शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

ग्रामपंचायतींच्या बेलगाम वसुलीला चाप

By admin | Updated: November 14, 2014 00:57 IST

मालमत्ता कर घटनाबाह्य: न्यायालयाच्या निकालाबाबत प्रशासन सावध; आदेशाची प्रतिक्षा

भीमगोंडा देसाई / कोल्हापूरमुंबई उच्च न्यायालयाने बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार कर आकारण्याची सध्याची पद्धत घटनाबाह्य ठरविली आहे. यामुळे शासन आता पर्यायी व्यवस्था तयार करणार की, निकालाच्या विरोधात आव्हान याचिका किंवा फेरविचार याचिका दाखल करणार याची प्रतीक्षा ताणली आहे. सन २००० पासून ग्रामपंचायत विभाग व दर्जानुसार प्रती चौरस फुटानुसार इमारतीवर आणि खुल्या जागेवर कर आकारणी करीत आहे. या आकरणीच्या पद्धतीमध्ये शासनाने निर्धारित नियमाच्या चौकटीत राहूनच कर निश्चित करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहेत. मात्र बहुतांश ग्रामपंचायतींचा कल कमीत कर आकारणीकडे असतो. वर्षाला एकदा प्रत्येक मालमत्ताधारकाला कर भरावे लागते. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे मूळ स्रोत म्हणून मालमत्ता कराकडे पाहिले जाते. या करातून संकलित होणाऱ्या निधीतून ग्रामपंचायत गावात मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असते. यामुळे सर्वच ग्रामपंचायती मालमत्ता कर अधिकाधिक संकलित करण्यावर लक्ष केंद्रित करीत असतात. दरम्यान, आर. के. नगरातील रत्नाप्पा कुंभारनगर सोसायटीमध्ये राहणाऱ्या डॉ. विजय दिनकराव शिंदे यांच्या खुल्या जागेला मोरेवाडी ग्रामपंचायतीने कर लावला. शहरापेक्षा जादा कर लादल्याचे निदर्शनास आल्यानतर डॉ. शिंदे, सुलोचना कोरेगावे, दिनकराव जावडे, शंकर कांबळे, आण्णासाहेब पाटील यांनी कर आकारणीच्या प्रचलित पद्धतीस जनहित याचिकेद्वारे २००१ मध्ये आव्हान दिले.