळे या कारखान्याचे कामगार राजकारणाबाबत मुक्त आहेत. प्रत्येकाला त्याच्या मर्जीप्रमाणे पक्षाचा झेंडा हातात घेता येत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले-पोर्ले, दत्त साखर कारखाना १९८३ मध्ये सहकारातून उभारला. या कारखान्यास तीन तालुक्यांतील ८० गावांचे कार्यक्षेत्र लाभले आहे. कारखान्यांच्या इतिहासात अनेक बऱ्या-वाईट घडामोडी घडल्या. त्या सहकार क्षेत्राला ज्ञात आहेत. कारखाना लिलावात निघाला. तो दालमिया शुगर कंपनीने घेतला.पूर्वी पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील विकासाचा केंद्रबिंदू म्हणून बिरदेवाच्या माळावर नावारूपाला आलेल्या या रोपट्याने ८० गावांत आपली राजकीय पाळंमुळं रोवली. या गावात सहकारी संस्था, ग्रामपंचायत निवडणुकीत कारखान्याच्या नावाचा एक गट तयार झाला. साखर कारखान्यामुळे कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांमध्ये कारखान्याचे राजकारण घुसल्याने सहकारी संस्था मोडीत निघाल्या. शह-काटशहाच्या राजकारणाने गट-तट निर्माण झाले.गावपातळीवर सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीत उमेदवार मिळाला नाही की, कारखान्यातील कामगारांवर दबाव आणायचा आणि निवडणूक लढविण्यासाठी त्यांना भाग पाडायचे. नोकरीच्या भीतीपोटी इच्छा नसतानाही त्यांना निवडणूक आखाड्यात उतरावे लागे. विरोधी गटातील कामगाराला मतदान करण्यासाठी धमकी द्यायची अथवा त्याला मतदान करू द्यायचे नाही. हे नाही जमलं तर बदलीची कारवाई करून इतरांवर दबाव आणायचा. त्यामुळे कामगारांना मूग गिळून गप्प राहावे लागे. जरा वळवळ करणाऱ्यांची तर नोकरीतून कायमची हकालपट्टी ठरलेली. काही स्वाभिमानी कामगारांनी दबाव नको म्हणून नोकरी सोडल्याची उदाहरणेही आहेत.या कारखान्यावर ३० वर्षांत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. गणपतराव सरनोबत यांनी स्थापन केलेल्या या साखर कारखान्यावर चारवेळा सत्ता पालट झाली. उगवत्या सूर्याला नमस्कार करीत कामगारांनी दबावाखाली काम केले; पण दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या दालमिया कंपनीने अवसायानात निघालेला हा कारखाना खरेदी करून कारखान्याला राजकीय मुक्तता दिली. त्यामुळे राजकीय अड्डा असणाऱ्या कारखान्यावर आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणतीही निवडणूक असू दे, येथील कामगार राजकीय दबावापासून मुक्त झालेला दिसतो.