शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

शिरोळमध्ये २० हजार पूरग्रस्त कुटुंबांना धान्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:28 IST

संदीप बावचे जयसिंगपूर : अतिवृष्टीमुळे शिरोळ तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. शासनाने पूरग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण करण्याचे ...

संदीप बावचे

जयसिंगपूर :

अतिवृष्टीमुळे शिरोळ तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. शासनाने पूरग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तालुक्यातील २० हजारांहून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना शासनाकडून धान्य वितरण केले जात आहे. गहू, तांदूळ, डाळ यांचे वितरण केले जात असले तरी तालुका केरोसीनमुक्त असल्यामुळे त्याच्या वाटपाबाबत सध्यातरी प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिरोळ तालुक्यातील ४२ गावांना महापुराचा फटका बसला आहे. कृष्णा, पंचगंगा, वारणा व दूधगंगा या नद्यांच्या महापुरामुळे ८० हजार नागरिकांनी स्थलांतर केले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे सरकारने अनेक मदतीच्या घोषणा केल्या. जवळपास ४४ निवारा केंद्रांमध्ये पंधरा हजारांहून अधिक पूरग्रस्त आश्रयाला होते. अन्य पूरग्रस्त पै-पाहुणे, नातेवाईक यांच्याकडे गेले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह वेगवेगळ्या विभागांचे मंत्री व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी केली.

पूर ओसरल्यानंतर गावाकडे गेलेल्या पूरग्रस्तांना प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ, पाच किलो तूरडाळ व पाच लिटर केरोसीनचा मोफत पुरवठा केला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार सध्या तालुक्यातील २० हजारांहून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. तालुक्यात पंचनामे सुरू असून आणखी पूरग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांनाही मोफत अन्नधान्य दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

केरोसीन वाटपाबाबत अडचणी

शिरोळ तालुका केरोसीनमुक्त तालुका म्हणून नोंद आहे. त्यामुळे रास्त भाव धान्य दुकानदारांनी रॉकेल पुरवठा करणारे बहुतांशी टँक हटविले आहेत. राज्य शासनाने पूरग्रस्तांना मोफत केरोसीन देण्याची घोषणा केली आहे. मात्र, केरोसीनमुक्त तालुका आणि साठविण्यासाठी टँकची सोय नसल्याने सध्यातरी वाटपाबाबत अडचणी आहेत.

पूरग्रस्त धान्यापासून वंचित

ज्यांच्या घरात पुराचे पाणी आले आहे, अशा पूरग्रस्त कुटुंबांना धान्याचे वितरण सुरू आहे. २०१९ ची पूररेषा लक्षात घेऊन ज्यांनी घर सोडले मात्र त्यांच्या घरात पुराचे पाणी आलेले नाही, असे नागरिक मात्र धान्यापासून वंचित राहिले आहेत.