शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

ग्रामीण साहित्य समाजाला दिशा देणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:18 IST

कोल्हापूर : ग्रामीण साहित्याचा बाज वेगळा आहे. या ग्रामीण भागातील लेखकांच्या लेखणीमधून निर्मित होणारे साहित्य समाजाला ...

कोल्हापूर : ग्रामीण साहित्याचा बाज वेगळा आहे. या ग्रामीण भागातील लेखकांच्या लेखणीमधून निर्मित होणारे साहित्य समाजाला दिशा देणारे आहे. जे घडलं, जे सोसलं त्याचे प्रतिबिंब विजय पाटील लिखित ‘आम्ही जगाचे कैवारी’ या पुस्तकात स्पष्टपणे उमटले आहे. समाजाला अशा साहित्याची गरज आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित देशमुख यांनी गुरुवारी केले.

येथील वाचनकट्टा निर्मित आणि विजय शहाजी पाटील लिखित ‘आम्ही जगाचे कैवारी’ या पुस्तकाच्या ऑनलाइन प्रकाशनावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. या पुस्तकाचे लेखक विजय पाटील यांच्या हातामध्ये असणारा पाना त्यांची लेखणी बनला आहे. या दर्जेदार लेखणीतून आणखी साहित्याची मांडणी व्हावी, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. विजय पाटील हे बदलाला सामोरे जाणारे लेखक असून त्यांची पहिली साहित्यकृती आम्ही जगाचे कैवारी वाचकांना आवडेल असा आशावाद डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी सदिच्छा फाउंडेशनचे सुहास रोमाने, कौस्तुभ यादव, सचिन मुळे, विष्णू पावले, संजय पाटील, आनंद पाटील उपस्थित होते. वाचनकट्ट्याचे संकल्पक युवराज कदम यांनी प्रास्तविक केले. बी. डी. कुंभार यांनी आभार मानले.

फोटो (१९०७२०२१-कोल-आम्ही जगाचे कैवारी पुस्तक) : शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ‘आम्ही जगाचे कैवारी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी शेजारी डॉ. डी. टी. शिर्के, विजय पाटील, इंद्रजित देशमुख, युवराज कदम आदी उपस्थित होते.