शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

ग्रामपंचायतींनी घरफाळा वसुली करू नये

By admin | Updated: April 23, 2015 00:56 IST

राज्य शासनाचा आदेश : २७ हजार ८३१ ग्रामपंचायतींना कारभार चालविणे बनले अवघड

सतीश पाटील -शिरोली महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी घरफाळा वसुली करू नये, असा आदेश ग्रामविकास विभागाने जारी केल्याने राज्यातील २७ हजार ८३१ ग्रामपंचायतींना कारभार चालविणे अवघड झाले आहे. यामुळे लोकांना मात्र महागाईच्या काळात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत कर आणि फी नियम १९६0 अंतर्गत ग्रामपंचायती हद्दीतील बांधकामांवर इमारतीच्या भांडवली मूल्यांवर आधारित फाळा (कर) आकारणी करण्यात येत होती; पण शासनाने ३ डिसेंबर १९९९ला भांडवलाऐवजी क्षेत्रफळावर आधारित कर आकारणी करण्याबाबत सुधारणा केली व त्यानुसार आकारणी सुरू झाली; पण ही आकारणी योग्य नाही म्हणून डॉ. विजय दिनकरराव शिंदे आणि इतर लोकांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयाने १० नोव्हेंबर २०१४ ला ग्रामपंचायत कर आकारणीबाबत समानता आणि सुसूत्रता ठेवण्याकरिता महाराष्ट्र शासनास अभ्यास समिती नेमून न्यायालयास योग्य माहिती द्यावी. तसेच जोपर्यंत न्यायालयाचा आदेश होत नाही, तोपर्यंत राज्यातील ग्रामपंचायतींना फाळा वसुलीस स्थगिती देण्याचे आदेश शासनाने दिले. त्यानुसार शासनाने ९ जानेवारी २०१५ला अभ्यास समिती नेमली असून, न्यायालयाचा पुढील आदेश होईपर्यंत ग्रामपंचायतींनी फाळा (कर) वसुली करू नये, असा आदेश ग्रामविकास विभागाने ६ एप्रिलला २७,८३१ ग्रामपंचायतींना लागू केला आहे. मात्र, राज्यातील ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत घरफाळ्यावर अवलंबून आहे. घरफाळ्यातून मोठा निधी मिळतो. याच निधीतून कचरा व्यवस्थापन, स्थानिक आरोग्य सेवा, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, वीज बिल, टेलिफोन बिल, तसेच कर्मचाऱ्यांचा मासिक पगार, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातील १५ टक्के निधी मागासवर्गीय समाजासाठी, दहा टक्के निधी महिला आणि बालकल्याण, तर तीन टक्के निधी अपंगांसाठी खर्च करावा लागतो. शासनाने फाळा वसुली करू नये, असा आदेश जारी केल्याने ग्रामपंचायतींना गावगाडा चालविणे अवघड झाले आहे.