शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

दत्त कारखान्यातील राजकारणाला मूठमाती

By admin | Updated: October 14, 2014 23:23 IST

अडवणूक नाही : खासगीकरणामुळे कर्मचाऱ्यांना मिळाले राजकीय स्वातंत्र्य

सरदार चौगुले -- पोर्ले तर्फ ठाणे --गल्लीपासून दिल्लीपर्यंतची कोणतीही निवडणूक असू दे, त्या कामगारांवर राजकीय दबाव असायचा. राजकीय संघर्षामुळे नोकरीपासून दूर व्हावे लागू नये यासाठी त्यांचे सत्तेपुढे शहाणपण चालत नसे. आता मात्र साखर कारखान्याचे खासगीकरण झाल्याने त्यांच्यावर राजकीय दबाव नाही की, मतदानासाठी अडवणूक नाही. आसुर्ले-पोर्ले येथील पूर्वाश्रमीच्या दत्त साखर कारखान्यातील कामगारांबाबत हे घडले आहे. पूर्वी या कारखान्यात राजकीय विषयावर बोलायला बंदी होती. आता अशी चर्चा सुरू आहे. आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त साखर कारखाना दालमिया शुगर कंपनीने खरेदी केला. कंपनीला राजकारणाऐवजी व्यवसाय करायचा आहे. त्यामुळे या कारखान्याचे कामगार राजकारणाबाबत मुक्त आहेत. प्रत्येकाला त्याच्या मर्जीप्रमाणे पक्षाचा झेंडा हातात घेता येत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले-पोर्ले, दत्त साखर कारखाना १९८३ मध्ये सहकारातून उभारला. या कारखान्यास तीन तालुक्यांतील ८० गावांचे कार्यक्षेत्र लाभले आहे. कारखान्यांच्या इतिहासात अनेक बऱ्या-वाईट घडामोडी घडल्या. त्या सहकार क्षेत्राला ज्ञात आहेत. कारखाना लिलावात निघाला. तो दालमिया शुगर कंपनीने घेतला.पूर्वी पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील विकासाचा केंद्रबिंदू म्हणून बिरदेवाच्या माळावर नावारूपाला आलेल्या या रोपट्याने ८० गावांत आपली राजकीय पाळंमुळं रोवली. या गावात सहकारी संस्था, ग्रामपंचायत निवडणुकीत कारखान्याच्या नावाचा एक गट तयार झाला. साखर कारखान्यामुळे कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांमध्ये कारखान्याचे राजकारण घुसल्याने सहकारी संस्था मोडीत निघाल्या. शह-काटशहाच्या राजकारणाने गट-तट निर्माण झाले.गावपातळीवर सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीत उमेदवार मिळाला नाही की, कारखान्यातील कामगारांवर दबाव आणायचा आणि निवडणूक लढविण्यासाठी त्यांना भाग पाडायचे. नोकरीच्या भीतीपोटी इच्छा नसतानाही त्यांना निवडणूक आखाड्यात उतरावे लागे. विरोधी गटातील कामगाराला मतदान करण्यासाठी धमकी द्यायची अथवा त्याला मतदान करू द्यायचे नाही. हे नाही जमलं तर बदलीची कारवाई करून इतरांवर दबाव आणायचा. त्यामुळे कामगारांना मूग गिळून गप्प राहावे लागे. जरा वळवळ करणाऱ्यांची तर नोकरीतून कायमची हकालपट्टी ठरलेली. काही स्वाभिमानी कामगारांनी दबाव नको म्हणून नोकरी सोडल्याची उदाहरणेही आहेत.या कारखान्यावर ३० वर्षांत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. गणपतराव सरनोबत यांनी स्थापन केलेल्या या साखर कारखान्यावर चारवेळा सत्ता पालट झाली. उगवत्या सूर्याला नमस्कार करीत कामगारांनी दबावाखाली काम केले; पण दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या दालमिया कंपनीने अवसायानात निघालेला हा कारखाना खरेदी करून कारखान्याला राजकीय मुक्तता दिली. त्यामुळे राजकीय अड्डा असणाऱ्या कारखान्यावर आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणतीही निवडणूक असू दे, येथील कामगार राजकीय दबावापासून मुक्त झालेला दिसतो.