शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी सातबारावर भात पीकपाणी नोंद केल्यास हमीभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST

भात पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने बहुतांशी शेतकरी इतर पिकाकडे वळला होता.भात पिकांचे उत्पादन वाढावे यासाठी कृषिखात्यामार्फत सन २०२० ...

भात पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने बहुतांशी शेतकरी इतर पिकाकडे वळला होता.भात पिकांचे उत्पादन वाढावे यासाठी कृषिखात्यामार्फत सन २०२० या खरीप हंगामात पिकविलेल्या भाताला प्रतिक्विंटल १८६८ रुपये हमीभाव व राज्य शासनाने प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. असे एकूण २५६८ रुपये प्रतिक्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे; मात्र ज्या शेतात या भाताचे पीक शेतकरी घेणार आहे. त्या गटाच्या सातबारा उताऱ्यावर दरवर्षी ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पीकपाणी कार्यक्रमात भातपीक अशी नोंद असणे गरजेचे आहे.

यावर्षी ही योजना कार्यान्वित झाल्यास अनेक शेतकऱ्यांना लाभ होणार असे चित्र दिसते.

जिल्ह्यात भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते; मात्र या भात उत्पादित पिकाला योग्य भाव देणारी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने तसेच प्रसंगी उत्पादित खर्च व त्याला मिळणारा भाव याच्यामध्ये मोठी तफावत याचा आर्थिक ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे. शासकीय खरेदी केंद्र उपलब्ध असताना ही योजना अनेक शेतकऱ्यांना माहिती नसल्याने या लाभापासून वंचित राहिले आहेत.

खासगी व्यापारी या भाताची खरेदी कमी दराने करून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवतात.योग्य भाव न मिळाल्याने प्रसंगी शेतकरी कर्जबाजारीच राहतो.यासाठी शासकीय केंद्रावर भात विक्रीसाठी पीकपाणी नोंद सातबारावर आवश्यक आहे.

गत हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी,आजरा, तुर्केवाडी व अडकूर या चार शासकीय भात खरेदी केंद्रावर उत्पादित दोन लाख एक्याऐंशी हजार क्विंटल भातापैकी फक्त सात हजार क्विंटल भात खरेदी केले होते. हे प्रमाण उत्पादित भाताच्या फक्त अडीच टक्के आहे.इतर भाताची खरेदी ही कमी दराने केली असावी अशी दिसते. भाताला जास्त दर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी सातबारावर नोंदणी करावी.