शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांची सूचना धाब्यावर

By admin | Updated: June 17, 2014 01:47 IST

‘आयआरबी’ची अरेरावी : नको म्हटल्यावर लगेचच टोलवसुली

कोल्हापूर : शहरात करण्यात आलेल्या रस्तेविकास प्रकल्पाचे राज्य सरकारच्या सूचनेनुसार मूल्यांकनासह रस्त्यांचा दर्जा तपासण्याचे काम सुरू आहे, तोपर्यंत टोलवसुली करू नये, अशी सूचना आयआरबी कंपनीला केल्याची माहिती पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तथापि, पालकमंत्र्यांनी दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेत निवेदन करून कोल्हापूर सोडताच आयआरबी कंपनीने शहरातील सर्व नाक्यांवर अचानक टोलवसुली सुरू करून पालकमंत्र्यांच्या सूचना धुडकावून लावली. पालकमंत्री यांनी दुपारी निवेदन करून कोल्हापूर सोडले. पालकमंत्री जाताच आयआरबीने टोलवसुली सुरू केली. कोणी काहीही सांगितले तरी आम्ही गप्प बसणार नाही, असेच जणू त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. विशेष म्हणजे पालकमंत्री कोल्हापुरात येऊन जाणे आणि आयआरबीने टोल सुरू करणे या गोष्टी योगायोगाने घडल्या, की हे सर्व ठरवून केले, असा सवाल यानिमित्ताने निर्माण झाला. आज, सोमवारी नियोजन मंडळाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांनी आयआरबीने केलेल्या खराब रस्त्यांबाबत पालकमंत्र्यांना छेडले. आयआरबीकडून खराब दर्जाचे रस्ते होत असताना ते रोखण्याकरिता पालकमंत्री कोठे दिसले नाहीत, असे विचारता केल्यावर ते पत्रकारांवरच खेकसले. ‘पालकमंत्री म्हणून मी काय करायला पाहिजे अशी तुमची इच्छा आहे? प्रत्येक गोष्टीत पालकमंत्र्यांनी लक्ष घातलेच पाहिजे का?’ असे उलटे प्रश्नच त्यांनी पत्रकारांना केले. ‘मी रस्तेविकास प्रकल्पाच्या कामात पहिल्यापासून आहे. रस्ते खराब होत होते, तर पत्रकार त्यावेळी कोठे होते?’ असा सवालही त्यांनी केला. यावेळी उपस्थित पत्रकारांनीही पालकमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले. ‘शहरात चुकीची कामे होत होती, त्यावेळी वर्तमानपत्रांनीच त्यांवर आवाज उठविला. म्हणूनच कोल्हापुरात आंदोलन उभे राहिले. सरकार आणि पालकमंत्री म्हणून तुमची जबाबदारी नव्हती का?’ असे पत्रकारांनी सुनावल्यावर पालकमंत्री निरुत्तर झाले. अखेर त्यांनी पत्रकारांवरील आक्षेप मागे घेतला. टोलबाबत जनतेत संभ्रम आहे. कोल्हापूर-सांगली रस्त्याबाबतही अशीच परिस्थिती आहे. तेथे काम बंद आहे. जनतेच्या भावनेची कदर सरकारला करावीच लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)