शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सौते ग्रामस्थ पाणीसाठी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : सौते गावाच्या पाचशे ते सातशे मीटर अंतरावर कडवी नदी भरून वाहत आहे. तरीदेखील गावातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : सौते गावाच्या पाचशे ते सातशे मीटर अंतरावर कडवी नदी भरून वाहत आहे. तरीदेखील गावातील नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळत आहे. मिळत असलेले पाणी दूषित आहे, असा ग्रामस्थांचा आरोप असून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

ग्रामीण नळ पाणीपुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना पाण्याची सोय करावी अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

शाहूवाडी तालुक्याच्या ठिकाणापासून पंधरा किलोमीटर अंतरावर मलकापूर- सरूड रस्त्यावर सौते गाव वसले आहे. गावची लोकसंख्या दीड हजाराच्या आसपास आहे. गावातील ग्रामस्थांना नेहमी पाणीटंचाई जाणवत होती. त्यामुळे २०११ साली शासनाने गावात नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी ३५ लाख रुपये मंजूर केले होते. सदर योजनेचे काम जिल्हा परिषदेच्या ग्रामीण नळपाणी पुरवठा कार्यालयाच्या अंतर्गत सुरू होते. ठेकेदाराने कडवी नदीपात्रात जॅकवेल बांधले. मात्र, सदर योजनेचे काम म्हणावे तसे झालेले नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. नदी भरून वाहू लागली की, जॅकवेलला पाणी असते. सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे कडवी नदीचे पाणी पात्रात गेले आहे. त्यामुळे जॅकवेलला पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नदीपात्राचे पाणी खाली गेल्यामुळे अधिकाऱ्यांनी जॅकवेलला बोगदा पाडून नदीचे पाणी आत सोडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लगत आहे. जॅकवेलशेजारी जनावरे पाण्यात घालून धुतली जात असतात. तेच शेणमिश्रित पाणी जॅकवेलमध्ये खोदलेल्या खड्ड्यातून जात आहे. त्यामुळे पारदर्शकतेचा टेंभा मिरवणाऱ्या नळ पाणीपुरवठा कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सौते ग्रामस्थांनी लोकशाही दिनात तक्रार केली होती. शाहूवाडी तालुक्यातील अनेक वाड्या- वस्त्यांवर पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, अधिकारी कागदी घोडे नाचवून शासनाला खोटा अहवाल पाठविला जातो. जनता मात्र पाणीटंचाईपासून हैराण होत आहे.