शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

देशाची महिलारुपी अर्धी शक्ती घरातच

By admin | Updated: March 11, 2017 23:47 IST

चंद्रकांतदादा पाटील : ताराराणी महोत्सवास ‘खराडे कॉलेज कॅम्पस’मध्ये प्रारंभ

कोल्हापूर : महिलांच्या रूपाने देशाची पन्नास टक्के शक्ती घरातच अडकून पडली आहे. या शक्तीला प्रेरणा व प्रोत्साहन देऊन, सक्रिय करून गतिमान करण्यासाठी सरकार पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. उत्पादित मालाची गुणवत्ता ठिकवण्यासाठी बचत गटांना मार्केटिंगबरोबर प्रशिक्षणाची गरज आहे. त्याशिवाय बचत गट स्पर्धेत टिकू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषदेच्या वतीने खराडे कॉलेज कॅम्पस, शिवाजी पेठ येथे आयोजित केलेल्या ‘ताराराणी महोत्सवा’स शनिवारी प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील होत्या. बचत गटांच्या उत्पादित मालाची विक्री होईलच; पण त्याची स्तुती होण्यासाठी प्रयत्न करावेत. देशातील प्रत्येक माणसाने कष्ट करून जगले पाहिजे, असा सरकारचा प्रयत्न आहे. अनुदान, कर्ज, कर्जमाफी या गोष्टींचा विचार त्या- त्यावेळी घेतला जातो; पण एखादी व्यक्ती मोकळी राहिली की, तिच्यात विकृती तयार होते. त्यातूनच तरुण-तरुणींमध्ये टिंगलखोरी वाढत जाते. यासाठी आपल्या जीवनातील जास्तीत जास्त वेळ पैसे कमविण्यासाठी खर्च केला पाहिजे. बचत गटांना सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर विक्री केंद्रे सुरू करण्याबरोबरच बिनव्याजी व विनाभाड्याने विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले. बचत गटांनी आपल्या उत्पादित मालाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करीत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भागीरथी महिला मंडळातर्फे बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी, यासाठी आॅनलाईन शॉपिंगची सोय करून दिली आहे. जिल्हा विक्री केंद्रे बंद पडली असून, ती पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करीत अध्यक्ष विमल पाटील म्हणाल्या, ताराराणी महोत्सव हा महिलांना हक्काचे व्यासपीठ आहे, त्याचा लाभ घ्यावा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी स्वागत केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी महापौर हसिना फरास, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, माजी महापौर सई खराडे, अभिजित तायशेटे, सीमा पाटील, अश्विनी धोत्रे, अर्चना खाडे, प्रकल्प संचालक डॉ. एच. ई. जगताप, युनियन बॅँकेच्या जिल्हा समन्वयक तृप्ती गायकी, लीड बॅँकेचे व्यवस्थापक एस. जी. किणिंगे, आदी उपस्थित होते. सरकार चालविताना हैराण! गेल्या अडीच वर्षांत राज्यातील विविध विभागांतील अधिकाऱ्यांचे कामकाज जवळून पाहिले आहे. सरकार चालविताना आपण हैराण झाल्याची उद्विग्न भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. ‘ताराराणी महोत्सवा’त पहिल्या दिवशी दीड लाखाची उलाढाल झाली. महोत्सवात १५८ स्टॉल असून, त्यामध्ये ३९ खाद्यांचे, तर ११९ बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. बुधवार (दि. १५) पर्यंत महोत्सव चालणार आहे. ३६ बचत गटांचा गौरव!जिल्ह्णातील ३६ बचत गटांचा ‘राजमाता जिजाऊ स्वावलंबन’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रत्येक तालुक्यातील तीन बचतगटांना मंत्री पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटनग्रामीण भागातील जनतेला सहजपणे जिल्हा परिषदेची माहिती व सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले.