शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

महापालिकेत गुंडाराज; अधिकारी त्रस्त

By admin | Updated: September 25, 2016 01:11 IST

कारभारी नगरसेवकांची दादागिरी : प्रशासन विरूद्ध लोकप्रतिनिधी संघर्ष होतोय तीव्र

कोल्हापूर : महानगरपालिकेत पक्षीय राजकारण आल्यावर शहराचा विकास होईल, पालिकेतील राजकारणाला शिस्त लागेल, अशी भाबडी आशा बाळगून जनतेने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी निवडून दिले खरे; परंतु तेथे विकासकामे होण्याऐवजी पक्षीय अभिनिवेशच अधिक पाहायला मिळत आहे. काही कारभारी नगरसेवकांची दादागिरी अधिकाऱ्यांची डोकेदुखी बनली असून, त्याचा विकासकामांवर परिणाम होत आहे. आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नगरसेवकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनात संतापाची तीव्रता खदखदत आहे. सध्या तरी ‘प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी’ असा संघर्ष तीव्रतेने समोर आला आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांत चार अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले, काही अधिकाऱ्यांनी बदली करून घेतली, तर असंख्य अधिकारी आजही दबावाखाली काम करीत आहेत. प्रशासनाकडे ज्या फायली अडकलेल्या आहेत, त्या क्लीअर करून द्याव्यात म्हणून प्रा. जयंत पाटील, शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव यांच्यासारख्या ज्येष्ठ नगरसेवकांनी उपायुक्त विजय खोराटे यांच्यावर ज्या पद्धतीने दबाव टाकला, जर त्या फायली नियमांत बसणाऱ्या असतील तर त्या क्लीअर करून पुढे पाठवा म्हणून सांगण्याचीही गरज नाही. अधिकाऱ्यांचे ते कामच आहे. मग त्यासाठी एवढे आकांडतांडव करण्याची गरज काय होती? असा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला. आमच्या फायली जर नियमांत बसत असतील तर त्या क्लीअर कराव्यात, असे त्यावेळी प्रा. पाटील यांचे म्हणणे होते; परंतु त्यांचा आग्रह संशयाचे वातावरण निर्माण करून गेला. महिला बाल कल्याण समिती सदस्य व सभापतींची निवड घेऊ नये म्हणून तत्कालीन सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्या प्रामाणिकपणाचा उद्धार केला गेला, त्यावेळी त्यांना धमकावण्यातही आले. न्यायालयाने दिलेला निर्णय डावलून आम्ही सांगतो म्हणून प्रक्रिया थांबवा म्हणणे योग्य नाही. न्यायालयाचा आदेश मानून उमेश रणदिवे यांनी ती प्रक्रिया राबविली. त्यामुळे कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रचंड रोषाला बळी पडावे लागले. त्यातून त्यांनी नोकरीचा राजीनामाच दिला. पक्षीय राजकारणाचा परिणाम महापालिकेत कॉँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. भाजप-ताराराणी आघाडी विरोधी बाकांवर आहे; परंतु खासदार धनंजय महाडिक, महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाची लागण महापालिकेलही झाली आहे. पूर्वी निवडणूक झाली की सर्वजण एक होऊन काम करीत होते; पण अलीकडे हा संघर्ष तीव्र झाला आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेविका ताराराणी-भाजपच्या नगरसेविकांबरोबर साधे बोलतानाही दिसत नाहीत. ताराराणी-भाजपचे नगरसेवक एखाद्या विषयावर आयुक्तांना भेटले की त्याच विषयावर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवकही लगेच भेटतात. खासदार महाडिक यांनी एक बैठक घेतल्यावर दुसऱ्याच दिवशी आमदार पाटील यांनी बैठक घेतली. एवढी कटुता नगरसेवकांत निर्माण झाली आहे. निवडणूक संपल्यावर राजकारण सोडून देणे आवश्यक आहे; परंतु अजूनही हे राजकारण नगरसेवकांना चिकटूनच आहे.