शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पालकमंत्र्यांची सूचना धाब्यावर

By admin | Updated: June 17, 2014 01:47 IST

‘आयआरबी’ची अरेरावी : नको म्हटल्यावर लगेचच टोलवसुली

कोल्हापूर : शहरात करण्यात आलेल्या रस्तेविकास प्रकल्पाचे राज्य सरकारच्या सूचनेनुसार मूल्यांकनासह रस्त्यांचा दर्जा तपासण्याचे काम सुरू आहे, तोपर्यंत टोलवसुली करू नये, अशी सूचना आयआरबी कंपनीला केल्याची माहिती पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तथापि, पालकमंत्र्यांनी दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेत निवेदन करून कोल्हापूर सोडताच आयआरबी कंपनीने शहरातील सर्व नाक्यांवर अचानक टोलवसुली सुरू करून पालकमंत्र्यांच्या सूचना धुडकावून लावली. पालकमंत्री यांनी दुपारी निवेदन करून कोल्हापूर सोडले. पालकमंत्री जाताच आयआरबीने टोलवसुली सुरू केली. कोणी काहीही सांगितले तरी आम्ही गप्प बसणार नाही, असेच जणू त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. विशेष म्हणजे पालकमंत्री कोल्हापुरात येऊन जाणे आणि आयआरबीने टोल सुरू करणे या गोष्टी योगायोगाने घडल्या, की हे सर्व ठरवून केले, असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला. आज, सोमवारी नियोजन मंडळाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांनी आयआरबीने केलेल्या खराब रस्त्यांबाबत पालकमंत्र्यांना छेडले. आयआरबीकडून खराब दर्जाचे रस्ते होत असताना ते रोखण्याकरिता पालकमंत्री कोठे दिसले नाहीत, असे विचारता केल्यावर ते पत्रकारांवरच खेकसले. ‘पालकमंत्री म्हणून मी काय करायला पाहिजे अशी तुमची इच्छा आहे? प्रत्येक गोष्टीत पालकमंत्र्यांनी लक्ष घातलेच पाहिजे का?’ असे उलटे प्रश्नच त्यांनी पत्रकारांना केले. ‘मी रस्तेविकास प्रकल्पाच्या कामात पहिल्यापासून आहे. रस्ते खराब होत होते, तर पत्रकार त्यावेळी कोठे होते?’ असा सवालही त्यांनी केला. यावेळी उपस्थित पत्रकारांनीही पालकमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले. ‘शहरात चुकीची कामे होत होती, त्यावेळी वर्तमानपत्रांनीच त्यांवर आवाज उठविला. म्हणूनच कोल्हापुरात आंदोलन उभे राहिले. सरकार आणि पालकमंत्री म्हणून तुमची जबाबदारी नव्हती का?’ असे पत्रकारांनी सुनावल्यावर पालकमंत्री निरुत्तर झाले. अखेर त्यांनी पत्रकारांवरील आक्षेप मागे घेतला. टोलबाबत जनतेत संभ्रम आहे. कोल्हापूर-सांगली रस्त्याबाबतही अशीच परिस्थिती आहे. तेथे काम बंद आहे. जनतेच्या भावनेची कदर सरकारला करावीच लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)