शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमध्ये २० हजार पूरग्रस्त कुटुंबांना धान्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:28 IST

संदीप बावचे जयसिंगपूर : अतिवृष्टीमुळे शिरोळ तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. शासनाने पूरग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण करण्याचे ...

संदीप बावचे

जयसिंगपूर :

अतिवृष्टीमुळे शिरोळ तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. शासनाने पूरग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तालुक्यातील २० हजारांहून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना शासनाकडून धान्य वितरण केले जात आहे. गहू, तांदूळ, डाळ यांचे वितरण केले जात असले तरी तालुका केरोसीनमुक्त असल्यामुळे त्याच्या वाटपाबाबत सध्यातरी प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिरोळ तालुक्यातील ४२ गावांना महापुराचा फटका बसला आहे. कृष्णा, पंचगंगा, वारणा व दूधगंगा या नद्यांच्या महापुरामुळे ८० हजार नागरिकांनी स्थलांतर केले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे सरकारने अनेक मदतीच्या घोषणा केल्या. जवळपास ४४ निवारा केंद्रांमध्ये पंधरा हजारांहून अधिक पूरग्रस्त आश्रयाला होते. अन्य पूरग्रस्त पै-पाहुणे, नातेवाईक यांच्याकडे गेले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह वेगवेगळ्या विभागांचे मंत्री व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी केली.

पूर ओसरल्यानंतर गावाकडे गेलेल्या पूरग्रस्तांना प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ, पाच किलो तूरडाळ व पाच लिटर केरोसीनचा मोफत पुरवठा केला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार सध्या तालुक्यातील २० हजारांहून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. तालुक्यात पंचनामे सुरू असून आणखी पूरग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांनाही मोफत अन्नधान्य दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

केरोसीन वाटपाबाबत अडचणी

शिरोळ तालुका केरोसीनमुक्त तालुका म्हणून नोंद आहे. त्यामुळे रास्त भाव धान्य दुकानदारांनी रॉकेल पुरवठा करणारे बहुतांशी टँक हटविले आहेत. राज्य शासनाने पूरग्रस्तांना मोफत केरोसीन देण्याची घोषणा केली आहे. मात्र, केरोसीनमुक्त तालुका आणि साठविण्यासाठी टँकची सोय नसल्याने सध्यातरी वाटपाबाबत अडचणी आहेत.

पूरग्रस्त धान्यापासून वंचित

ज्यांच्या घरात पुराचे पाणी आले आहे, अशा पूरग्रस्त कुटुंबांना धान्याचे वितरण सुरू आहे. २०१९ ची पूररेषा लक्षात घेऊन ज्यांनी घर सोडले मात्र त्यांच्या घरात पुराचे पाणी आलेले नाही, असे नागरिक मात्र धान्यापासून वंचित राहिले आहेत.