शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

शेतीमाल तारण योजनेत गुळाचा समावेश : चंद्रकांतदादा

By admin | Updated: January 19, 2016 00:35 IST

बाजार समिती आढावा बैठक : गूळ साठवणुकीसाठी गोदामांचा वापर करा

कोल्हापूर : शेतीमाल तारण योजनेत गुळाचा समावेश करणार असून, त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या मालकीच्या गोदामांचा साठवणुकीसाठी वापर करावा, असे प्रतिपादन सहकार व पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे केले. येथील राजर्षी शाहू मार्केट यार्डच्या सभागृहात कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाज आढावा व विभागीय पणनच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद अकरे, विभागीय निबंधक राजेंद्र दराडे, बाजार समित्यांचे समन्वय अधिकारी रमेश शिंगटे, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती परशुराम खाडे, उपसभापती विलास साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. बऱ्याच वर्षांपासून गुळाचा समावेश शेतीमाल तारण योजनेत व्हावा, अशी मागणी होती. शेतीमाल तारण योजनेत गुळाचा समावेश लवकरच करण्यात येणार असल्याचे सहकार व पणन मंत्र पाटील यांनी सांगितले.ते म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीने अधिकाधिक सक्षम होण्यासाठी नवनवीन स्रोतांचा विचार करावा. फळे आणि भाजीपाला मार्केटमध्ये दररोज तयार होणारा कचरा आणि जनावरांच्या बाजारातील शेण यांचा वापर करून गांडूळ खत निर्मितीच्या प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करावा. बाजार समितीने सक्षमीकरणासाठी व शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, त्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. मिलिंद आकरे यांनी कोल्हापूर विभागातील एकूण शेतकरी, या ठिकाणचे एकूण भौगोलिक क्षेत्रनिहाय उत्पादन व मार्केटमध्ये न येणारा माल याबाबत अभ्यास होण्याची आवश्यकता व्यक्त करून राज्य शासन व केंद्र शासन यांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जास्तीत जास्त देण्यासाठी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, सांगलीचे प्रकाश आष्टेकर, साताऱ्याचे महेश कदम, कृषी पणन मंडळाचे उपव्यवस्थापक एस. टी. गुंजाळ, कोल्हापूर विभागाचे पणनचे उपमहाव्यवस्थापक सुभाष घुले यांच्यासह कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)कागल येथे शीतगृह होण्यासाठी प्रयत्न स्पर्धेच्या युगात टिकून रहायचे असेल तर बाजार समितीची प्रक्रिया युनिट, शीतगृहे, गोदामे, पॅकिंग हाऊस असले पाहिजे, असे सांगून सहकारमंत्री पाटील यांनी कागल येथे शीतगृह व्हावे यासाठीही प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले. पणनमधील १२ (१) च्या परवानग्या शासन स्तरावरून लवकरात लवकर देण्यात येतील, तसेच कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रश्नांसाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.