शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

गोविंद पानसरे हत्येचा तपास ‘सीबीआय’कडे देणार

By admin | Updated: June 23, 2016 08:59 IST

गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास‘सीबीआय’कडे देण्यास राज्य शासनाची कोणतीही हरकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विश्वास पाटील 

कोल्हापूर, दि. २३ - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास ‘सीबीआय’कडे देण्यास राज्य शासनाची कोणतीही हरकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले. त्यांच्यावतीने प्रधान सचिव (विशेष) रजनीश सेठ यांनी हे पत्र श्रीमती उमा व मेघा पानसरे यांना पाठविले आहे. गेल्याच आठवड्यात पानसरे कुटुंबीयांनी येथे पत्रकार परिषद घेऊन तशी मागणी केली होती. तिची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

प्रधान सचिव सेठ यांनी आपण हे पत्र मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने पाठवीत असल्याचे म्हटले आहे. ही चौकशी ‘सीबीआय’मार्फत करण्यास आमची हरकत नसल्याचे शासनाला कळवावे, असे त्यांनी पानसरे कुटुंबीयांना सुचविले आहे. त्यानुसार आता पानसरे कुटुंबीयांचे वकील अ‍ॅड. अभय नेवगी यांच्यावतीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर व पानसरे यांच्या हत्यांप्रकरणात बरीच साम्यस्थळे आहेत. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय करीत आहे. त्यामुळे पानसरे हत्येचा तपासही ‘सीबीआय’कडे गेल्याने तपासात एकसूत्रता राहील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

पानसरे यांचा कोल्हापुरात मॉर्निंग वॉकला गेल्यावर २० फेब्रुवारी २०१५ रोजी हत्या झाली. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात (गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९/२०१५ भादंवि संहितेच्या कलम ३०२, ३०७, १२० (ब), तसेच ३४ यासह इंडियन आर्म्स अ‍ॅक्टच्या कलम ३ /२५, ५/२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या हत्येचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक संजय कुमार यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथका (एसआयटी) मार्फत सुरू आहे.

या पथकाने सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड याला १३ सप्टेंबर २०१५ रोजी अटक केली. सध्या गायकवाड न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरुद्ध १४ डिसेंबर २०१५ ला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक सहा यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाची मंजुरी घेऊन पुढील तपास सुरू आहे. त्यानंतर सीबीआयने दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे याला १९ जून २०१६ ला अटक केली. या तपासामध्ये एसआयटी व कोल्हापूर पोलिसांचीही सीबीआयला मदत झाली आहे.

संशयित गायकवाड याला अटक झाल्यानंतर ‘एसआयटी’कडून पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्याबाबत फारशा हालचाली झाल्या नाहीत. त्याशिवाय तपास अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या होत असल्याने त्याचाही तपासावर परिणाम होत आहे. तपास ‘एसआयटी’मार्फतच व्हावा, अशी सुरुवातीला पानसरे कुटुंबीयांची मागणी होती.

सीबीआयकडे तपास देण्यास त्यांनी विरोध केला होता; परंतु दाभोलकर प्रकरणात सीबीआयने तावडेला अटक केल्याने पानसरे हत्येचाही तपास त्यांच्याकडेच दिल्यास त्यातून या दोन्ही हत्यांप्रकरणी खऱ्या मारेकऱ्यांपर्यंत जाणे शक्य होईल, असे पानसरे कुटुंबीयांचे म्हणणे होते. तशी लेखी मागणी त्यांनी १६ जूनला पत्रान्वये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.योगायोग असाही...पानसरे हत्येचा तपास ‘एसआयटी’मार्फत करण्यात यावा, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांच्यावतीने मेघा पानसरे यांनी केली व त्यासाठी न्यायालयात जाणार म्हटल्यावर राज्य सरकारने त्याच्या आधीच ‘एसआयटी’ची नियुक्ती केली. आताही पानसरे-दाभोलकर हत्येप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेची आज, गुरुवारी सुनावणी आहे. त्यावेळी हा तपास ‘सीबीआय’कडे सोपवावा, अशी मागणी करण्यात येणार होती. न्यायालयही तसा आदेश देऊ शकते, असा विचार करून मुख्यमंत्र्यांनी त्या अगोदरच ‘सीबीआय’कडे हा तपास सोपविण्याचा निर्णय घेतला. या हत्येप्रकरणी संशयितांना पाठीशी घातल्याबद्दल भाजप सरकारकडे कुणी बोट दाखवू नये म्हणून ही तत्परता दाखविली असल्याची चर्चा आहे.पानसरे हत्येचा तपास ‘सीबीआय’मार्फत व्हावा, अशी १६ जूनला मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत होतो; परंतु त्यांनी त्यास तयारी दर्शविल्याने हा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यातून या तपासाला गती येईल, अशी आशा निर्माण झाली आहे. राज्य शासनाने ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.- डॉ. मेघा पानसरे