शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

हळदवडे-करंजिवणे ग्रामस्थ पाणीप्रश्नावरून आमने-सामने

By admin | Updated: March 29, 2017 00:51 IST

हळदवडेकरांचा रास्ता रोकोचा इशारा : पोलिस बंदोबस्तात करंजिवणेकर घेणार पाणी

मुरगूड : कागल तालुक्यातील करंजिवणे गावच्या हद्दीत असणाऱ्या तलावातील पाणी शेतीसाठी वापरण्यावरून करंजिवणे आणि हळदवडे या दोन गावांतील ग्रामस्थांमध्ये गेल्या महिन्यापासून वाद सुरू आहे. मुरगूड पोलिस, कागल तहसीलदार, स्थानिक पातळीवर बैठका पार पडूनसुद्धा या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. तलावात पाणी असूनही वादाने शेतातील पिके वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली असल्याने करंजिवणेकर ग्रामस्थांनी पाटबंधारे खात्याला कोणत्याही परिस्थितीत तलावातील पाणी कालव्यात सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असून, हळदवडेकर मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जर आमच्या मागणीचा विचार न करता पाणी सोडले तर रास्ता रोको आणि उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे हा पाणी वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे करंजिवणे तलावातून दौलतवाडी, बोळावी, बोळावीवाडी, ठाणेवाडी, पळशिवणे या गावांना पिण्याचे पाणी दिले जाते, तर हळदवडे आणि करंजिवणे या गावांतील शेतीला आणि पिण्यासाठी पाणी दिले जाते. काही दिवसांपूर्वी हळदवडे गावातील ग्रामस्थांनी आपल्याला पाणी पाहिजे, असे सांगून निढोरी येथील पाटबंधारे कार्यालयात रीतसर पाणीपट्टी भरून कालव्यातून आणि ओढ्यातून पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार रीतसर या तलावातून पाणी सोडले होते. सुमारे दोन तासांनंतर ही बातमी करंजिवणे ग्रामस्थांना समजली. त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ तलावावर जमले आणि तेथूनच पाटबंधारे विभागातील अधिकारी डी. बी. दारवाडकर यांच्याशी संपर्क साधून कालव्यातून सोडलेले पाणी बंद करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थ संतप्त झालेले पाहून दारवाडकरांनी कालव्यातून सोडलेले पाणी तत्काळ बंद केले आणि तेथूनच वादाला सुरुवात झाली करंजिवणेकर ग्रामस्थांनी कालव्यातून पाणी सोडून हळदवडे ग्रामस्थ आपल्या खासगी विहिरी भरून घेतात. त्यामुळे पाणी अजिबात सोडू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे, तर तलाव बांधताना हळदवडे गावातील लोकांची जमीन जास्त गेली असून, वर्षभर करंजिवणे गावातील लोकच या तलावातील पाण्याचा फायदा घेतात. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार आम्हाला पाणी मिळालेच पाहिजे. अन्यथा सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील, असा इशारा दिला आहे. दोन्ही गावकऱ्यांनी आपल्या मागणीची निवेदने मुरगूड पोलिस व पाटबंधारे अधिकाऱ्यांना दिली आहेत. पाणी हक्कावरून पेटलेला हा वाद या दोन गावांतील प्रमुखांनी चर्चा करून मिटविला पाहिजे. अन्यथा, शिवेला शिव असणाऱ्या या दोन गावांत पाण्यावरून संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)१ सरतेशेवटी आपण आपल्या खर्चातून कालवा दुरुस्त करून घेतो. पाटबंधारे खात्याने पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी हळदवडेकर ग्रामस्थांनी केली आहे. २ पाटबंधारे विभागातील अधिकारी डी. बी. दारवाडकर यांनी त्याला मान्यताही दिली आहे; पण दारवाडकर यांच्या मते या लोकांना कालव्याच्या खाली असणाऱ्या ओढ्यातून पाणी हवे आहे. ३ याला मात्र करंजिवणेकर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी हा प्रश्न तत्काळ सोडवावा. अन्यथा, यातून या दोन्ही गावांत प्रचंड वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.