शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

पालकमंत्र्यांची सूचना धाब्यावर

By admin | Updated: June 17, 2014 01:47 IST

‘आयआरबी’ची अरेरावी : नको म्हटल्यावर लगेचच टोलवसुली

कोल्हापूर : शहरात करण्यात आलेल्या रस्तेविकास प्रकल्पाचे राज्य सरकारच्या सूचनेनुसार मूल्यांकनासह रस्त्यांचा दर्जा तपासण्याचे काम सुरू आहे, तोपर्यंत टोलवसुली करू नये, अशी सूचना आयआरबी कंपनीला केल्याची माहिती पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तथापि, पालकमंत्र्यांनी दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेत निवेदन करून कोल्हापूर सोडताच आयआरबी कंपनीने शहरातील सर्व नाक्यांवर अचानक टोलवसुली सुरू करून पालकमंत्र्यांच्या सूचना धुडकावून लावली. पालकमंत्री यांनी दुपारी निवेदन करून कोल्हापूर सोडले. पालकमंत्री जाताच आयआरबीने टोलवसुली सुरू केली. कोणी काहीही सांगितले तरी आम्ही गप्प बसणार नाही, असेच जणू त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. विशेष म्हणजे पालकमंत्री कोल्हापुरात येऊन जाणे आणि आयआरबीने टोल सुरू करणे या गोष्टी योगायोगाने घडल्या, की हे सर्व ठरवून केले, असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला. आज, सोमवारी नियोजन मंडळाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांनी आयआरबीने केलेल्या खराब रस्त्यांबाबत पालकमंत्र्यांना छेडले. आयआरबीकडून खराब दर्जाचे रस्ते होत असताना ते रोखण्याकरिता पालकमंत्री कोठे दिसले नाहीत, असे विचारता केल्यावर ते पत्रकारांवरच खेकसले. ‘पालकमंत्री म्हणून मी काय करायला पाहिजे अशी तुमची इच्छा आहे? प्रत्येक गोष्टीत पालकमंत्र्यांनी लक्ष घातलेच पाहिजे का?’ असे उलटे प्रश्नच त्यांनी पत्रकारांना केले. ‘मी रस्तेविकास प्रकल्पाच्या कामात पहिल्यापासून आहे. रस्ते खराब होत होते, तर पत्रकार त्यावेळी कोठे होते?’ असा सवालही त्यांनी केला. यावेळी उपस्थित पत्रकारांनीही पालकमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले. ‘शहरात चुकीची कामे होत होती, त्यावेळी वर्तमानपत्रांनीच त्यांवर आवाज उठविला. म्हणूनच कोल्हापुरात आंदोलन उभे राहिले. सरकार आणि पालकमंत्री म्हणून तुमची जबाबदारी नव्हती का?’ असे पत्रकारांनी सुनावल्यावर पालकमंत्री निरुत्तर झाले. अखेर त्यांनी पत्रकारांवरील आक्षेप मागे घेतला. टोलबाबत जनतेत संभ्रम आहे. कोल्हापूर-सांगली रस्त्याबाबतही अशीच परिस्थिती आहे. तेथे काम बंद आहे. जनतेच्या भावनेची कदर सरकारला करावीच लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)